04:51pm | Oct 14, 2020 |
अजित जगताप
सातारा: सातारा जिल्ह्यात नैसर्गिकरित्या बदल झाल्याने आज सकाळ पासूनच ढगाळ वातावरण व पावसाच्या सरी कोसळत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. काही ठिकाणी साथ पसरण्याची भीती वाटत आहे. हवामान खात्याने दि. 13 ते 17 ऑक्टोबरमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. कोकण किनारपट्टीसह मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात पावसामुळे काही प्रमाणात जन जीवन विस्कळीत झाले आहे.
यंदाच्या वर्षी बर्यापैकी सातारा जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढल्याने अतिवृष्टीमुळे शेती व पूरक व्यवसायाचे नुकसान झाले असून ऑक्टोबरची 15 तारीख उजाडली तरी सातारा जिल्ह्यातील कृषी विभागाला शेती व शेतकर्यांच्या नुकसानीचा अंदाज बांधता आला नाही. त्यातच कृषी व महसुल विभागाचे काही कर्मचारी कोरोना बाधित झाले तर काही ठिकाणी कोरोना संसर्ग असल्याने कृषी विभागाला शेतकर्यांना दिलासा देण्यास सवड नाही.
ऊस बिलासाठी सातारा शहरात एका सहकारी साखर कारखानदाराच्या दारात दहा दिवसांपासून शेतकरी संघटनेचे नेते आंदोलन करीत आहेत. त्यांना भेटून त्यातून मार्ग काढावा असे सातारा जिल्ह्यातील कृषी अधिकारी वर्गाला वाटत नाही. अशा अधिकार्यांना कशाला हवे भत्ते व सातवा वेतन? अशा शब्दात शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहेत. सध्या बदलत्या हवामानामुळे शेती पीक सुरक्षित रित्या कुठे ठेवले पाहिजे? याची चिंता लागली आहे. पावसामुळे रस्ते, पाणंद, गायरान व उतार असलेल्या जमिनीत पाणी व मातीमुळे चिखल साचला आहे.जावळी, पाटण, महाबळेश्वर, सातारा, वाई व कोरेगाव, खटाव, माण, कराड, खंडाळा तालुक्यातील काही गावात चरायला घेऊन जाणारी जनावरे दावणीला बांधून ठेवण्याशिवाय पर्याय राहिला नाही. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
थंडीत काकडून गरीब बसले आहेत. ज्यांच्या डोक्यावर छत नाही. ते पाऊस थांबण्याची वाट पहात आहेत. कोरोनामुळे सहा महिने सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. सुमारे पाचशे कोटी रुपये यासाठी सातारा जिल्ह्यात खर्च झाले आहेत, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, शेतकर्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्याऐवजी सरकार व विरोधी पक्ष हे राजकारणात अडकून पडले आहेत. ‘‘देव देवर्यात नाही, देव नाही देवलाई, देव अंतरात नांदी,, असे संतांनी लिहून ठेवले आहे. त्याचा विसर राजकारणी मंडळींना पडल्याने खरे गरीब भरडले जात आहे. त्यांच्यावर उपकार म्हणून निसर्गानेच संयम दाखवावा अशी शेतमजूर,कष्टकरी व रोजदारी करणार्या वर्गाकडून होऊ लागली आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |