12:36pm | Jul 01, 2020 |
काठमांडू : भारताविरोधातील बेताल वक्तव्य नेपाळ पंतप्रधान के.पी.शर्मा यांच्या अंगलट आलं आहे. स्थानिक नेत्यांच्या मदतीने भारताकडून माझं सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करणार्या के.पी. शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्षातील नेत्यांनी ओलींना हे आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या, असा अल्टीमेटम दिला आहे. या नेत्यांमध्ये तीन माजी पंतप्रधानांचाही समावेश आहे. बंद दाराआड झालेल्या नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुष्पा कमल दहल प्रचंड, माधव कुमार नेपाळ आणि झलनाथ खनल यांच्यासह माजी उपपंतप्रधान बामदेव गौतम यांनी ओली यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
भारताविरोधात ओली यांचे आरोप अत्यंत चुकीचे आहेत. भारत नव्हे, तर मी स्वतः तुमचा राजीनामा मागत आहे. या बेजबाबदार वक्तव्यासाठी अगोदर पुरावे सादर करा, अशी मागणी पुष्पा कमल यांनी केली. स्थायी समिती सदस्यांच्या मते, खनल, माधव नेपाळ आणि गौतम यांनी ओलींवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आणि मित्र देशाविरोधात चुकीचं आणि बेजबाबदार वक्तव्य केल्याचा आरोप केला.
ओली यांनी स्थायी समिती सदस्यांना उत्तरही दिलं आहे. बंद दाराआड झालेल्या बैठकीतील माहिती भारतीय माध्यमांपर्यंत कशी जाते, असा सवाल त्यांनी विचारला. भारत काही नेपाळमधील नेत्यांच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतीय माध्यमातील याविषयीचे वृत्त आणि काठमांडूतील भारतीय दुतावासातील चर्चा यावरुन हे स्पष्ट होतं, असा आरोप ओली यांनी केला. दुसरीकडे नेपाळमधील चीनचे राजदूत होऊ यांकी यांनी भारतीय लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्यावर टीका केली. नेपाळ दुसर्या एका देशाच्या इशार्यावर नाचत असल्याचं नरवणे म्हणाले होते.
ओली यांच्या वक्तव्यानंतर आता स्वपक्षिय नेतेच आक्रमक झाले आहेत. गौतम हे बैठकीत सर्वात आक्रमक झाल्याची माहिती आहे. पक्ष अध्यक्ष आणि पंतप्रधान या दोन्ही पदांचा राजीनामा ओली यांनी द्यावा, असं ते म्हणाले. पक्षाबाहेरुनही ओलींवर टीका होत आहे. भारताविरोधात केलेल्या आरोपांवर ओली यांनी तातडीने पुरावे सादर करावेत, अशी मागणी नेपाळचे माजी पंतप्रधान बाबुराम भट्टाराय यांनी केली. भारतीय दुतावास सरकार पाडण्याचं नियोजन करत आहे, तर मग तुम्ही राजदुताला काढून का टाकत नाही, असा सवालही त्यांनी केला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |