03:42am | Aug 29, 2018 |
कोरेगाव : माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील शेतीसाठी वरदायी ठरणारी जिहे-कठापूर या उपसासिंचन योजनेला अखेर केंद्रीय जलआयोगाने संपूर्ण मान्यता दिल्याने या जलसिंचन योजनेमधील सर्व अडथळे दूर झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयात मंगळवार दि. 28 रोजी पंतप्रधान कार्यालयाचे सर्व पदाधिकारी, वरिष्ठ अधिकार्यांची संयुक्त बैठक झाली. या महत्वपूर्ण बैठकीमध्ये खटाव-माण तालुक्यातील शेतकर्यांसाठी अत्यंत गरजेची असणारी जिहे-कठापूर जलसिंचन योजनेला केंद्रीय जलआयोगाने संपूर्ण मान्यता दिली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे भाजपाचे नेते महेश शिंदे यांच्या माध्यामातून खटाव येथील स्व. लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यामातून सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. या ट्रस्टच्या सर्व पदाधिकार्यांनी जिहे-कठापूर जलसिंचन योजना मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दिल्ली, मुंबई येथे जावून चार बैठका घेतल्या. त्याचप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जावून भाजपाचे नेते महेश शिंदे यांच्यासहीत खटाव-माण तालुक्यातील नेत्यांना बरोबर घेवून स्व. लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी जिहे-कठापूर जलसिंचन योजनेला संपूर्ण निधी मिळावा आणि राज्य शासनाने केंद्रीय जलआयोगाकडे ही सिंचन योजना पूर्ण व्हावी म्हणून सातत्याने बैठका घेतल्या आणि पाठपुरावा केला.
त्यामुळे केंद्रशासनाच्या जलआयोगाने जिहे-कठापूर जलसिंचन योजनेस मान्यता देवून खटाव-माण तालुक्यातील शेतीच्या पाण्याचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवून दुष्काळी तालुक्यातील दुष्काळ हटवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या योजनेला मान्यता दिल्याने 80 टक्के काम पूर्ण झाले आहे. या योजनेच्या राहिलेली 20 टक्के कामे मार्गी लागण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.केंद्रीय जलआयोगाने जिहे-कठापूर या उपसासिंचन योजनेस मान्यता दिल्याने खटाव-माण तालुक्यातील शेतीला, कायमस्वरूपी पाणी उपलब्ध होणार आहे, याचा आनंद होत आहे. लक्ष्मणराव इनामदार चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही आणि ट्रस्टच्या पदाधिकार्यांनी ही योजना मार्गी लावण्यासाठी घेतलेल्या कष्टाचे आज सोने झाले आहे. तसेच डिस्कळ, राजापूर या विभागातील दोन्ही उपसा सिंचन योजनांनाही शासनाने मंजुरी दिली आहे. या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना राज्याचे जलसंपदा मंत्रीपद मिळूनही या योजना मार्गी लावता आल्या नाहीत. मात्र आम्ही केंद्रशासनाच्या माध्यमातून जिहे-कठापूर या उपसासिंचन योजना मार्गी लावल्याचे समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया महेश शिंदे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |