नवी दिल्ली : महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या हातमिळवणीतून स्थापन होणाऱ्या संभाव्य महाशिवआघाडी सरकारमध्ये पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी काँग्रेस पक्ष उत्सुक नाही. सरकारच्या स्थैर्यासाठी काँग्रेसचा सहभाग आवश्यक असल्याचे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला वाटत असून त्यासाठी गरज पडल्यास काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याची दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तयारी आहे.
काँग्रेसचा सरकारमधील सहभाग सर्वांसाठीच उपयुक्त ठरेल, असे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटते. संभाव्य महाशिवआघाडी सरकारमध्ये सामील होण्याची इच्छा काँग्रेसच्याही अनेक आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे काँग्रेसचा सत्तेतील सहभाग निश्चित वाटत आहे. मात्र, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपदात स्वारस्य नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अडीच-अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद विभागून घेणार असले तरी काँग्रेस पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपदावर दावा करणार नसल्याचे समजते. उपमुख्यमंत्री कोणाला करायचे यावरून काँग्रेसमध्ये विनाकारण कलह वाढेल, असे मत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले. काँग्रेसला विधानसभेचे अध्यक्षपद हवे असल्याचे म्हटले जात आहे. पण शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये अजून प्राथमिक चर्चाच सुरू असून सत्तेच्या पदांसाठी वाटाघाटी होतील तेव्हा या विषयाला हात घालता येईल, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. तिन्ही पक्षांच्या वाट्याला प्रत्येकी १४ मंत्रीपदे येतील अशी अपेक्षा असली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस जास्तीत जास्त मंत्रीपदे मिळवण्यासाठी आग्रही असेल, असे म्हटले जात आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |