नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या महाराष्ट्रातील आणि हरियानातील विधानसभा निवडणुकांची घोषणा आज झाली. महाराष्ट्रात २८८ जागांवर ही निवडणूक होणार आहे. हरियानात ९० जागांसाठी निवडणूक होत आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून निकाल २४ ऑक्टोबरला जाहीर होईल, असे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रात २०१४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांवेळी १२ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू करण्यात आली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली होती. त्यानंतर १९ ऑक्टोबर रोजी निवडणुकांचे निकाल जाहीर झाले होते. पण यावेळी उशिराने आचारसंहिता लागू होत आहे. राज्य विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर रोजी पूर्ण होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक एकत्र होणार आहे. हरियाणामध्ये २ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार अस्तित्वात यायला हवे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत दिवाळीपूर्वीच मतदान घ्यावे लागणार आहे. निवडणूक कायद्यानुसार निवडणूक प्रक्रिया ही किमान ३० दिवसांची असणे बंधनकारक आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी दोन्ही राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला. ९ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेची मुदत संपत आहे. महाराष्ट्रात ८.९४ कोटी मतदार आहेत. विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होत आहे. महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा मतदानासाठी वापर होणार आहे.
निवडणूक कार्यक्रम असा असेल :
२७ सप्टेंबर - निवडणुकीची अधिसूचना जारी होणार
४ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जासाठी मुदत
५ ऑक्टोबर - उमेदवारी अर्जांची छाननी
७ ऑक्टोबर - अर्ज मागे घेण्याची मुदत
२१ ऑक्टोबर - मतदान
२४ ऑक्टोबर - मतमोजणी
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |