03:42am | Feb 15, 2020 |
सातारा : मानवी जीवनाची जडणघडणं व गुंतागुंत ही अनाकलनीय असते. संरचनेचे सूक्षमत्व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उलगडता येते. तंत्रज्ञान व संशोधनाची आस विद्यार्थी दशेपासून असायला हवी तरच भारताची भविष्यकालीन वाटचाल महासत्ता म्हणून होईल, असे प्रतिपादन राजीव गांधी सायन्स सेंटरचे अध्यक्ष व ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या रयत सायन्स व इनोव्हेशन सेंटर चे उदघाटन व अप्पासाहेब पाटील इंग्लिश मिडियम स्कूलच्या नामकरण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार, प्रतिभा पवार कार्याध्यक्ष डॉ अनिल पाटील, संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, अनिल मानेकर, शिवप्रसाद खेणद, डॉ नरेंद्र देशमुख, डॉ अरूण सप्रे, नितीन थोरात, डॉ वसंत शिंदे, संस्थेचे सचिव प्राचार्य भाऊसाहेब कऱ्हाळे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य रामशेठ ठाकूर, रविंद्र पवार, कमलाकर महामुने, विजय सावंत, प्रभाकर देशमुख, मुकेश शर्मा, प्राचार्य राजू मिश्रा आदी यावेळी उपस्थित होते.
काकोडकर पुढे म्हणाले, "रयत शिक्षण संस्थेचे योगदान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले आहे. यामध्ये कर्मवीरांच्या दूरदृष्टीची मोठी प्रेरणा आहे. रयतने विज्ञानाचा मार्ग व दृष्टीकोन स्वीकारला आहे. विद्याथ्र्यासाठी हे प्रकल्प चौफेरपणे पुढे जात आहे. शिक्षण हे येणाऱ्या काळाशी सुसंगत असावं, भारत जागतिकीकरणाला सामोरे जाताना सक्षमपणे पुढे यायचे असेल तर वैज्ञानिक दृष्टी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये रुजायला हवी. शालेय दशेपासून विज्ञान प्रकल्प व संशोधनाची सोय अत्यंत आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील जिज्ञासापूर्ती झाली पाहिजे. पालकांनी मुलांना गप्प न बसवता नवीन तंत्रज्ञान मुलांच्या विकासासाठी आत्मसात करायला हवे. नवीन ज्ञानाची क्षेत्र परिस्थितीनुरूप राबवायची म्हणले तर सक्षम तंत्रज्ञ तयार व्हायला हवेत. तंत्रज्ञान तयार करणारी मंडळी स्वदेशी व येथील प्रादेशिकतेला अनुकुल असायला हवीत. तरूण मनुष्यबळ जागतिक पातळीवर भारतात उपलब्ध आहे मात्र त्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हायला हवं. असे वातावरण देशात विज्ञाननिष्ठ क्रांती घडवू शकते. हवामान बदल व जागतिक संसाधनांच्या मर्यादा या गोष्टी सुध्दा लक्षात घ्यायला हव्यात. 2050 पर्यंत co2 चे प्रमाण नियंत्रित न केल्यास आणीबाणीसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. ग्रामीण भागात तंत्रज्ञान सक्षमता तयार करणे हा त्यावरचा पथदर्शी मार्ग आहे .रयतने संपूर्ण देशाला मार्गदर्शन करावे, अशी अपेक्षा काकोडकर यांनी व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, "सायन्स सेंटरवर अनेक महिने चर्चा सुरू होती. नावीन्यपूर्ण उपक्रमांसाठी तयारी करणे हा या सेंटरचा हेतू आहे . अप्पासाहेब पाटील यांनी कर्मवीरांच्या त्यागमय विचारांचा वारसा पुढे नेला. व्यक्तिगत लाभाचा त्यांनी कधी विचार केला नाही. अप्पासाहेबांच्या त्यागाला रयत परिवाराने इंग्लिश मिडियम स्कूलचे त्यांचे नामाकरण करून त्यांना श्रध्दांजली वाहिली. तंत्रज्ञान संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास समाजाच्या जडणघडणीमध्ये महत्वाचा आहे. सायन्स सेंटर चे विस्तारीकरण साताऱ्यात न होता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसा होईल याचा विचार रयत मॅनेजिंग कौन्सिलने करावा. परदेश दौऱ्यात शैक्षणिक व विज्ञान संशोधन करणाऱ्या संस्थांना मी भेटी देत असतो. नव्या परिस्थितीच्या गरजांची पूर्तता आणि संशोधन व पेटंट ही आजच्या व्यवस्थेची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.
शरद पवार यांच्या हस्ते अप्पासाहेब पाटील यांच्या तैलचित्राचे व अप्पासाहेब पाटील इंग्लिश स्कूल नामःकरण व चरित्र ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. अरविंद गुप्ता लिखित विज्ञान ग्रंथांचे प्रकाशन शरद पवार यांनी केले. अप्पासाहेब यांच्या चरित्र ग्रंथाचे लेखक विजय नलावडे, कला शिक्षक प्रताप जगताप, बांधकाम व्यावसायिक प्रवीण पात्रेकर इत्यादी चा शरद पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |