06:49pm | May 27, 2023 |
सातारा : यंदाच्या मान्सूनमध्ये पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील पाच हजार 105 सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी दिनांक 20 जून पर्यंत करण्यात येणार आहे.
दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांमध्ये दूषित पाणी मिसळले की गावात सात लोकांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. म्हणून पिण्याच्या पाण्यावर योग्य शुद्धीकरण प्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच जिल्ह्यातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या सर्व स्त्रोतांची मान्सूनपूर्व रासायनिक तपासणी पूर्ण करून घ्यावयाच्या आहेत. या अंतर्गत पाणी गुणवत्तेच्या पोर्टलवर पाणीपुरवठा योजनांचे स्त्रोत, शाळा, अंगणवाडी व वैयक्तिक नळ जोडणी असलेली कुटुंबे इत्यादी स्त्रोतांचे पाणी नमुने गोळा करून रासायनिक तपासणीसाठी गुणवत्ता पोर्टल यूआयडी काढूनच संबंधित उपविभागीय प्रयोगशाळेत जमा करण्यात यावेत, अशा सूचना पाणीपुरवठा विभागाने दिल्या आहेत. रासायनिक तपासण्यासाठी पाणी नमुने घेताना मुख्यत्वे नळ पाणीपुरवठा योजनेच्या स्त्रोतांतून व योजना नसल्यास पिण्याच्या पाण्याच्या वापरात असलेल्या स्त्रोतांमधून घ्यायचे आहेत. जिल्ह्यात प्रत्येक गावातील जलसुरक्षक व आरोग्य सेवक यांनी संयुक्तपणे पाणी नमुने गोळा करणे व हे पाणी नमुने आयडी सह जिल्हा व उपविभागीय प्रयोगशाळेत पाठवायचे आहेत. जिल्ह्यातील जावली तालुक्यात 333, कराड 632, खंडाळा 209, खटाव 542, कोरेगाव 371, महाबळेश्वर 257, माण 326, पाटण 909, फलटण 502, सातारा 687, वाई 337 अशा पाणी स्त्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत पाणी योजनेच्या टाक्यांची स्वच्छता दर तीन महिन्यातून एक वेळ करणे गरजेचे आहे. सध्या ग्रामपंचायत स्वच्छता करावी, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता गौरव चक्की यांनी केले आहे. ग्रामीण भागात स्त्रोत दूषित होऊन साथरोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ग्रामपंचायतीने स्वच्छतेचे काटेकर पालन करावे, अशा स्पष्ट सूचना सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी दिले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |