01:54am | Aug 29, 2019 |
दहिवडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यात या शासनाने शेतकरी सन्मान योजना नावाने कर्जमाफी योजना सुरु करून कर्जमाफी मात्र केली त्यातून केवळ छत्रपतींच्या नावाची या मुख्यमंत्री देवेंद्र फडणविसांनी बदनामी केली आहे. तर सोळा हजार शेतकर्यांनी या शासनाच्या राज्यात आत्महत्या केल्या आहेत २०१४ साली तत्कालीन सरकारवर शेतकरी आत्महत्या बाबत ३०२ चे गुन्हे दाखल करा असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर आज गुन्हे दाखल करण्याची वेळ आली आहे असा आरोप आरोप राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केला. दहिवडी ता. माण येथील बाजारपटांगणावर शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, सुभाष शिंदे,जिल्हाध्यक्ष सुनील माने, सुरेंद्र गुदगे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत,जि प माजी अध्यक्ष सुभाष नरळे, जिल्हा परिषद सदस्य डॉ भारती पोळ,सोनाली पोळ,शिवाजी सर्वगोड, सभापती रमेश पाटोळे,सभापती कल्पना मोरे, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे,कुमार मगर, डॉ संदीप पोळ, मनोज पोळ, युवराज सूर्यवंशी,संदीप मांडवे,लालासाहेब ढवाण आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना खासदार डॉ.अमोल कोल्हे म्हणाले,मुख्यमंत्री यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढली आहे या यात्रेला माणसांच्या गर्दी पेक्षा पोलिसांची गर्दी जादा झाली आहे. त्यांच्या यात्रेत जनता काळे त्यांना झेंडे दाखवत आहे. मंत्रालयात आत्महत्या करणाऱ्या धर्मा पाटील या शेतकर्याच्या ६९ वर्षीय वयोवृध्द पत्नीला पोलिसांना स्थानबध्द करायला लावले आहे. या मुख्यमंत्र्यांना राज्यात फिरतांना माता भगिनींची भीती वाटायला लागली आहे.त्यामुळे महिलांच्या दारात या भीतीने पोलीस बसवू लागले आहेत. मात्र याच माता भगिनींचा आता शाप लागल्याशिवाय राहणार नाही, एक दिवस हे रंकाचे राव होतील. आघाडी शासनाच्या काळात अरबी समुद्रात शिवस्मारक उभारण्याचा धाडशी निर्णय घेण्यात आला मात्र या शासनाच्या काळात या स्मारकाला एक वीट लावता आली नाही. तसेच बालेवाडीच्या क्रीडासंकुलाला श्री छत्रपती क्रीडासंकुल हे नाव देण्याचे काम शरद पवार साहेब यांच्या मुख्यमंत्री काळातच झाळे आहे. सोळा हजार शेतकर्यांनी या शासनाच्या राज्यात आत्महत्या करण्याची वाईट वेळ आणली आहे शेतकरी आत्महत्मा प्रकरणी मुख्यमंत्री यांच्यावर ३०२ चे गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे असा आरोप डॉ.अमोल कोल्हे यांनी केला.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, युतीचे शासन राज्यात चुकीची धोरणे राबवत आहे,त्यामुळे मंदीची लाट निर्माण झाली आहे.शेतकर्यांच्या शेतीमालाचे भाव वाढले नाहीत, राज्यात प्रचंड बेरोजगारी वाढली. या शासनच्या काळात सहा लाख उद्योग बंद पडले आहेत त्यामुळे नोकर्या सुरक्षित राहिल्या नाहीत, १ कोटी १० लाखांच्यावर रोजगार गेले आहेत. विमान कंपनी, पार्ले सारखे उद्योग बंद पाडले आहेत, रिलायन्स सारखी खासगी मोबाईल कंपनी तेजीत चालविण्यासाठी बीएसएनएल कंपनी दिवाळखोरीत काढली,खासगीकरणातून भांडवलदार मोठे करण्याचे काम याशासानाने केले आहे. शेतकर्यांकडून कोट्यावधी रुपयांची विम्याची रक्क्कम भरून घेतली मात्र त्याना या सरकारने परतावा दिला नाही.राज्याचे मुख्यमंत्री हे राजकीय व्याभिचार करीत असून त्यांना या व्याभिचाराची उबग येवू लागली आहे. याचा ममात्र जनतेच्या मनात राग निर्माण झाला आहे. भेटेल त्याला राजकीय लालसेने पक्षात भेटेल त्याला ओढू लागले आहेत. शेतकर्यांचे देणे लागणारे साखर कारखानदार, खासगी कारखानदार , जे घोटाळ्यात अडकले आहेत त्यांना धास्ती लागली आहे. ते पक्ष सोडून जात आहेत. मात्र याला पर्याय निर्माण झाला आल्याने आम्ही नव्या चेहऱ्यांना संधी देत आहोत. शरद पवार नावाचे आमच्याकडे राजकीय विद्यापीठ असल्याने अ गेला तरी ब आमच्याकडे हजर आहे असे पाटील म्हनाले.
आमदार शिंदे म्हणाले, लोकसभेच्या निवडणुकीत आमचा विश्वास जरी निराशेत गेला असला तरी जनतेने आम्हाला बरोबरीत मतदान दिले असून माण खटाव मतदार संघातून आगामी आमदार हा राष्ट्रवादी पक्षाचाच असणार आहे.तसेच तरुण व सर्वसामान्य जनतेच्या जीवावर हा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणार आहे. प्रभाकर घार्गे म्हणाले,मटन, पैसा लाचारी दूर ठेवून कामाला लागा, काहीजण निवडणुकीच्या तोंडावर पाणी प्रश्न आणून दिशाभूल कारित आहेत,त्याला बळी पडू नका . भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु असल्या तरी कोणाच्याही पाठीशी जाणार नाहीनाही, प्रसंगी राजकारणातून घरी बसेन पण चुकीच्या प्रवृतींना पाठिंबा देणार नसल्याचे घार्गे यांनी स्पष्ट सांगितले.डॉ. भारती पोळ,प्रा.कविता म्हेत्रे, सतीश मडके,नंदकुमार मोरे,सूर्याजी शिंदे, सागर देवकर, यांची भाषणे झाली सूत्रसंचालन सरपंच अमोल काटकर यांनी केले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |