03:25pm | Aug 11, 2019 |
कोल्हापूर : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुराने अस्मानी संकट ओढवले आहे. त्यामुळे सलग सहाव्या दिवशी जनजीवन ठप्प आहे. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंसह पिण्याचा पाण्याचीही भीषण टंचाई निर्माण झाली आहे. दोन्ही जिल्ह्यासाठी वरदायिनी असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार अजूनही बंदच आहे. शिरोलीनजीक अजूनही जवळपास साडे तीन ते चार फुट पाणी आहे. त्याचसरोबर सरनोबतवाडीनजीकही महामार्ग अजूनही पाण्याखाली आहे. कोल्हापूरला येणारे सर्व मार्ग पाण्याखाली आहेत. चारही बाजूने जिल्हा पाण्यात असल्याने संपर्क अजूनही तुटलेला आहे.
तिथून पुढे गेल्यास पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलग्याजवळ मांगूर फाटा येथे पुराचे पाणी आहे. महामार्गावरून अद्यापही तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. त्यामुळे गेल्या सहा दिवसांपासून या मार्गावरून होणारी आंतरराज्य वाहतूक पूर्णपणे बंद आहे.
वंटमुरी घाटात महामार्गावर पाणी ओसरू लागले तर तवंदी घाटातील दरडी कोसळण्यासही सुरुवात झाली. तर याच रात्री 12 वा. वेदगंगेचे पाणी सौंदलगा हद्दीत मांगूर फाट्यावर आले. त्यामुळे दुतर्फा होणारी सर्वच वाहतूक खोळंबून राहिली. अद्यापही आंतरराज्य वाहतूकबंदच आहे. यात तळकोकणात व धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण कमी अधिक आहे. त्यामुळे वेदगंगा व दूधगंगा या दोन्ही नद्यांच्या पाण्यांना फुगवटा आला आहे.
पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर गेली पाच ते सहा दिवस पूर्णपणे ठप्प आहे. अडकून पडलेली वहाने महामार्ग चालू झाला या अफवेने कोल्हापूरच्या दिशेने जाऊ लागली. पोलिस प्रशासन अजूनही महामार्ग चालू झाला नसल्याचे सांगत आहेत. मात्र, वाहनधारक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे पुढे गेलेली वाहने सांगली नाक्यावरील पाणी कमी झाले नसल्याने तेथे अडकून पडली आहेत. त्या दृष्टीने लोकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवून वाहन हलवू नये. तसेच नागरिकांनी देखील आवश्यक नसेल, तर बाहेर पडू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
सद्यःस्थितीत पावसाचा जोर कमी असला, तरी महामार्गावर असणार्या पाण्याची पातळी कमी होण्यास आणखी काही तास लागणार आहेत. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. बुधवारी मांगूर फाट्यानजीक शुक्रवारी व शनिवारी सकाळी 12 पर्यंत पाणी पातळीत आणखी घट झाली. पण वाहतूक सुरू झालेली नाही.
महामार्गावर सौंदलगा हद्दीतील मांगूर फाटा येथे गेल्या सहा दिवसांपासून पाणी पातळी जैसे थै’ असल्याने प्रशासनाने महामार्गावर निपाणीला ये-जा करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून एनडीआरएफची दोन, पुंजलॉईडची दोन, पोलिसांची चार पथके व दोन स्वतंत्र बोटी कार्यरत ठेवल्या आहेत.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |