02:42pm | May 18, 2022 |
गुजरात : विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना हार्दिक पटेल यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. हा पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. जयपूरमध्ये नुकतेच काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबीर पार पडले होते. त्याला काही दिवस उलटत नाही तोच हार्दिक पटेल यांच्यासारख्या नेत्याच्या रुपाने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
यानिमित्ताने काँग्रेस पक्षाची आगामी वाटचाल आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हार्दिक पटेल हे गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये नाराज होते. राज्य पातळीवरील नेत्यांकडून माझं खच्चीकरण केलं जात असल्याचा आरोप हार्दिक यांनी केला होता. ट्वीट करत त्यांनी आपण काँग्रेसमधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली. माझ्या या निर्णयाचं स्वागत माझे सर्व साथीदार आणि गुजरातमधील जनता करेल, असा मला विश्वास आहे. या निर्णयानंतर मी भविष्यात खऱ्या अर्थाने गुजरातसाठी सकारात्मक काम करू शकेन, असे हार्दिक पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
राहुल गांधींना नेत्यांऐवजी मोबाईलमध्ये जास्त इंटरेस्ट
काँग्रेस सोडताना हार्दिक पटेल यांनी तीन भाषांमध्ये आपला राजीनामा लिहून प्रसिद्ध केला. या माध्यमातून हार्दिक पटेल यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. सध्या सोनिया गांधी या काँग्रेस पक्षाच्या हंगामी अध्यक्ष असल्या तरी प्रत्यक्षात पक्षाचा कारभार हा राहुल गांधी यांच्याकडूनच चालवला जातो. हार्दिक पटेल यांच्या राजीनामापत्रातील तिसऱ्या परिच्छेदातील पहिली ओळ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. हार्दिक पटेल यांनी आपल्या राजीनामापत्रात राहुल गांधी यांच्याबाबत होत असलेल्या टीकेचा मुद्दा नव्याने राहुल गांधी यांनी आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केला आहे.
हार्दिक पटेल यांची टीका
राहुल गांधींकडून दुर्लक्ष होत असल्याचा हाच मुद्दा हार्दिक पटेल यांनी अधोरेखित केला आहे. मी जेव्हा जेव्हा गुजरातच्या समस्या घेऊन राहुल गांधी यांनी भेटलो पक्षाच्या नेतृत्त्वाला आमचे म्हणणे ऐकून घेण्यापेक्षा मोबाईल पाहण्यातच जास्त रस असायचा. काँग्रेसची सत्ता आकुंचन पावून दोन राज्यांपुरतीच उरली आहे. २०२४ ची लोकसभा निवडणूक येऊ घातली आहे. गुजरातसह अनेक राज्य येत्या वर्षभरात विधानसभा निवडणुकीला सामोरी जाणार आहेत. अशावेळी हार्दिक पटेल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे काँग्रेसला पुन्हा एकदा गांभीर्याने विचार करण्याच वेळ आली आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |