सातारा : (गजानन चेणगे) सातारा शहरातील पोवई नाक्यावर ग्रेड सेपरेटरचे महत्वाकांक्षी काम सुरू झाल्यामुळे नाक्याकडे येणारे जवळपास सर्वच प्रमुख रस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून सातारकरांची न भूतो न भविष्यति अशी पुरती नाकाबंदीच झाली आहे. गल्लीबोळे तसेच पर्यायी मार्ग शोधताना वाहनधारकांची अक्षरश: दमछाक होत आहे. दुचाकीधारकांचीच अशी अवस्था झाली असेल, तर चारचाकी वाहनधारकांना किती यातना होत असतील याची कल्पनाच केलेली बरी.
पोवई नाका म्हणजे साताऱ्याचे नाक. या पोवई नाक्यावर निरनिराळ्या दिशांनी आठ रस्ते येऊन मिळतात. साहजिकच नाक्यावर येणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड. पोवई नाक्यावर आल्याशिवाय सातारकरांचे पानही हलत नाही अशी तऱ्हा आहे. दैनंदिन व्यवहारासाठी नाक्यावर लोकांचा कायमच राबता असतो. शहरातील लोकांना पूर्वेकडील भागात जाण्यासाठी पोवई नाका हा मुख्य मार्ग. त्याच पध्दतीने अन्य भागातील लोकांना शहरात येण्यासाठी पोवई नाकाचं ओलांडावा लागतो. सांगली - कोल्हापूर, पंढरपूर, रहिमतपूरकडून येणाऱ्या एसटी बससह सर्वच वाहनांना पोवई नाक्यावरून बस स्थानकाकडे जाता येते. या सर्वच व्यवस्थेची आता दाणादाण उडाली आहे. वाहतुक व्यवस्था कोलमडून पडली आहे. लोकांची चहुबाजुंनी कोंडी झाली आहे.
भुयारी मार्गासाठी नाक्यावर अवाढव्य यंत्रसामुग्री वापरून रस्त्यांची खुदाई करण्याचे काम सुरू झाले असून ते वेगाने सुरू आहे. जसजसे काम पुढे जाईल, तसतसे त्या त्या बाजुचे रस्ते वाहतुकीसाठी बंद केले जात आहेत. वाहनधारक एक रस्ता बंद आहे म्हणून दुसऱ्या रस्त्याला वळतात, तर तिकडेही रस्ता बंद केल्याचे पहायला मिळते. त्यामुळे पर्यायी रस्ते शोधताना वाहनधारकांची दमछाक झालेली पहायला मिळत आहे. परिणामी रस्तोरस्ती सध्या वाहतुक कोंडीचे चित्र दिसत आहे. वाहतुक नियंत्रण करण्यास पोलीस यंत्रणाही अपुरी पडत असून या कामासाठी उत्साही, होतकरू स्वयंसेवकांना ट्रॅफिक वॉर्डन म्हणून पुढे येण्याचे आवाहन पोलीस दलाने केले आहे. शहरात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाल्याचे हे निदर्शक आहे.
या कामामुळे पोवई नाक्यावरील व्यवसायांवर प्रतिकूल परिणाम झाला असून हा ग्राहक शहराच्या अन्य भागातील दुकानांकडे वळताना दिसत आहे. नाक्यावरील व्यवसायांना हे काम पूर्ण होईपर्यंत मंदीला सामोरे जावे लागणार असल्यामुळे व्यापारी काळजीत पडले आहेत. कामाची व्याप्ती पाहता काम निर्धारित वेळेत पूर्ण होण्याविषयी लोक साशंक आहेत. संबंधित वंâपनीने निर्धारित वेळेच्या आधीच काम पूर्ण करण्याचा संकल्प केला असला तरी या कामाला किमान दोन - अडिच वर्षे लागतील असे लोकांना वाटते. पुणे - बंगळुरू राष्ट्रीय महामार्गातील सातारा ते पुणे दरम्यानच्या सहापदरीकरणाच्या कामाचे उदाहरण लोकांपुढे आहे. मूळच्या मुदतीत हे काम पूर्ण झाले नाही. पुन्हा पुन्हा कामाला मुदतवाढ देऊनदेखील अद्यापही सहापदरीकरणाचे काम अपुरेच आहे. त्यामुळे या कामाच्या बाबतीत काय होते याचा लोकांना प्रश्न पडला आहे.
एसटीची प्रासंगिक भाडेवाढ :
या कामाची झळ केवळ साताऱ्यातील लोकांनाच बसली आहे, असे नाही. सातारला येणाऱ्या सर्वच प्रवाशांच्या खिशाला याची प्रत्यक्ष झळ बसली आहे. सांगली, कोल्हापूर, पंढरपूर, सोलापूर, रहिमतपूर, औंधकडून सातारला येणाऱ्या एसटी बसेसना बस स्थानकावर येण्यासाठी शिवराज पंप, अजंठा चौक, बाँबे रेस्टॉरंट चौक हे सर्व मार्ग आता बंद आहेत. पुण्याकडून येणाऱ्या बसेससह या अन्य मार्गावरून येणाऱ्या बसेसना आता वाढे फाट्यावरून दूरचा वळसा मारून शहरात यावे लागत आहे. याच मार्गाने पुन्हा महामार्गावर जावे लागत आहे. यामध्ये एसटीला जादा अंतर पार करावे लागत असल्यामुळे एसटीने प्रवास तिकिटात सहा रूपयांची वाढ केली आहे. पोवई नाक्यावरील काम पूर्ण होऊन तिथून पूर्ववत वाहतुक सुरू होईपर्यंत प्रवाशांना हा भुर्दंड सोसावा लागणार आहे. त्यामुळे सर्वचजण चिंतेत असून हे काम कधी पूर्ण होईल याकडे सर्वजण डोळे लावून बसले आहेत.
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे आताच वाहतुक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. पण खरा गोंधळ कास पुष्पपठारावरील फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर उडणार आहे. दरवर्षी फुलांच्या हंगामात जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठाराला देशविदेशातील लाखो पर्यटक - निसर्गप्रेमी भेट देत असतात. त्यांच्या हजारो वाहनांमुळे कास मार्गावरील यवतेश्वर घाटात वाहतुक कोंडी होत असते. त्याच पध्दतीने ठोसेघर धबधब्याच्या हंगामाचाही साताऱ्यातील वाहतुकीवर भार पडत असतो. कास तलाव, बामणोली, चाळकेवाडी पठार, सज्जनगड या ठिकाणीही दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. ही वाहने प्रामुख्याने पोवई नाक्यावरून कासकडे रवाना होतात. पुढे उद्भवनाऱ्या या समस्येचाही विचार यासंबंधीचे नियोजन करताना आवर्जुन करावा लागणार आहे. या सर्व पर्यटनस्थळांकडे मुंबई - पुण्याकडून येणाऱ्या पर्यटकांनी पोवई नाका टाळण्यासाठी आनेवाडी टोल नाक्यानंतर येणाऱ्या लिंब खिंडीतून जुन्या मार्गाने सातारा शहराकडे येऊन शहराच्या प्रारंभी असणाऱ्या मोळाच्या ओढ्यापासून राजवाडा, बोगदामार्गे पर्यटनस्थळाकडे जाणे सोयीचे होईल. तसेच सांगली, कोल्हापूरकडून येणाऱ्या पर्यटकांनी शेंद्रे गावातूनच डावीकडे वळून बोगदामार्गे आल्यास सुसह्य होऊ शकते. पण या उपायांचा साताऱ्यातील पर्यटन व्यवसायावर काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम होऊ शकतो.
काम वर्षात पूर्ण करण्याचा निर्धार !
पोवई नाक्यावरील प्रचंड वाहतुकीच्या भारातून रस्त्यांना मोकळा श्वास घेता यावा, वाहतुक कोंडीची समस्या सुटावी यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत नाक्यावर येणारे सर्व रस्ते भुयारी मार्गाने जोडण्यात येणार आहेत. त्यातून वाहतुक वळणार असल्याने भविष्यात नाक्यावरील वाहतुक कोंडीची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून प्रकल्प पूर्ण होणार असून त्यासाठी ७० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. महाडच्या सावित्री नदीवरील पुलाचे काम एका वर्षात पूर्ण करणाऱ्या टी. अँड टी. कंपनीला हे काम देण्यात आले आहे. काम पूर्ण करण्याचा नियोजित कालावधी १८ महिन्यांचा आहे. मात्र या कंपनीने एका वर्षात हे काम पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर सातारकरांना पोवई नाक्यावरून जाणे सुसह्य होणार आहे. पण तोपर्यंत कळ सोसण्याशिवाय पर्याय नाही.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |