11:01pm | Oct 09, 2019 |
सातारा : स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने चालू केलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात एक सक्षम सहकारी संस्था म्हणून ओळखली जात आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज आपल्या संस्थेचा नावलौकीक आहे. शासनाने इथेनॉलनिर्मीती बाबत घेतलेले धोरण सकारात्मक असून आपला कारखानाही इथेनॉल निर्मीतीसाठी प्राधान्य देणार असून त्यातून संस्थेचे उत्पन्न वाढणार आहे. पर्यायाने ऊस पुरवठादार शेतकर्यांना चांगला दर देता येणार असून या गळीत हंगामातही अजिंक्यतारा कारखाना शेतकर्यांना किफायतशीर दर देण्यासाठी कटीबध्द राहील, अशी ग्वाही कारखान्याचे मार्गदर्शक संचालक श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा 2019-20 या गळीत हंगामाचा 36 वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ विजयादशमीच्या मुहूर्तावर मोठ्या ×उत्साहात पार पडला. याप्रसंगी शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोंसले, श्रीमंत छ. रूद्रनिलराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे यांच्या विविध मान्यवर आणि संचालक उपस्थित होते.
गेल्या 10 ते 12 वर्षांत अजिंक्यतारा कारखान्याने प्रगतीचा आलेख सातत्याने चढता ठेवला असून सभासद, कामगार, ऊस तोडणी कामगार, वाहतूक यंत्रणा या सर्वांचीच विश्वासाहर्ता वाढवली आहे. याचे कारण म्हणजे कारखाना पुर्ण क्षमतेने सक्षमतेने सुरु असून येणार्या ऊसाला वेळेत आणि एङ्गआरपीप्रमाणे दर दिला जात आहे. कोणत्याही बाबतीत कारखाना मागे पडला नाही. त्यामुळेच राज्याच्या सहकारी कारखानदारी क्षेत्रात एक विश्वसनीय नाव म्हणून अजिंक्यतारा कारखान्याकडे पाहिले जात आहे. सभासद, शेतकरी आणि कामगारांचे हित जोपासणारी संस्था आणि संस्था अडचणीत असेल तर, त्यासाठी जीवाचे रान करणारे सभासद आणि कामगार कर्मचारी असे घट्ट नाते आपल्या कारखान्यात पहावयात मिळते. अनेक अडचणींवर मात करुन सस्था आज नावारुपास आली असून स्व. भाऊसाहेब महाराज यांचे आशिवार्द आणि आपणां सर्वांची मोलाची साथ यामुळेच अजिंक्यतारा कारखान्याची घोडदौड जोमाने सुरु आहे, असे शिवेंद्रसिंहराजे म्हणाले.
या गळीत हंगामात 5 लक्ष मेटन गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असले तरी त्यापेक्षाही जास्त गाळप केले जाईल. परंतु कमी कालावधीत जास्तीत जास्त गाळप करण्याचा मानस संचालक मंडळाचा असून जास्त वेळ न लावता तीन ते चार महिन्यात गाळप संपवण्याचा प्रयत्न केला जाणर आहे. नवीन मशिनरीमुळे रिकव्हरीमध्ये निश्चितपणे वाढ होणार आहे. दरम्यान, आपल्या कारखान्याची गाळप क्षमता आगामी काळात निश्चितपणे वाढवली जाणार असून यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही. त्यामुळे कार्यक्षेत्रातील बाहेरच्या कारखान्यांना काहीप्रमाणात जाणारा ऊस आपल्या कारखान्यात गाळपास येईल. इथेनॉल निर्मीतीबाबत शासनाने चांगला निर्णय घेतला असून साखरेला ठाव नसल्याने हा पर्याय सहकारी साखर कारखान्यांसाठी चांगला ठरणार आहे. शासनाने इथेनॉललाही चांगला दर दिला आहे. त्यामुळे साखरेचे उत्पन्न कमी घेवून आपण 20 लाख लिटर इथेनॉल निर्मीती करणार असून निर्यातीसाठी कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. यातून कारखान्याची आर्थिक बाजू अधिक सक्षम होणार असून पर्यायाने ऊस दर चांगला देता येणार आहे. हाही गळीत हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने नेहमीप्रमाणे यशस्वी होणार आहे. हंगाम यशस्वी करण्यासाठी नोंद केलेला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्याला गाळपासाठी द्यावा आणि हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
जेष्ठ नेते लालासाहेब पवार यांनी मनोगत व्यक्त केले. व्हा. चेअरमन शेडगे यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले. कार्यक्रमास कार्यकारी संचालक संजीव देसाई, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती वनिता गोरे, सदस्या सौ. कमल जाधव, प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण, प्रतीक कदम, माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, पंचायत समितीचे सभापती मिलींद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत, सदस्य राहूल शिंदे, दयानंद उघडे, आनंदराव कणसे, छाया कुंभार, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, सौ. कांचन साळुंखे, माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, माजी सभापती धर्मराज घोरपडे, नारायण कणसे, बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, गपतराव शिंदे, किरण साबळे पाटील, सतीश चव्हाण, ऍड. सुर्यकांत धनावडे, सूत गिरणीचे चेअरमन उत्तमराव नावडकर, रामचंद्र जगताप, पंडीतराव सावंत, अरविंद चव्हाण, दादा शेळके, तात्या वाघमळे, बळासाहेब लोहार, कामगार युनियचे अध्यक्ष धनवे, सरचिटणीस सयाजी कदम यांच्यासह अजिंक्य उद्योग समुहाचे सर्व आजी माजी संचालक, ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, बिगर सभासद आणि कामगार कर्मचारी उपस्थित होते.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |