सातारा : सातारा तालुक्यातील नागरी सुविधा व स्वच्छतेबाबत गावोगावी संदेश देण्याचे काम सातारा पंचायत समितीच्या कार्यालयामार्फत होते. त्याच कार्यालयाच्या आवारात वर्षभर कानाकोपर्यामध्ये असलेला कचरा व अस्वच्छतेची युती कायम असते. परंतू सध्या पंचायत राज समितीचे सन्माननीय आमदार सदस्य आज पंचायत समिती कार्यालयाच्या भेटीला येणार आहेत. त्यामुळे पीआरसीच्या स्वागतासाठी सातारा पंचायत समिती आवाराने कात टाकली आहे. अनेक मजूर भर उन्हातही डागडुजीसाठी झटताना दिसत आहेत.
महाराष्ट्रातील विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सर्वपक्षीय आमदारांची एक समिती गठीत केली आहे. पंचायत राज समिती (पीआरसी) हे नुसते नाव ऐकले तरी अनेक शासकीय अधिकारी-कर्मचार्यांच्या उरात धडकी बसते. कारण ही समिती स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेल्या कामाची पाहणी करुन अहवाल तयार करते. या अहवालाला सरकार दरबारी मानसन्मान असतो. काही त्रुटी राहिल्या असतील, तर त्याबाबत सुधारणा करण्याचीही संधी मिळते. गंभीर चुका आढळल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचीही सूचना केली जाते. सध्या सातारा जिल्ह्यात पीआरसीच्या आगमनामुळे अनेक ठिकाणी अघोषित स्वच्छता अभियान सुरु झाले आहे. सातारा पंचायत समितीचा मुख्य दरवाजा बंद करुन पीआरसीच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला रस्त्याचे डांबरीकरण सुरु झाले आहे. स्वच्छतागृह व परिसर स्वच्छ केला गेला आहे. ही स्वच्छता पाहून पीआरसीचे सदस्य जाम खूश होतील, याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. ही स्वच्छता वर्षभर टिकविण्यासाठी पंचायत समितीने काय उपाययोजना केल्या आहेत, याची विचारणा समिती सदस्यांनी केल्यास ‘दर्पण झुठ न बोले’ याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सुरु आहे.
विशेष म्हणजे सातार्यातील स्वच्छता मोहीम पाहण्यासाठी पीआरसीचे अध्यक्ष, आमदार खास विमानाने पुणे येथे येणार आहेत. तेथून ते सातारला आल्यानंतर त्यांच्या सेवेसाठी संघटनेचे अध्यक्ष सढळ हस्ते सढळ वेळ देत आहेत. या समितीसाठी प्रीती, राजतारा येथील वातानुकूलित खोल्या आरक्षित केल्या आहेत. तसेच त्यांच्या सेवेसाठी असणार्या त्यांच्या स्टाफसाठी शासकीय विश्रामगृहसुद्धा तयार करण्यात आले आहे. या समितीने एका दिवसात चांगला अभिप्राय द्यावा, यासाठी कोणतीही कुचराई ठेवण्यात आलेली नाही. दरवेळी शासकीय कर्मचार्यांकडून अशा समित्यांसाठी खास बाब म्हणून पुरवठा केला जात असतो. त्याचा इन्कारही केला जातो. पण यंदाच्या वेळी मार्च अखेर नंतर समितीचे आगमन झाल्यामुळे ‘होवू द्या खर्च... नंतर करु नीटनेटकं’ अशा पद्धतीने समितीसाठी पंचायत समितीने आर्थिक कातसुद्धा टाकली आहे. कोंबडं कितीही झाकण्याचा प्रयत्न केला, तरी पहाट होतेच. त्या पद्धतीने पिण्याचे पाणी व शौचालयातील पाण्याचा प्रश्न आजही कायम असून सातारा तालुक्यातून येणार्या ग्रामस्थांची व कर्मचार्यांची गैरसोय कायम आहे. याबाबत सन्माननीय समिती सदस्यांनी डोळेझाक करु नये, अशी मागणी सातारा तालुक्यातील ग्रामस्थांनी केली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |