09:57pm | Mar 15, 2018 |
सातारा : संत ज्ञानेश्वर ज्ञानाचे, संत तुकाराम भक्तीचे, संत रामदास क्रांतीचे प्रतिक होते त्याप्रमाणे विंदा करंदीकर हे तत्वाचे प्रतिक होते. विचारसरणी, विचारप्रणाली, सिध्दांत, आधुनिक वाद त्यांच्या कवितांमध्ये होता आणि त्यांनी तो जगण्यातून मिळवला होता त्यामुळे आत्मज्ञानातून तत्वज्ञान सांगणारा काव्यतारा म्हणजे विंदा. असे मत ज्येष्ठ साहित्यिक, गीतकार आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे विश्वस्त राजन लाखे यांनी व्यक्त केले.
ते नगरवाचनालयाच्या पाठक हॉलमध्ये मसाप, शाहुपुरी शाखा आयोजित सहाव्या मराठी भाषा पंधरवडयानिमित्त विंदा आणि त्यांची प्रतिभा या विषयावर बोलत होते. व्यासपीठावर मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी, पुणे शहर प्रतिनिधी शिरीष चिटणीस, अॅड. चंद्रकांत बेबले, लेखक गणपतराव साळुंखे, माजी नगरसेवक राजू गोडसे उपस्थित होते.
श्री. लाखे पुढे म्हणाले, कोकणच्या मातीत जन्माला आलेला या कवीने आपल्या वैश्विक उंचीच्या, मानवतावादी वृत्तीच्या लेखनातही अस्सल कोकणी रंग जपला. इंग्रजीचे प्राध्यापक असल्यामुळे त्यांनी मराठीबरोबरच इंग्रजीतूनही लेखन केले. अनुवादातून चांगले इंग्रजी ग्रंथ मराठीत आणले. संत ज्ञानेश्वरांच्या अमृतानुभव ग्रंथाचे अर्वाचिनीकरण करुन समकालीन वाचकांची अडचण दूर केली. 1949 च्या स्वेदगंगा पासून सुरु झालेला त्यांचा काव्यप्रवास, आशय-अविष्काराची वेगवेगळी वळणे प्रयोगशीलतेने आत्मसात करत पुढे जात राहिला. मृदगंध, धृपद, जातक, विरुपिका, अष्टदर्शने हे त्यांचे काव्यसंग्रह म्हणजे मराठी काव्यविश्वातले मानदंड ठरले. त्यांच्या बालकवितांनीही इतिहास घडवला. एटू लोकांचा देश, राणीची बाग, अजबखाना, पिशीमावशी आणि तिची भुतावळ अशा त्यांच्या अनेक बालकवितासंग्रहांनी मुलांच्या मनावर राज्य केले. स्पर्शाची पालवी आणि आकाशाचा अर्थ हे लघुनिबंध, परंपरा आणि नक्ता हे समीक्षात्मक पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांच्या व्यक्तीमत्वाला अनेक पैलू हेते ते विज्ञाननिष्ठ माकर्सवादी होते त्याचवेळी जाणीववादीही होते. दर्शनी विरोध मावळून जावेत, अशीच त्यांची प्रतिभा होती. त्यामुळेच कवी आणि समीक्षक या दोन्ही रुपांत प्राप्त झालेली प्रतिभा आणि प्रज्ञा त्यांच्याकडे नांदू शकली. अष्टदर्शने या त्यांच्या कवितासंग्रहाला त्यांना मानाचा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ते एकमेव कवी होते ज्यांना कवितासंग्रहासाठी ज्ञानपीठ मिळाला त्यावरुन त्यांचे श्रेष्ठत्व कळून येते.
त्यांच्या काव्यामध्ये मुक्तशैलीतील कविता, सुनीते, गझल, तालचित्रे, मुक्तसुनीते, विरुपिका अशा विविध रचनाप्रकारांचा समावेश आहे. त्यांच्या कवितांमध्ये ईहवाद, विज्ञाननिष्ठा, मानवता या मूल्यांवरची श्रध्दा आढळते. पार्थिवाप्रमाणेच अपार्थिव जगाचेही संदर्भ त्यांच्या कवितेत विषय झालेले दिसतात. आयुष्यांचा मर्म सांगणारा हा कवी होता असेही त्यांनी सांगितले.
प्रारंभी संयोजकांच्यावतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी लेखक गणपतराव साळुंखे यांनी लिहिलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर यांचे चरित्र या पुस्तकाचे मान्यवरांच्याहस्ते प्रकाशन करण्यात आले. मसाप शाहुपुरी शाखेचे कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत यांना 50 व्या वाढदिवसानिमित्त राजन लाखे यांच्याहस्ते पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांच्यावतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविक मसाप जिल्हा प्रतिनिधी विनोद कुलकर्णी यांनी साहित्यिक राजन लाखे यांनी साहित्य संमेलनात सुरु केलेल्या कवी कट्टा संकल्पनेची माहिती सांगितली. यावेळी शिरीष चिटणीस यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अॅड. चंद्रकांत बेबले यांनी तर आभार अमर बेंद्रे यांनी मानले.
कार्यक्रमास मसाप, शाहुपुरी शाखेचे कार्यकारिणी सदस्य, सभासद आणि साहित्यिक सातारकर उपस्थित होते. सहाव्या मराठी भाषा पंधरवडयाचा समारोप शनिवार 17 मार्च रोजी होणार असून यावेळी जेष्ठ पत्रकार रवि आमले यांचे प्रचार भान याविषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी साहित्यप्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेच्यावतीने करण्यात आले आहे.
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |