02:50pm | Sep 23, 2018 |
कराड : कराड जनता बँकेतील संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बँकिंग क्षेत्रातील कराडची विश्वासहर्ता संपली आहे. बँकेच्या नावात कराड असल्यामुळे अनेक आर्थिक संस्थांमधील आपल्या ठेवी काढून घेऊ लागले आहेत. जनता बँकेतील ६५०कोटी रुपयांच्या ठेवींची रक्कम ठेवीदारांना परत मिळेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. त्यासाठी वेळीप्रंसगी जनता उद्योग समूहातील सर्व संचालकांच्या मालमत्तेची कायदेशीर जप्त करण्याची वेळ आलीतरी चालेल, मात्र ठेवीदारांच्या ठेवी परत घेतल्याशिवाय थांबणार नाही, असा इशारा कराड जनता सहकारी बँकेचे माजी व्हा. चेअरमन अनिल खुंटाळे व याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान, कराड जनता बँकेत विद्यमान चेअरमन राजेश पाटील-वाठारकर व मुख्यकार्यकारी अधिकारी व्ही. डी. सुर्यवंशी यांनी संगनमताने सुमारे २५० कोटी रुपयांची बनावट कर्जप्रकरणे करून पैसे हडप केल्याचा गौप्यस्फोट याचिकाकर्ते राजेंद्र पाटील यांनी केला.
कराड जनता बँकेतील गैरकारभारची माहिती देण्यासाठी येथे माजी पदाधिकारी, सभासद, कर्जदार यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी कर्जदार व कोर्टीचे माजी सरपंच सयाजीराव पाटील, अधिकराव पाटील-शेरेकर उपस्थित होते.
अनिल खुंटाळे म्हणाले, कराड जनता बँक स्थापन करताना आमच्या पिताश्रींनी चांगला उद्देश ठेवून केली होती. मात्र यात वाठारकरांनी आंबाच्या झाडाला गंजाची फळे आणली. त्यामुळे आजही वेळी आली आहे. मी संचालक मंडळात असताना त्यांची कृष्णकृत्य माझ्या निर्दशनास आली त्यामुळे मी त्यातून बाहेर पडलो तसेच निवडणूक लढलो. मात्र, अपयशी ठरलो. विद्यमान संचालक मंडळाच्या भ्रष्ट कारभारामुळे बँकेची स्थिती डबघाईस आली आहे. कामगारांना घरी पाठविले जात आहे. या भ्रष्ट कारभारविरोधात आम्ही लढा उभा केला आहे. वेळप्रसंगी जनता उद्योग समूहाच्या सर्व संस्थांच्या संचालकांची मालमत्ता जप्त करून जनता बँकेतील ठेवीदारांचे पैसे भागविल्याशिवाय संचालक मंडळाला कराड शहरा बाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा खुंटाळे यांनी दिला.
राजेंद्र पाटील म्हणाले, विद्यमान सीईओ खोटी कागदपत्रे तयार करून दिशाभूल करण्यात पटाईत आहेत. त्यांनी अनेक खोटी कागदपत्रे तसेच बनावट ऑडिट रिपोर्ट तयार करुन रिर्झव बँकेसह राज्य सहकार खाते व सभासदांची दिशाभूल केली आहे. बोगस कर्ज प्रकरणे तयार करून २५० ते २७५ कोटी रुपये विद्यमान चेअरमन राजेश पाटील व व्ही. डी. सुर्यवंशी यांनी उचलून मनी लाँड्रींगच्या व्यवसायात वापरले आहेत. त्यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यावर न्याय होईल जरा उशिरा होईल पण नक्की न्याय होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी सयाजीराव पाटील व अधिकराव पाटील यांनीही बँकेच्या अपहाराबाबत सविस्तर माहिती दिली.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |