09:36pm | Sep 23, 2022 |
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 वे वशंज, सातार्याच्या समाजकारणातील ज्येष्ठ व्यक्तीमत्व, सातारचे माजी नगराध्यक्ष, महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष, राजघराण्यातील ज्येष्ठ सदस्य श्रीमंत. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांना न्याय देणारा राजा आपल्यातून निघून गेला आहे. यानंतर असा राजा पुन्हा होणे नाही. छत्रपती शिवाजीराजांचे अजिंक्यतारा जिर्णोध्दाराचे स्वप्न पुर्णत्वाला नेणे हीच त्यांना खरी श्रध्दांजली ठरेल अशा शब्दात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी श्रीमंत. छ. शिवाजीराजे भोसले यांना श्रध्दांजली वाहिली.
श्री.छ. प्रतापसिंह महाराज थोरले नगरवाचनालयाच्या सभागृहात सातारकरांच्यावतीने आदरांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सभेच्या सुरूवातीला श्रीमंत. छ. शिवाजीराजे भोसले यांच्या प्रतिमेस पुष़्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आ. श्रीमंत. शिवेंद्रसिंहराजे भोसले, श्रीमंत. वृषालीराजे भोसले, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, माजी प्राचार्य पुरूषोत्तम शेठ, साहित्यिक सुनीताराजे पवार, वि. ना. लांडगे, जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल उपस्थित होते.
श्रीमंत वृषालीराजे भोसले म्हणाल्या, आपण सर्व मान्यवर पप्पांच्या शोकसभेसाठी आमच्या राजघराण्याच्या दु:खात सहभागी आहात. पप्पाविषयी सर्वांना आदर होता.तो आज दिसतोय. त्यांच्याबद्दल बोलताना म्हणाला, पप्पा तुम्ही मला खूप लवकर सोडून गेला. माझी आई दोन वर्षापूर्वी 13 संप्टेबरला गेली तीच तारीख पप्पांनी निवडली आणि ते सोडून गेले. पप्पा माझं छत्र होतं,आपल्या मुलीला वडिलांचा काय आधार असतो हे सर्वांना माहित आहे. आई वडिल गेल्यावर जो घराला पोरकेपणा येतो तो सर्वांनी अनुभवला असतो. मी लहानपणी मला भाऊ पाहिजे असे म्हणायचे त्यावेळी मम्मी-पप्पा म्हणायचे उदयनदादा, शिवेंद्रदादा, विक्रमदादा हे तुझे सख्खे भाऊच आहेत. मी आज एकटी नाही. माझी सर्व भावंडे, नातेवाईक माझ्यासोबत आहेत. पप्पांचे राहणीमान अत्यंत साधे होते. मात्र त्यांचे विचार खूप मोठे होते. छत्रपती घराण्याचे वलय त्यांनी जपले. शिवाजीराजेंचे राहिलेले स्वप्न पुर्ण करणार आहोत.
आ. श्रीमंत. शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शिवाजीराजे भोसले यांच्याबद्दलच्या आठवणी सर्वांनी व्यक्त केल्या. अनेकांचे वाटचालीत त्यांचे योगदान राहिले आहे. आजही काकांची 1439 ही अम्बेसिडर आहे तशी आहे. सर्वाबरोबर काकांच्या आठवणी जुडल्या आहेत. काकांच्या जाण्याने सर्वांना मोठा धक्का बसला आहे. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोणतीही शारीरीक तक्रार नव्हती. डेंगू हे हॉस्पिटलला जाण्याचे निमित्त झाले आणि त्यातच ते आपल्याला सोडून गेले. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आमचा राजघराण्याचा आधार हिरावला गेला आहे. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून काही मोजक्याच जणांची नावे लक्षात राहतात त्यात प्रतापसिंह महाराज त्यानंतर शिवाजीराजे भोसले यांचे नाव आहे. त्या पदाला त्यांनी न्याय दिला आहे. काकांच्या नेतृत्वाने त्या पदाची उंची वाढली ही वस्तूस्थिती आहे.
माजी प्राचार्य पुरूषोत्तम शेठ म्हणाले, शिवाजीराजे भोसले हे नगराध्यक्ष असताना सातारा शहरातील सामान्य माणसाला पाणी टंचाई भासू नये यासाठी कूपनलिका योजना राबवली. जंगलाबद्दल त्यांना प्रेम होते. त्यांनी एकाही प्राण्याची शिकार केली नाही. ज्येष्ठ नागरिकांचा एक सन्मीत्र गेला. माजी प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे म्हणाले, शिवाजीराजे भोसले यांना श्रध्दाजंली वाहण्याचा प्रसंग येईल असे वाटत नव्हते. आभाळ अंगावर कोसळले अशी दुख:द बातमी सर्वांना कळाली. अनेकांच्या जीवनामध्ये त्यांनी स्नेहाचा बंध निर्माण केला होता त्याला आपण मुकलेले आहोत. साहित्यिक सुनीताराजे पवार म्हणाल्या, विचारांची संपन्नता, साधेपणा असे व्यक्तीमत्व आज आपल्यात नाही. त्यांचे दुखंद निधनाची बातमी आल्यानंतर पाठीवरचा मायेचा हात कुणीतरी काढून घेतल्यासारखं वाटले. या महाराष्ट्राला वडिलांचे आणि आईचे प्रेम या छत्रपती घराण्याने दिले आहे.
वि. ना. लांडगे म्हणाले, शिवाजीराजे भोसले हे माझे 1963 ते 1985 साली माझे वर्गमित्र होते. सुदाम आणि कृष्णाचं नातं होतं तसे आमचे नाते होते. ते राजे नव्हते उत्तम साहित्यिक होते. साहित्य क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे.
जिल्हा पोलिस प्रमुख अजय बन्सल म्हणाले, शिवाजीराजे भोसले यांचे व्यक्तीमत्व खूप मोठे होते. त्यांच्याशी माझा व्यक्तीगत संपर्क झाला नाही हे माझे दुर्देव आहे. त्यांच्यावर लोकांचे प्रेम दिसते ते त्यांनी कमावलेले आहे. छत्रपतींचा वारसा त्यांना भेटला होता. तो वारसा ते पुढे घेवून गेले. त्यांचे विचार पुढे घेवून गेले पाहिजे.
यावेळी डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, प्रकाश गवळी, अॅड. बाळासाहेब बाबर, किशोर शिंदे, डॉ. शाम बडवे, चंद्रकांत नलावडे, मनोज कान्हेरे, ल. गो. जाधव, राजू गोडसे, सिध्दार्थ लाटकर, विश्वासराव देशमुख यांच्यासह मान्यवरांनी शोक व्यक्त केला. यावेळी अमोल मोहिते, सुहास राजेशिर्के, फिरोज पठाण, प्रशांत आहेरराव, वसंतशेठ जोशी, अनिता घोरपडे, सुशांत मोरे, यांच्यासह सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक, सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. नंदकूमार सावंत यांनी सूत्रसंचालन केले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |