03:36am | Sep 17, 2018 |
कोरेगाव : कोरेगाव तालुक्यामध्ये कोरेगाव विधानसभा मतदार संघामध्ये मोठी एम.आय.डी.सी. उभी रहावी. बाहेरुन मोठे उद्योग यावेत, बेरोजगार युवकांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा, तालुक्यात दुष्काळ निर्मृलनासाठी शेतीच्या पाण्याच्या जलसिंचन योजन मार्गी लावाव्यात. कोरेगाव तालुका सुजलाम सुफलाम व्हावा, तालुक्यात मेडीकल इंजिनिअरींगसहित इतर विविध विषयाच्या शैक्षणिक सुविधा, शैक्षणिक संकुले उभी रहावीत, तालुक्याच्या सर्वांगिण विकास व्हावा अशा विविध कारणासाठी विद्यमान आमदारांना आम्ही नऊ वर्षापूर्वी पाठींबा देवून आम्ही डोक्यावर घेतले. त्यांना आमदार केले. मात्र गेल्या नऊ वर्षामध्ये आमदारांनी वरील कोणतीच विकासकामे न करुन आमचा भ्रमनिरास केला. आमचा विश्वासघात केला. त्यामुळे येणार्या काळामध्ये त्यांची आमदारकीची सत्ता उलथून टाकून आमच्या डोक्यावरुन आम्ही खाली घेवू असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किशोर बाचल यांनी नामोल्लेख टाळून आ. शशिकांत शिंदे यांना मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या जुन्या कोरेगाव जिल्हा परिषद गटातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात दिला.
पुढे बोलताना किशोर बाचल म्हणाले, की गेल्या दहा वर्षामध्ये विकासाच्या बाबतीत कोरेगाव तालुका वीस वर्षांनी मागे पडला. आम्ही पाहिलेली विकासाची स्वप्ने धुळीला मिळाली. नऊ वर्षापूर्वी तालुक्याचे भले व्हावे म्हणून आम्ही विद्यमान आमदारांना तालुक्यात आणले, मात्र आमच्या तालुक्याचे भले तर झालेच नाही, मात्र तालुक्यात पाकीट संस्कृती आणि दहशतवाद उदयास आला. गावा-गावात दहशत आणि पैशाचा बेसुमार वापर कोरेगाव तालुक्यात सुरु झाला आणि त्याची फळे आमच्यासह तालुक्यातील जनतेला सलग भोगावी लागली, अशी खंत किशोर बाचल यांनी यावेळी व्यक्त केली.
बाहेरुन कुणीही यायच, पैशाच आणि दहशतीच राजकारण करायच आणि आमदार व्हायच हे पुढील काळात आम्ही चालू देणार नाही. कोरेगावचा आमदार स्थानिकच असला पाहिजे हा विचार कोरेगाव तालुक्यात पोहचविण्यासाठीच प्रथमच आम्ही जुन्या कोरेगाव जिल्हा परिषद गटाच्या स्वाभिमान कार्यकर्त्यांचा एल्गार मेळावा आयोजित केला आहे. आमदार म्हणून आम्हाला स्थानिक असलेला कोणीही चालेल. अगदी मीच नव्हे तर माजी जिल्हा परिषद सदस्य किरण बर्गे, कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे अथवा अन्य कोणीही स्थानिक उमेदवार पुढील काळात आम्हाला आमदार म्हणून चालेल. आम्ही स्थानिक पातळीवर सर्वजण एकत्रच राहणार आहोत. आमच्यात कोणताही संघर्ष होणार नाही. कोरेगाव तालुक्यात घुसलेल्या परकीय आक्रमण रोखण्यासाठी आणि पैशाचे आणि दहशतीचे राजकारण मोडून काढण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित उठाव करु. आता बाहेरील असंस्कृत आक्रमण रोखण्यासाठी माघार नाही. पुढील काळात कोरेगाव तालुक्याच्या विकासासाठी माघार नाही. हाच आमचा पक्ष राहील असा निर्धार किशोर बाचल यांनी यावेळी व्यक्त केला.
विधानसभेच्या निवडणूकीला खर्च मीच केला आहे. त्यामुळे कोणाला किती विकासकामे द्यायची हे मीच ठरवणार. ज्यांना विकासकामे हवी असतील त्यांनी माझ्याकडेच आले पाहिजे ही प्रवृत्ती विद्यमान आमदारांच्या काळात वाढीस लागली. त्यामुळे गेली 20 ते 25 वर्षे गावच्या विकासासाठी झटणारा सर्वसामान्य प्रामाणिक कार्यकर्ता समाजकारणातून राजकारणातून हद्दपार झाला, अशी खंत व्यक्त करुन पुढील काळात सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सन्मान देणारे नेतृत्व कोरेगाव तालुक्यात उभे करायचे आहे, असा निर्धार किशोर बाचल यांनी यावेळी व्यक्त केला.
सातारा जिल्हा बँकेच्या नोकर भरतीमध्ये तीन लाखापासून सात लाखापर्यंत पैसे लोकप्रतिनिधींनी उकळल्याची माहिती गावा-गावातून पुढे येवू लागली आहे. त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांनी स्वत:च्या शेतजमिनी विकल्याचे किस्सेही ऐकण्यास मिळत आहे. जो लोकप्रतिनिधी कार्यकर्त्यांच्या जमिनीवर घरावर, लक्ष ठेवतो, अशा प्रवृत्तींना पुन्हा आमदार करायचे का? असा संतप्त सवाल किशोल बाचल यांनी यावेळी विचारला.
सरपंच असो, सभापती असो किंवा नगराध्यक्ष असो त्याच्या कारभारात सातत्याने हस्तक्षेप करायचा. ढवळाढवळ करायची. त्यांना स्वतंत्रपणे कामकाज करु द्यायचे नाही. निवडणूकीमध्ये मीच खर्च केला आहे. त्यामुळे प्रत्येक संस्थेच्या कारभार माझ्याच मनाप्रमाणे झाला पाहिजे असा अट्टाहास, दुराग्रह धरणार्या प्रवृत्तीला उलथून टाका असे आवाहन किशोर बाचल यांनी यावेळी स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. कोरेगाव येथे शिवरत्न मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या मेळाव्यात गेली 30 ते 40 वर्ष कोरेगाव जिल्हा परिषद गटामध्ये राजकारण, समाजकारण करणार्या कोरेगाव, एकंबे, एकसळ, गोडसेवाडी, गोळेवाडी, गोगावलेवाडी, कठापूर, शिरढोण, ल्हासुर्णे, वडाचीवाडी, सायगाव सह इतर गावातील निस्वार्थी कार्यकर्त्यांच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरणनाना बर्गे, कोरेगावचे नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, माजी उपसभापती किशोर बाचल (बापू) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रस्ताविक भाषण संतोष नलवडे यांनी केले. महादेव घोरपडे, विशाल कदम, सौरभ कस्तुरे, नारायण मतकर, आदीनाथ शितोळे, बी. एस. चव्हाण सर, न्हाळेवाडीचे ज्येंष्ठ कार्यकर्ते मोजर यांनी यावेळी भाषणे केली आणि त्यामध्ये लोकप्रतिनिधीबाबत आलेले अनुभव सांगितले.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |