आजचा हा विषय आपल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी आणि मार्गदर्शनपर आहे. विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयीन जीवन हे एक नवीन दिशा देणारे आणि त्यांच्या आयुष्याला नवीन आकार देणारे आहे. आज बऱ्याच काळानंतर हा लेख लिहिताना मलाही महाविद्यालयीन जीवनाचा पुरेपूर आनंद घेतल्याचे समाधान आणि म्हणूनच आजच्या विद्यार्थ्यासाठी मी एका अनुभवातून आपल्यासमोर काही विचार मांडत आहे. आपल्या माध्यमिक शिक्षणाचा टप्पा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी एका आतुरतेने महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करतात. तेव्हा या आज आपल्या महाविद्यालयीन जीवनावर आपण आज चर्चा करूया. सध्याच्या युवकवर्गात चित्रपटातील काही गोष्टीमुळे त्यांना महाविद्यालयीन जीवनाविषयी एक आकर्षण असते. तेव्हा आजच्या विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालय जीवनाचा आनंद घेत आपले करियर आणि आपले व्यक्तिमत्वही घडवावे.
आज आपला देश जागतिक पातळीवर एक युवा शक्ती म्हणून ओळखला जातो. आजच्या वर्तमानातील युवक म्हणून उद्याच्या भविष्याची देशाचे आधारस्तंभ आहेत. तेव्हा आपल्याच महाविद्यालयीन जीवनाचे टप्प्यावर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आणि सामाजिक, व्यक्तिमत्व घडवावे. आजचा विद्यार्थी वर्ग हा दहावीनंतर एक नव्या आशेने महाविद्यालयीन जीवनात प्रवेश घेतात. तेव्हा आपली पुढील करिअरची क्षेत्र निवडताना विद्यार्थ्यांनी आपली कल, क्षमता आणि आवड याचा पुरेपूर अभ्यास करून पुढील निर्णय घ्यावा. आज विविध शाखेची महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, प्रवेश परीक्षा, यांमधून विद्यार्थ्यांना आपल्याकडे जणू ओढण्याची स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. ही शिक्षण क्षेत्राच्या दृष्टीने अतिशय गंभीर बाब आहे. त्यासाठीच महाविद्यालयीन शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांमध्ये राबवले जाणाऱ्या उपक्रमात योग्य ती पारदर्शकता हवी. यासाठी महाविद्यालयीन पातळीवर प्रोफेसर व विद्यार्थी यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक क्षेत्राबरोबरच संस्कृती, आरोग्य, कला या विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांना परिपूर्ण विकास घडवण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे. तेव्हा आजच्या विद्यार्थिनी जास्त ताण न घेता महाविद्यालयीन
जीवनात विविध प्रकारे आनंद लुटत आपल्या जीवनाचा परिपूर्ण विकास करावा. त्यासाठी शासनाची ही जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांना कमीत कमी खर्चात आजच्या स्पर्धात्मक जीवनाला सामोरे जाण्यासाठी विविध उपक्रम राबवावेत. तसेच विद्यार्थ्यांनी ही एक गोष्ट लक्षात घेणे गरजेचे आहे की महाविद्यालयीन जीवनात वावरताना कुठेही आपल्या गैरवर्तन, गालबोट लागणार नाही याची जबाबदारी ठेवणेही आवश्यक आहे. एक महत्त्वाची गोष्ट सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवण्याची म्हणजे, आपल्या देशाला ज्या महापुरुषांचा आदर्श आहे त्या महापुरुषांनी विद्यार्थी दशेत अथवा तारुण्याच्या उंबरठ्यावर कुठल्याही प्रलोभनाला बळी न पडता सर्वतोपरी तयार करून राष्ट्रहित व समाज हितासाठी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेले तेव्हा आजच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या महापुरुषांचे कणभर का होईना पण थोडेफार समाजकार्य आपल्या मनातही अंगीकारावे. आणि आणि हेच समाजाच्या विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरेल. सर्वात प्रथम आपल्या भारतीय संस्कृती जी जगाला हेवा वाटेल अशा संस्कृतीला युवकांनी भविष्यातही कायम ठेवणे गरजेचे आहे. त्याच बरोबर आपली शैक्षणिक पर्व संपल्यानंतर परदेशातील आकर्षणाला दूर करून आपल्या भारतातच आपले पुढील आयुष्य घडवावे. आपले महाराष्ट्र राज्य विविध क्षेत्रातील समृद्ध वारसा याच आपल्या महाविद्यालय सामाजिक क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींचा जीवनातूनच महाराष्ट्राला अनेक राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक व आदर्श आपल्याला लाभला तेव्हा हाच आदर्श पुढे ठेवून आजच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनाचा योग्य तो विचार लक्षात घेऊन स्वता बरोबर समाजहित ही जोपासावे. आज आपण गांभीर्याने विचार केला तर, आपल्या लक्षात येण्यासारखी गोष्ट म्हणजे, आज आपल्या समाजात राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, त्याचबरोबर इतर क्षेत्रातील यशस्वी व्यक्ती आहेत, त्यांच्या जीवनातील महाविद्यालयीन टप्पा हा एक कलाटणी देणारच होता. या व्यक्ती त्यांच्या महाविद्यालयीन क्षेत्रात असतानाच संस्कारांनी आणि इतर परिपूर्ण विचारसरणीने घडलेले होते. होते. हल्ली वाढत्या शहरीकरणाबरोबरच आणि फास्ट लाईफ विचारसरणीने विद्यार्थी आपले करियर घडवीत, यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचण्याची स्वप्नही बाळगून आहेत. आहेत. आणि त्याचबरोबर पूर्वीचे विद्यालयीन जीवन आणि सध्याचे महाविद्यालयीन पर्व यात बराच फरक आलेला दिसून परंतु मी विद्यार्थ्यांना एवढेच आवाहन करतो की महाविद्यालयीन क्षेत्राचा परिपूर्ण आनंद घेऊनच आपले स्वतःचे करियर आणि पालकांबरोबर समाज हितासाठी आपले कर्तव्य याची जाण ठेवावी. धन्यवाद.
- सौ वैशाली संदीप कांबळे, उपशिक्षिका,
मालोजीराजे शेती विद्यालय व जुनिअर कॉलेज,
फलटण जिल्हा सातारा.
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |
शोभेचे हत्ती शोभेचे हत्ती निवडून देऊन उपयोग काय?निवडून देऊन उपयोग काय? |
भाजप 150 वर जाऊ शकणार नाही : बाबुराव माने |
बारा मावळातर्फे उदयनराजे यांना पाठिंबा |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या विविध शासकीय कार्यालयांना भेटी |
उदयनराजे भोसले यांना समस्त गुरव समाजाच्या वतीने जाहिर पाठींबा |
शिष्टाचार की भ्रष्टाचार जनतेनेच ठरवावे |
उदयनराजेंच्या भेटीने भारावले आबाल, वृद्ध |
कुवेत देशात फुले-आंबेडकर-शिव जयंती साजरी |
एव्हरेस्ट बेस कॅम्प पूर्ण करणारी धैर्या ठरली देशातील पहिली मुलगी |
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष पथके स्थापन करावी: जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी |
जिल्हाधिकारी कार्यालय येथे महाराष्ट्र दिन साजरा |
महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोघांवर कारवाई |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
शाहूनगर येथे 54 हजारांची घरफोडी |
दुचाकीच्या धडकेत एकजण जखमी |
पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धेची फसवणूक |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विराट सभेत मनसेचाही बोलबाला |