सातारा : सातारा जिल्ह्यातील बागायतदार गाव अशी ख्याती असलेल्या लिंब गोवे परिसरात पेरु फळानंतर आंब्याची मोठी लागवड केली जाते. सध्या अनेक जातीची आंब्याची झाडे मोहरले असून काही आंबे पिकलेले आहेत. पण आंबे काढण्यासाठी गडी मिळत नसल्याने अडीच हजार डझन आंबे फांदीवर लटकून राहिले आहेत. हे आंबे उतरवण्यासाठी मजूर मिळत नाहीत. हे आंबे वेळेत उतरवले नाहीत तर शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्याची वेळ शासनावर येईल, अशी भीती लिंब गावचे प्रगतशील शेतकरी शिवाजीराव सावंत- पाटील यांनी व्यक्त केली आहे. भाजप सरकारने अशा शेतकर्यांसाठी एखादी योजना कार्यान्वित करावी, अशीही मागणी केली आहे.
सातारा तालुक्यात राजकीयदृष्ट्या प्रगत असलेल्या लिंब गावच्या हद्दीतून पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्ग जातो. त्यामुळे येथील शेती उत्पन्नाला पुणे-मुंबई, नवी मुंबई येथे नवी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. सध्या दररोज किमान 20 गाड्या भरुन शेतीमाल या बाजारपेठेत जातो. पण किरकोळ विक्री वगळता अद्यापही मोठ्या प्रमाणात लिंब येथील आंबे बाजारात येवू शकलेले नाहीत. हापूस, रत्ना, केसरी, पायरी या जातीचे आंबे सध्या झाडावर मोठ्या प्रमाणात दिसत असले आणि फळ अगदी मोठे झाले असले तरी मजुराअभावी ते काढता येत नाहीत. मजूर शोधण्यासाठी पहाटेपासूनच कष्टकरी, शेतमजूर यांच्या घरी फेरफटका मारावा लागत आहे. सध्या निपाह या व्हायरसच्या भीतीमुळे अनेकजण झाडावर चढण्यास तयार होत नाहीत. त्यामुळे हातातोंडाशी आलेले आंब्याचे उत्पन्न उतरविण्यापेक्षा काही मजूर हे उपजिविकेसाठी ग्रीन हाऊस, हॉटेलमध्ये वेटर किंवा हलक्या दर्जाच्या शेतीच्या कामाला जात आहेत. तरुणाई ही मोबाईलच्या पायी अडकून पडल्यामुळे वयोवृद्ध पालक आंबे उतरविण्यास तयार आहेत, परंतू दुर्दैवी घटना घडल्यास आंब्यांपेक्षा मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे. या भीतीपोटी आता लिंबात आंबे काढण्यासाठी गडी मिळत नाहीत.
सध्या शिवाजीराव पाटील यांनी 2 एकरामध्ये आंब्याची बाग फुलवली आहे. गेल्यावर्षी आंब्याचे उत्पन्न कमी व आंबे काढण्यासाठी मजूर जास्त आल्यामुळे फार फायदा झाला नाही. परंतू यंदाच्या वर्षी आंब्याचे विक्रमी उत्पादन झाले, पण आंबे काढण्यासाठी मजूर मिळत नसल्याने शेतकर्यांची अवस्था बुरे दिन अच्छी रात अशी झाली आहे. त्यामुळे आता शेतकर्यांनाच आंबे उतरविण्यासाठी झाडावर चढण्याची वेळ आली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |