12:20pm | Sep 12, 2022 |
नवी दिल्ली : मोटर अपघातात मृत्युमुखी पडणाऱया व्यक्तींच्या कुटुंबियांना नुकसानभरपाई देताना मृत व्यक्तीच्या उत्पन्नावर आधारीत नुकसानभरपाई दिली पाहिजे. मृत व्यक्ती शेतकरी होता की कुशल कामगार होता याचा विचार केला पाहिजे, असे मत सर्वोच्च न्यायालयाने आज नोंदवले.
न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर अपघाताची दोन प्रकरणे सुनावणीसाठी आली होती. याचिकाकर्त्यांनी केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात अपील केले होते. मोटर अपघात दावा लवादाकडून (एमएसीटी) कमी नुकसानभरपाई मिळाल्याचे त्यांचे म्हणणे होते.
पहिल्या प्रकरणात एका अननस पिकवणाऱया शेतकऱयाच्या मुलाला 26.75 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली होती. त्या शेतकऱयाचे मासिक उत्पन्न 12 हजार रुपये असल्याचे एमएसीटीने गृहित धरले होते. परंतु उच्च न्यायालयाने ते कमी करून 10 हजार रुपये केले होते, असा याचिकाकर्त्याचा दावा होता. त्या प्रकरणावर आदेश देताना खंडपीठाने सांगितले की, ''1 ऑक्टोबर 2015 रोजी त्या शेतकऱयाचा अपघातात मृत्यू झाला होता. त्याच्या उत्पन्नाचे कोणतेही कागदोपत्री पुरावे नसल्याने एमएसीटीने गृहित धरलेल्या 12 हजार रुपये उत्पन्नाच्या निर्णयात उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करणे न्यायपूर्वक नाही. संबंधित शेतकऱयाला 26.75 लाख नुकसानभरपाईतील उर्वरित रक्कम एका महिन्याच्या आत नऊ टoक्के व्याजदराने देण्यात यावी.''
दुसरे प्रकरण सुतारकाम करणाऱया व्यक्तीचे होते. त्याचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना 24.59 लाख रुपये नुकसानभरपाई एमएसीटीने निश्चित केली होती. त्याचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये गृहित धरले गेले होते. मात्र उच्च न्यायालयाने ते 10 हजार ठरवले. त्या प्रकरणातही सर्वोच्च न्यायालयाने एमएसीटीचाच निर्णय योग्य ठरवला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |