02:59am | Oct 14, 2019 |
रहिमतपूर : बेरोजगारी, कर्जबाजारीपणा, दुष्काळ आदी प्रश्न दहातोंडी रावणासारखे राज्यापुढे उभे आहेत. या रावणाचा वध करायचा असेल तर धनुष्यबाणाशिवाय पर्याय नाही. राज्यातील जनता उद्याच्या २१ तारखेला धनुष्यबाणाच्या शस्त्राने राज्याच्या विकासाच्या प्रक्रियेत आड येणाऱ्या दहातोंडी रावणाचा वध करेल. विकासाच्या प्रक्रियेत आडवे येणाऱ्यांना जनता त्यांची जागा दाखवेल. राज्यात पुन्हा युतीचे सरकार सत्तेवर येईल, असा विश्वास शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. दरम्यान, उदयनराजे भोसले आणि धैर्यशील कदम यांच्या विजयाची आता केवळ औपचारिकताच बाकी आहे, असेही ते म्हणाले.
महायुतीचे लोकसभेचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर येथे झालेल्या विराट सभेत ठाकरे बोलत होते.
यावेळी उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले, धैर्यशील कदम, शिवसेना उपनेते प्रा. नीतीन बानुगडे- पाटील, माजी आमदार कांताताई नलावडे, पुरुषोत्तम जाधव, रणजितसिंह भोसले आदींची या वेळी प्रमुख उपस्थित होती.
रहिमतपूरमधये महात्मा गांधी मैदानावर जनसमुदायाला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले, "शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारणाचा मूलमंत्र दिला. या कार्यासाठी लोकांचे आशीर्वाद घायचे असतात, असे त्यांनी सांगितले होते. जनतेचे आशीर्वाद घेण्यासाठी मी आज रहिमतपूर येथे आलो आहे. तुमचे मत महायुतीच्या उमेदवारांना मिळणार आहे, म्हणजेच जनतेचे आशीर्वाद मला लाभणार आहेत. मी येथे केवळ मत मागायला नव्हे तर नवमहाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न घेऊन आलो आहे."महाराष्ट्र उपाशीपोटी नाही रहायला पाहिजे. त्याकरिता राज्यात ठिकठिकाणी 1000 भोजनालये सुरू करायची व अवघ्या दहा रुपयांमध्ये जनतेला जेवण देण्याची आमची योजना आहे. तयामुळे भुकेलेल्याला अन्न मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीही होणार आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा करिता अडीच हजार बससेवा सुरू करणार आहोत. शेतकऱ्यांकरिता कर्जमाफी नव्हे तर शंभर टक्के कर्जमुक्त करण्याचे अभिवचन मी देतो. आर्थिक दृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना वार्षिक १० हजार रुपये मदत देण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध असेल. राज्यातील रस्त्यांची एकूण अवस्था पाहता 50 हजार किलोमीटर लांबीचे बारमाही रस्ते आम्ही बनवणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक सुपरस्पेशालीटी हॉस्पिटल उभारणार आहे.
उदयनराजे भोसले म्हणाले,तरुणांना वाव दिला पाहिजे असे म्हणणारे लोक बोलतात एक आणि करतात दुसरेच. तरुणांना वाव हवा तर या वयात तिकीट पण मलाच पाहिजे हा स्वार्थ कसा दिसला, असा टोलाही त्यांनी विरोधी उमेदवाराला लगावला. लोकांचा विश्वासघात करणाऱ्यांना जनता घरी बसवेल. तुम्हाला घरी बसवायचे लोकांचे ठरले आहे. आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने राज्याची वाटचाल नवमहाराष्ट्र निर्मितीकडे असेल, असा विश्वास व्यक्त करत उदयनराजे यांनी महायुतीच्या पाठीमागे जनतेने उभे रहावे असे आवाहन केले.
धैर्यशील कदम म्हणाले, "कराड उत्तरच्या निष्क्रिय आमदारांनी गेली दहा वर्षे जनतेला केवळ झुलवत ठेवले. भागातील एकही रस्ता चांगला नाही. २० वर्षे नेतृत्व करत असताना त्यांनी जनतेला केवळ स्वप्न दाखवण्याचे काम केले. स्वतःच्या वडिलांची इच्छा पुर्ण करण्याचे काम जो करू शकत नाही, तो जनतेच्या अपेक्षा कधी आणि कशा पूर्ण करणार. नाकर्त्या लोकप्रतिनिधींना घरी घालवायचे आहे आणि हेच काम येत्या आठ दिवसात तुम्हाला करायचे आहे." उदयनराजेंना कॅबिनेट मंत्री म्हणून केंद्रात पाठवायचे आहे आणि त्यासाठी मतदारांचा आशीर्वाद हवा आहे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी प्रा. नितीन बानुगडे - पाटील, कांताताई नलावडे, रहिमतपूरचे माजी नगराध्यक्ष वासुदेव माने यांचीही भाषणे झाली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, सुनील काटकर, भाजप अोबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अॅड. विशाल शेजवळ, रहिमतपुरच्या नगरसेविका रुक्मिणीताई सुतार, जिल्हा संघटीका चित्रा महाडीक, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, जिल्हा परिषद सदस्या सुनीता कदम, पं. स. सदस्या विजयाताई गुरव, रवींद्र भोसले, जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते भीमरावकाका पाटील, रामकृष्ण वेताळ, संपतरावदादा माने तसेच पंचक्रोशीतील शिवसेना-भाजप महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवारांच्या आत्मक्लेषाची उदयनराजेंकडून खिल्ली
श्री. छ. उदयनराजे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांच्या आत्मक्लेषाची खिल्ली उडवली. आधी चुका करायच्या आणि नंतर आत्मक्लेश करत बसायचे. या जन्मात केलंय या जन्मातःच ते फेडायचे आहे. शासनाने कृष्णा खोरेची स्थापना करून जिल्ह्यामध्ये पाणी अडवण्याचे मोठे काम केले. परंतु त्यानंतरच्या दहा वर्षात कालव्यांची कामे अपूर्ण राहिली, पुनर्वसनाचा प्रश्न गंभीर बनला, शेतीपर्यंत पाणी पोहोचले नाही. त्याचवेळी आत्मपरिक्षण केले असते तर वेगळे चित्र दिसले असते."या सभेत उदयनराजे भोसले यांनी जोरदार बॅटिंग करत विरोधकांचा त्यांच्या स्टाईल ने समाचार घेतला. त्याला उपस्थितांनी जोरदार दाद दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |