नागठाणे : 26/04/24- सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधीच्या आयकर नोटीसा बजावल्या, तेव्हा महाराष्ट्रातील कथीत थोर नेते सत्तेवर होते. आयकराच्या बोजातून त्यांनी कारखान्यांना का बाहेर काढले नाही? ही जनता वाडगं घेऊन आपल्या मागे मागे फिरली पाहिजे अशी त्यांची भावना होती. आधी अडचणीत आणायचं आणि उपकार करण्याचा आव आणण्याची त्यांची जुनी पद्धत आहे, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली.
नागठाणे येथे आयोजित केलेल्या कार्यकर्त्यांच्या संवाद मेळाव्यात ते बोलत होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज घोरपडे, राष्ट्रवादी सेवादलाचे राजेंद्र लवंगारे, माजी सभापती सुनील काटकर, वसंतराव जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, अनिल साळुंखे, आनंदराव नलावडे, श्रीरंग गोरे, अजिंक्यतारा सहकारी कारखान्याचे चेअरमन यशवंत साळुंखे, लालासाहेब पवार, नंदकुमार नलावडे, शंकर साळुंखे, संजय मोहिते, रामभाऊ जगदाळे, माजी जिल्हा परिषद सदस्य समृद्धी जाधव, हरिभाऊ साळुंखे, माधवराव गुरव, पृथ्वीराज निकम, विश्रांतीताई साळुंखे आदींचे प्रमुख उपस्थिती होती.
उदयनराजे पुढे म्हणाले, काही नेत्यांना आपल्याबरोबरच्या लोकांना अवलंबून ठेवायचे सवय असते. आपल्या सोबत असणाऱ्यांचं ते नुकसानच करतात. स्वर्गीय आमदार अभयसिंहराजे भोसले, विलासकाका पाटील उंडाळकर ही कर्तबगार मंडळी होती पण त्यांच्या योगदानाची कदर केली गेली नाही. अभयसिंह महाराज सोबत उभे राहिले तरी त्यांना अपमानास्पदरीत्या बाजूला करण्यात आले. युज अँड थ्रो अशी संबंधित नेत्यांची जुनीच रीत आहे.
या प्रसंगी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, भाजप विरोधी असलेले नेते धादांत खोटं बोलून लोकांचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपा बहुजनांचा पक्ष नाही अशी टीका केली जाते. परंतु आम्ही सर्वजण नेते हे बहुजन समाजातील शेतकरीच आहोत. भारतीय जनता पार्टीने सातारा, जावळी विधानसभा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोट्यावधीचा निधी देऊन विकास कामे केली आहेत. त्यामुळे भाजपकडे बघण्याचा दृष्टिकोन सर्वांनी बदलावा. तो अधिक व्यापक करावा. देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येणार आहेत. त्यामुळे प्रवाहात राहून काम करायला हवे. उदयनराजे भोसले यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी सगळ्यांनी सज्ज व्हावे.
धैर्यशील कदम म्हणाले, भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. पण राज्यात सत्तांतर झाल्यावर उद्धव ठाकरे सरकारने मिळालेला आरक्षण घालवलं होतं. आता एकनाथ शिंदे सरकारने टिकाऊ असे दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे.
मनोज घोरपडे म्हणाले देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येकाने पक्षासाठी वेळ देणे गरजेचे आहे. विकसित भारताचा पाया पाच वर्षात रचला जाणार आहे. येणाऱ्या काळात सगळ्यांचे सोनं होण्यासाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा.
भाऊसाहेब महाराजांना मंत्रिमंडळातून बाहेर का ठेवलं?
भाऊसाहेब महाराज मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले असते, परंतु नेत्यांच्या पाठीशी उभे राहत त्यांनी राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पुढे राज्य सरकार स्थापन झाले. परंतु भाऊसाहेब महाराजांना जाणीवपूर्वक मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं गेलं. जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांना देण्यात आलं नाही. असं का केलं गेलं याचे उत्तर संबंधित नेत्यांनी द्यावं, असं आव्हान आमदार शिवेंद्रसिराजे भोसले यांनी दिले.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |