05:40pm | Apr 04, 2022 |
वाई : किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील आणि त्यांचे बंधु जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने एकाच गोंधळ उडाला आहे. तसेच कोरेगाव, सातारा, वाई, बावधन, जावळी, गटात अनेक दिग्गजांचे उमेदवारी अर्ज बाद केल्याने उमेदवांरानी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना धारेवर धरले असून चुकीच्या पद्धतीने अर्ज बाद केल्याचा त्यांच्या आरोप करण्यात आला आहे.
किसन वीर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील व सातारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्याची निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागणी विरोधकांनी केली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेल्या सुनावणीत आमदारांच्या बाजूने युक्तिवाद करताना वकील म्हणाले, ऊस नोंदविला असताना कारखान्याने उसाची तोड केली नाही, त्यावर्षी 12 लाख टन उसाची नोंद असताना कारखान्यांने चार लाख टनाचे गाळप केले. कारखाना उशिरा सुरु करुन लवकर बंद केला. कारखाना पूर्ण क्षमतेने चालविला नाही. अनेक शेतकऱ्यांचा ऊस न नेता त्यांचे नुकसान केले. यामुळे उमेदवार अर्जावर चुकीच्या पद्धतीने नोंद घेवून अर्ज बाद करण्यात आला आहे.
नितीन पाटलांनी कारखान्याला ऊसच घातला नाही
दरम्यान, या निवडणुकीत उतरुन कारखाना ताब्यात घेण्याची स्पप्ने पाहणाऱ्या पाटील बंधुंचे अर्ज बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये गोंधळ उडाला आहे. मात्र, याबाबत विरोधकांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, कारखान्याची निवडणूक लढविण्यासाठी पाच वर्षांमध्ये तीन वर्षे ऊस हा कारखान्याला घालणे आवश्यक आहे, या नियमावर नितीन पाटील यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला आहे, तसेच मोठ्या प्रमाणात सोसायटीनी आमदारांच्या विरोधात हरकत नोंदविली आहे. दोघांचेही अर्ज बाद झाल्याने आज अर्ज छाननी होण्याच्या दिवशी प्रशासकीय कार्यालयात एकच गोंधळ उडाला आहे.
आ. मकरंद आबांनी सोसायटी गटातून, नितीनकाकांनी कवठे गटातून तर मदनदादा भोसले यांनी भुईंज गटातून अर्ज दाखल केले आहेत. यानिमित्त दोन वर्षानंतर पुन्हा एकदा भोसले विरूध्द पाटील असा संघर्ष पहायला मिळणार होता. मात्र, आता लढाईच्या मैदानात सेनापतीच नसल्याने निवडणुकीत काय होणार याची चर्चा आता सुरु झाली आहे. वास्तविक पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसनवीर कारखान्याचीची सत्ता मिळवण्यासाठी भोसले विरुद्ध पाटील यांच्यातील राजकीय वैर अनेक दशकांपासून सुरु आहे. निवडणूक कोणतीही असो यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचतो. 10 वर्षानंतर पुन्हा एकदा कृष्णाकाठी सत्तासंघर्ष पहायला मिळणार आहे. मात्र, आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे अर्ज बाद झाल्याने त्यांच्या समर्थकांचे सेनापतीच लढाईत नसणार आहेत.
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |