सातारा : सत्तेत रहायचं आणि विरोधही करायचा... ही दोन दगडावर पाय ठेवण्याची वृत्ती शिवसेनेने थांबवावी आणि अर्धनारी नटेश्वराची भूमिका बंद करावी असा जोरदार हल्लाबोल अजित पवार यांनी साताऱ्यातील जाहीर सभेत शिवसेनेच्या दुटप्पी भूमिकेवर केला.
हल्लाबोल आंदोलनातील सातव्या दिवसाची शेवटची जाहीर सभा रविवारी सातारा शहरात पार पडली. न भूतो न भविष्यती अशाप्रकारची सभा आमदार शिवरेंद्रराजे भोसले यांनी केली. सुरुवातीला सातारा शहरातून भव्य अशी अजितदादा,प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
दादा पुढे म्हणाले की,आज या भाजपच्या राज्यात एकही समाज समाधानी नाही. या साताऱ्याने साहेबांना खूप प्रेम दिलं म्हणून या भागाची कधीच अडचण होवू नये अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आघाडी सरकार असताना अनेक योजना या भागासाठी आम्ही आणल्या. मात्र हे सरकार काही करत नाही.
अहमदाबाद, गुजरातचे महत्त्व वाढवण्यासाठी बुलेट ट्रेन आणली जात आहे. एवढया पैशात सर्व शेतकऱ्यांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला असता असेही दादा म्हणाले.
या सरकारने मोठमोठया उद्योगपतींचे कर्ज माफ केले जाते मात्र आमच्या शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जात नाही. शेतकरी मोडकळीस आला आहे मात्र सरकार त्याची दखल घेत नाही.
या सरकारच्या काळात तरुणवर्ग मोठया प्रमाणात नाराज आहे. मुंबईत तरुणांनी रेल्वे रोको आंदोलन केले होते. सरकारने थातुरमातुर उत्तर दिले. ते तरुण आजही नाराज आहे. राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. पंतप्रधान यात हस्तक्षेप करत नाही, का मुख्यमंत्री दखल घेत नाही, का सुभाष देशमुख पाठपुरावा करत नाही. आज जर या भागाला सावरले नाही तर भविष्यात मोठी अडचण होईल अशी भीती दादांनी व्यक्त केली.
सोशल मीडियाचा वापर करून भाजप सत्तेत आला पण आता हेच सोशल मीडिया अडचणीचं ठरत आहे. तरुण वर्ग आज म्हणत आहे की, आमच्या मागच्या पिढीने भाजपला मतदान का केले नाही ते आज कळले.
अहमदनगरला कोणाची तरी गोळ्या झाडून हत्या केली गेली. तिथे मुद्दाम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराला अटक केली गेली. राष्ट्रवादीच्या आमदाराला का अटक करण्यात आली. हे सगळं राष्ट्रवादीचा महाराष्ट्रात वाढता झंझावात लक्षात घेत राष्ट्रवादीला बदनाम केले जात आहे. दोषी आहे त्यावर कारवाई केली जाईल. ज्याने गोळ्या झाडल्या त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तरीही राष्ट्रवादीच्या आमदाराला यात गोवले जात आहे असेही दादांनी नगरच्या राष्ट्रवादी आमदाराच्या अटकेवर जाहीर सभेत भाष्य केले.
शेतकऱ्यांच्या आसुढानेच सरकारला फटकारणार : सुनिल तटकरे
शेतकऱ्यांनी दिलेल्या आम्हाला सातारचा आसुढ भेट म्हणून दिला आहात.त्या आसुढानेच या सरकारला फटकारणार असल्याचा जबरदस्त आशावाद आमदार सुनिल तटकरे यांनी कोरेगावच्या जाहीर सभेत व्यक्त केला.
या सभेआधी इथे अवकाळी पाऊस झाला होता. सभा होणार की नाही याबाबत शंका होती. नियतीच्या मनात सर्व हिशोब बरोबर करण्याचे असते म्हणून पाऊस था़बला आणि ही आपली सभा विराट अशी झाली.
यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला जी परंपरा दिली ती परंपरा मोडीत काढली जात आहे. राजकारणाने अतिशय खालची पातळी गाठली आहे. भाजपने काल तुमचे आमचे नेते पवार साहेबांवर टिका केली. यांना सत्तेची मस्ती आली आहे अशी जोरदार टिका सुनिल तटकरे यांनी केली.
संपूर्ण देशात प्रचंड मोदी लाट असताना साताऱ्याने आमच्या बाजूने कौल दिला त्याबाबत सातारकरांचे जाहीर आभार सुनिल तटकरे यांनी मानले.
आदरणीय पवार साहेबांच्या निर्णयांमुळे आयात करणारा देश निर्यात करणारा झाला. आज देशभरातील नागरिक आणि शेतकरी पवार साहेबांची वाट पाहत आहे.
या खोटारड्या सरकारला पायउतार केल्याशिवाय आपण स्वस्त बसायचे नाही. यासाठी आपण सर्वांनी कटीबद्ध असायला हवे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.
सभेत विधीमंडळ गटनेते जयंत पाटील,आमदार शिवरेंद्रराजे भोसले,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार जयदेव गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.
या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दत्ता भारणे, आमदार दिपक चव्हाण, आमदार जयदेव गायकवाड, माजी आमदार दिपक साळुंखे, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, जिल्हाध्यक्ष सुरेश माने, जिल्हापरिषद अध्यक्ष संजीवनाईक निंबाळकर, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष लक्ष्मीकांत छाबिया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव,विक्रमसिंह पाटणकर, आदींसह सातारा-जावळी मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
शिवसाम्राज्य म्हणायला लाज कशी वाटत नाही : धनंजय मुंडे
मुख्यमंत्री भाजपाच्या महास्थापना मेळाव्यात म्हणाले की, ही गर्दी म्हणजे शिवसाम्राज्य आहे. तुम्हाला लाज कशी वाटत नाही. शिवाजी महाराजांचे नाव कर्जमाफी शेतकरी योजनेला तुम्ही दिले. त्या योजनेचा लाभ राज्यातील एकाही शेतकऱ्याल मिळाला नाही. हा शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि तुम्हाला शिवसाम्राज्य दिसते ?अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी भाजप आणि मुख्यमंत्र्यांचा समाचार घेतला.
काश्मीर ते कन्याकुमारी भाजपची कधीच ताकद नव्हती मात्र भाजपने अण्णांच्या लोकपालसाठीच्या आंदोलनाचा फायदा घेतला, गुजरात मॉडेल लोकांसमोर ठेवले, खोटे आश्वासन दिले, अच्छे दिनचे स्वप्न दाखवले आणि सत्ता हाती घेतली.
या सरकारने तरूणाईचा अपमान केला. त्यांना हे भजी तळा म्हणतात. याचा जाब विचारण्यासाठीच राष्ट्रवादीने हा हल्लाबोल केला आहे.
जेव्हा निवडणुकांचा बिगूल वाजेल तेव्हा यांच्या जाहिराती सुरू होतील. वेगवेगळी आश्वासने दिली जातील. नीरव मोदीला वापस देशात आणण्याच्या वार्ता केल्या जातील. तुम्ही यांच्या भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन मुंडे यांनी केले.
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |