12:27pm | Jun 30, 2022 |
मुंबई : विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करीत पक्षाच्या अन्य आमदारांसह वेगळी भूमिका घेतल्याची स्पष्ट कल्पना आल्यानंतरही शिवसेनेचे महाराष्ट्र आणि मुंबईत जवळपास ३० ते ३५ आमदार होते. मात्र, या आमदारांना रोखण्याची रणनीती तातडीने आखण्यासाठी दमदार पावले उचललीच गेली नाहीत. त्याचवेळी शिंदे यांनी यांनी मूळ शिवसेना आणि पक्षाचे चिन्ह पळविण्याबाबत खेळी केल्याने स्थानिक नेते विभागवार बैठका आणि शिवसेनेच्या शाखांचा ताबा घेण्यात व्यस्त झाले. हीच बाब हेरून शिंदे यांनी पक्ष ताब्यात घेणे तात्पुरते बाजूला ठेवून आवश्यक असलेल्या उर्वरित आमदारांची जुळवाजुळव करीत राज्यातील सरकारलाच शह दिला.
दहा दिवसांपूर्वी विधान परिषद निवडणुकीचे निकाल रात्री उशिरा लागण्यास सुरुवात होत असतानाच शिंदे शिवसेनेच्या आमदारांसोबत सूरतला रवाना झाले. सुरुवातीला नॉट रिचेबल झालेले शिंदे नाराज असावेत, एवढाच शिवसेनेत कयास मांडला गेला. मात्र त्यांच्यासोबत काही आमदार असल्याची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली आणि लगेचच शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांची शोधाशोध सुरू केली. दुसऱ्या दिवशी शिंदे हे जवळपास दहा ते १५ आमदारांना घेऊन बाहेर पडल्याची निश्चित माहिती शिवसेनेच्या हाती आली.
शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याची मोहीम
शिंदे यांच्या या सर्व खेळीला शह देण्यासाठी शिवसेनेच्या गटनेतेपदी अजय चौधरी यांची नियुक्ती केली. हे सर्व सुरू असतानाच शिंदे यांच्या गटातून मूळ शिवसेना पक्ष तसेच पक्षाचे चिन्ह असलेले धनुष्यबाण यावर ताबा कसा मिळवता येईल, यासाठीचे प्रयत्न सुरू झाल्याची माहिती शिवसेनेच्या गोटात आली. त्यामुळे लगेचच शिवसेनेच्या नेत्यांनी विभागवार बैठका घेत पक्षाची फूट रोखण्याचे प्रयत्न सुरू केले. शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दादर-माहीममधील शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याची मोहीम सुरू केली. उपशाखा प्रमुखांकडून तशी प्रतिज्ञापत्रेही करण्याचा सपाटा लावण्यात आला.
शिंदे यांच्या रणनीतीने घात
शाखा ताब्यात घेण्याचा झपाटा सुरू असताना शिवसेनचे ३० ते ३५ आमदार पक्षासोबतच होते. या आमदारांना पश्चिम बंगाल वा अन्य कोणत्या राज्यात एकत्रितरित्या ठेवण्याबाबतची चर्चा शिवसेनेच्या नव्या गटनेत्याकडून छेडली गेली. मात्र त्यावर फारशी कार्यवाही झाली नाही. शिवसेनेचे नेते हे पक्ष, चिन्ह वाचविण्याच्या नादात व्यस्त असल्याचे हेरत शिंदे यांनी त्यांच्या गटाला पक्षांतर बंदी कायद्याचा फटका बसू नये, यासाठी प्रयत्न सुरू केले. गटाची संख्या वाढविण्याच्या हालचाली सुरू केल्या. शिवसेनेचे जे आमदार मुंबई आणि महाराष्ट्रात आहेत, त्यांच्याशी संपर्क साधत त्यांना आपल्या गटात सामील करण्याची रणनीती आखली. हे आमदार वेळीच रोखले असते तर शिंदे यांनी सुरू केलेली लढाई शिवसेनेला त्यांच्या पद्धतीने संपवता आली असती. मात्र शिंदे पक्षावर आघात करीत आहेत हे पाहून शिवसेना वाचविण्यासाठी प्रयत्न झाले आणि शिंदे यांनी नेमकी हीच संधी साधत राज्यातील सरकारच हिरावून नेले.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |