06:00pm | May 20, 2018 |
सातारा : गेली अनेक दशके सातारा जिल्ह्यातील फलटण आणि कराडमध्ये गोवंश कत्तल करणारे नगरपालिकांच्या मालकीचे कत्तलखाने अस्तित्वात होते. हे गायीचे मांस निर्यात करुन जिल्ह्यातील अनेक खाटिक कोट्याधीश झाले. मात्र, 2015 साली गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायदा पारित झाल्यानंतर फलटणमधील नावात ‘राम’ असणारे सुद्धा खाटिक झाले. स्वत: संसदीय लोकशाहीचा भाग असणारे व व्यासपीठावर मोठमोठ्या गप्पा मारणारे फलटण नरेशसुद्धा फलटण येथील एका शासनमान्य कत्तलखान्यामध्ये भागीदार झाले. रोज लाखो रुपये विनासायास मिळू लागल्यामुळे नाव 'रामाचे' आणि कर्म 'रावणाचे' यानुसार गोवंश मांसावर बंदी असतानाही फलटण नरेशांच्या अधिपत्त्याखाली रोज हजारो गोवंशाचे शिरकाण होत आहे.
फलटण येथील मंगळवार पेठेलगत असणार्या कुरेशीनगरामध्ये फलटण नगरपालिकेच्या मालकीचा गेल्या अनेक दशकांपासून पशूवध गृह (कत्तलखाना) अस्तित्वात आहे. या पशुवध गृहामध्ये यापूर्वी देशी गायी, बैल, खोंड, म्हैस, जरशी, होस्टर्न, फ्रिझन या प्रकारच्या जनावरांची कत्तल केली जात होती. फलटणमध्ये 'बिफ' खाणार्यांची संख्या अधिक असल्यामुळे फलटणचे बिफ चांगले, अशी लोकांची धारणा होती. त्यामुळे मुंबई, ठाणे, गोवा, केरळ येथील बिफ व्यापार्यांच्या फलटणवर स्वार्या होवू लागल्या. फलटणमधील गोवंशाचे मांस मुंबई, ठाणे, गोवा, केरळबरोबरच आखातील देशातही निर्यात होवू लागल्याने येथील कसाबवाड्यातील खाटिक कोट्याधीश झालेले आहेत. याची माहिती फलटण नरेशांना लागल्यामुळे त्यांनी सुमारे 6 - 7 वर्षापूर्वी फलटणमधील एका माजी नगरसेवकाला हाताशी धरुन अलगुडेवाडी, ता. फलटणच्या हद्दीमध्ये अद्यावत 'बिफ एक्स्पोर्ट' कारखाना सुरु केला. मुंबई, ठाणे, मुंब्रा येथील बिफ माफियांना हाताशी धरुन फलटण नरेशांनी फलटण तालुक्यातील गोवंशाची अवैधपणे कत्तल करुन कोट्यवधी रुपये कमवलेले आहेत. महाराष्ट्र शासनाचा गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायदा 2015 साली अस्तित्वात आल्यानंतर फलटण येथील कुरेशी नगर व अलगुडेवाडी येथील कत्तलखाने काही दिवस बंद होते. मात्र फलटण नरेशांनी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करुन जिल्हा प्रशासनाला जागच्या जागी दाबून हे दोन्ही कत्तलखाने पुन्हा एकदा सुरु केले. फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, दौंड, खंडाळा येथून गोवंशाची तस्करी करुन त्याची फलटणमध्ये या दोन्ही कत्तलखान्यांमध्ये कत्तल होवू लागली. वास्तविक कायद्यानुसार व नियमानुसार बंदी असतानाही फलटण नरेशांच्या आशिर्वादाने फलटण तालुक्यात रोज टनांमध्ये बिफ आखाती देशांमध्ये निर्यात होत आहे.
दि. 16 मे रोजी पहाटे मुंबई येथील गोवंश हत्त्येविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते व मुंबई उच्च न्यायालयाने व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या पशु कल्याण कमिटीचे ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर यतीनभाई जैन यांनी फलटण पोलिसांना सोबत घेवून मंगळवार पेठेलगत असणार्या कुरेशी नगरामध्ये नगरपालिकेच्या मालकीच्या जुन्या कत्तलखान्यावर छापा टाकून शेकडो गायींचे मांस ताब्यात घेतले, तसेच कत्तल करण्यासाठी आणलेली सुमारे 30 पेक्षा जास्त गोवंश प्रजातीची जनावरे ताब्यात घेतली. यावेळी कत्तलखान्याच्या बाजूला असणार्या गोडावूनवर छापा टाकला असता यामध्ये सुमारे 5000 पेक्षा जास्त गोवंश प्रजातीच्या जनावरांची कातडी ठेवण्यात आल्याचे दिसून आले. ही कातडीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यावरुन अंदाज लावू शकतो की याठिकाणी रोज शेकडो गायींची कत्तल केली जाते. येथे जनावरांचे कत्तल केलेले मांस अलगुडेवाडी येथील शासनमान्य कत्तलखान्यामध्ये जाते. तेथे ते मांस साफ केले जाते व सॉर्टिंग करुन शीतगृहांमध्ये जमा केले जाते. गोठलेले (फ्रीझन) मांस वातानुकूलित कंटेनरमधून मुंबई येथील बीपीटी तसेच जे ऍण्ड पीटी येथील पोर्टवर एक्स्पोर्ट करण्यासाठी पाठविले जाते. तेथून हे मांस आखाती तसेच अफ्रिकन देशांमध्ये निर्यात केले जाते. त्यामुळे रोज कोट्यवधी रुपये या व्यवहारातून संबंधित व्यवसायिक कमवित असतात. त्यातील लाखो रुपयांचा रोजचा वाटा फलटण नरेशांना विनासायास मिळत असतो. या पैशातूनच फलटणमध्ये बेदिलीचे राजकारण केले जात आहे.
फलटण येथील कुरेशी नगर व अलगुडेवाडी येथील कत्तलखान्यामध्ये रोज शेकडो गोवंशाच्या प्रजातींची कत्तल केली जाते. ढोबळ हिशोबाने एक गायी शेतकर्यांकडून 4 ते 5 हजार रुपयांपर्यंत मिळत असते. तिची कत्तल केल्यानंतर सुमारे 100 किलोपेक्षा जास्त मांस त्या गायीपासून मिळत असते. आंतरराष्ट्रीय दरानुसार हिशोब केल्यास संबंधित व्यापार्याला सुमारे 40 ते 45 हजार रुपयांचे मांस त्या गायीपासून मिळते. गायीची कातडी, हाडे, शिंगे आदी अवयवही हजारो रुपयांमध्ये विकले जातात. म्हणजेच एका गायीपासून सरासरी 70 ते 80 हजार रुपये संबंधितांना मिळत असतात. सध्या शासन नियमानुसार फक्त म्हैस या जनावराची कत्तल केली जावू शकते. मात्र मुंबई, ठाणे, मुंब्रा व आखाती देशातून फक्त गायीच्याच मांसाची मोठ्या प्रमाणावर मागणी असल्यामुळे 2015 पासून बंदी असतानाही गायीच्या मांसाची तस्करी करण्याचा गोरखधंदा प्रशासनाच्या आशिर्वादाने मोठ्या जोमात सुरु आहे.
फलटण शहर विस्ताराने फार मोठे नाही. नाना पाटील चौकात फटाका उडवल्यानंतर त्याचा आवाज ‘मलटण’पर्यंत जातो. असे असताना 2015 पासून नगरपालिकेच्या मालकीच्या असणार्या कुरेशी नगर येथील कत्तलखान्यामध्ये राजरोसपणे रोज शेकडो गोवंशाची कत्तल केली जात आहे, हे नगरपालिका प्रशासनाला दिसत नाही काय? फलटण नगरपालिकेवर कोणाची सत्ता आहे, या सर्व बाबी जिल्हा प्रशासनाला तपासाव्या लागणार आहेत. या संदर्भातील अहवाल सातारा येथील राष्ट्रीय गुप्तचर खात्याने (आयबी) शासनाकडे पाठविला असल्याची खात्रीलायक माहिती सातारा टुडे च्या हाती लागली आहे. मात्र असे असूनही प्रशासनाने अद्याप बोटचेपे धोरण का स्विकारले आहे, याबाबतचा खुलासा जिल्हा प्रशासनाने करायला हवा.
फलटणमधून आळंदी ते पंढरपूर अशी ज्ञानेश्वरांची पालखी दरवर्षी जात असते. लाखो वारकरी या पालखीमध्ये सहभागी होत असतात. अखंड हरिनामाचा गजर या पालखीमध्ये सुरु असतो. त्यातच या पालखीचा दोन किंवा तीन दिवसांचा मुक्काम फलटणमध्ये असतो. गेली अनेक दशके पालखीने जिंती नाका ओलांडल्यानंतर वारकर्यांना गळ्यातील उपरण्याने नाके बंद करावी लागत होती. त्यावेळी फलटण नरेशांना शिव्यांची लाखोली आपसुकच मिळत होती. पालखी मुक्काम काळात कत्तलखाने बंद असावेत, अशी आग्रही मागणी वारकरी सांप्रदायाची असायची, मात्र फलटण नरेशांनी 'एक्स्ट्रा- इनकमच्या' हव्यासाने वारकर्यांनाही गंडवले. त्यामुळे केवळ नावात राम असून उपयोग नाही, तर कर्मसुद्धा रामासारखेच असायला हवे. जिल्ह्यात गुटखाबंदी आहे, मात्र गुटखा सर्वत्र मिळतो. सातारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये दारुबंदी आहे, मात्र या भागातच दारुचा महापुर येतो. शासनाने 2015 साली गोवंश हत्त्या प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आणला. मात्र, फलटणमध्ये दररोज गोवंशाचा ‘कत्ल - ए- आम’ सुरु आहे. मात्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करणारे प्रशासन मात्र मुग गिळून गप्प आहे. फलटण नरेश आपल्या घटनात्मक पदाचा पदोपदी वेगवेगळ्या प्रकरणात गैरवापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे येणार्या दिवसांमध्ये जिल्हा प्रशासनाला जागत्याच्या भूमिकेमध्ये रहावे लागणार आहे.
फलटणमधील गोवंश हत्त्या करणार्यांचा पर्दाफाश करणार : यतीनभाई जैन
फलटण शहरामध्ये असणार्या दोन कत्तलखान्यांमध्ये (पशूवध गृह) गोवंश प्रतिबंधक कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. येथे रोज शेकडो गोवंश प्रजातीच्या जनावरांची कत्तल केली जाते. प्रशासनाने या सर्व बाबींकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे. प्रथमदर्शनी यामध्ये फलटणच्या राजकीय पुढार्यांचा सहभाग नाकारता येत नाही. हे गोवंशाची हत्त्या करुन हे मांस फलटणमधील कत्तलखान्यांमध्ये फ्रोझन करुन मुंबई, मुंब्रा, ठाणे व आखाती देशांमध्ये निर्यात केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे फलटणमधील अशा अवैधपणे गोवंशाची कत्तल करणार्या पशुवध गृहांवर तीव्र कारवाई करण्यात येणार आहे. दि. 16 मे रोजी आम्ही या कत्तलखान्यावर छापा टाकून याबाबत आमची भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहिती मुंबई उच्च न्यायालयाने व महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या पशु कल्याण कमिटीचे ऍनिमल वेल्फेअर ऑफिसर यतीनभाई जैन यांनी ‘सातारा टुडे’ शी बोलताना सांगितली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |