नवी दिल्ली : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा एकदा राम मंदिरावर मोठे विधान केले आहे. राम मंदिरासाठी जनतेची सहनशीलता आता संपत चालली आहे. जर सुप्रीम कोर्ट या वादावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सक्षम नसेल तर कोर्टाने हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा प्रश्न सोडवू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केलेय. राम मंदिराचा प्रश्न तुम्ही चर्चेतून सोडवणार का?, की अन्य दुसऱ्या मार्गाने?, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारल्यावर त्यांनी वरील विधान केले. राम मंदिराचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा, अशी जनतेची मागणी आहे. राम मंदिराचा प्रश्न सोडवण्यास सुप्रीम कोर्ट असक्षम असेल तर त्यांनी हे प्रकरण आमच्याकडे सोपवावे, आम्ही २४ तासांत हा वाद निकाली काढू, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.
राम मंदिराचा प्रश्न देशभरात सध्या चांगलाच चर्चेत आहे. राम मंदिर प्रश्नी 29 जानेवारीला सुप्रीम कोर्ट काय म्हणणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिर झालेच पाहिजे अशी मागणी देशभरातील आणि खासकरुन उत्तर प्रदेशातील साधू संतांकडूनही होते आहे. अशात शिवसेनेनेही राम मंदिर प्रश्नी आवाज उठवला आहे. राम मंदिर झालेच पाहिजे अशी घोषणा करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अयोध्येचा दौरा केला. एवढंच काय तर शिवसेनेसह अनेक पक्षांनी आणि साधू संतांनी राम मंदिर प्रश्नी अध्यादेश काढावा अशीही मागाणी केली. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार ते पाहू त्यानंतर अध्यादेश काढण्याचे ठरवू अशी भूमिका घेतली आहे.
एकीकडे पंतप्रधानांनी अशी भूमिका घेतलेली असतानाच लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मात्र कोर्टाला जमत नसेल तर आम्ही चोवीस तासात राम मंदिराचा प्रश्न सोडवू असे म्हटले आहे. आता योगी आदित्यनाथ यांच्या या वक्तव्याचे पडसाद कसे उमटणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |