01:36pm | Aug 07, 2020 |
सातारा: सातारा- जावली मतदारसंघासह सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई परिसरात राहत आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी मोठ्या संख्येने येत असतात. महाराष्ट्र शासनाने कोकण विभागातील चाकरमान्यांसाठी १४ दिवसांचा असलेला क्वारंटाईन कालावधी कमी करून तो १० दिवस केला आहे. त्याच धर्तीवर मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनाही क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा करावा अशी मागणी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली आहे.
याबाबत आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. निवेदनात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे की, कोरोना महामारीपासून बचावासाठी शासनाने घालून दिलेली बंधने, अटी, नियम आणि सूचनांचे पालन करणे हे प्रत्येकासाठी बंधनकारक आहे. काही दिवसांवर गणेशोत्सवचा सण आला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई परिसरात राहत आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या मूळ गावी मोठ्या संख्येने येतात. गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्र शासनाने कोकण विभागातील चाकरमान्यांसाठी १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी कमी करून तो १० दिवस केला आहे. त्याच धर्तीवर मुंबईहून सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांनाही क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा करणे आवश्यक आहे.
गावाकडे येणारे चाकरमानी हे काही दिवसांसाठीच गावाकडे येतात आणि सण संपला कि लगेच ते नोकरीच्या ठिकाणी परततात. त्यांना १४ दिवस क्वारंटाईन ठेवल्यास त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. याचाच विचार करून शासनाने कोकण विभागात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाईनचा कालावधी १० दिवसांचा केला आहे. त्यामुळे कोकणाप्रमाणेच सातारा जिल्ह्यात गणेशोस्तवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांसाठीही १४ ऐवजी १० दिवस क्वारंटाईन कालावधी ठेवावा अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन ना. पाटील यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांना दिले.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |