03:53pm | Oct 22, 2018 |
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू होण्यास काही महिन्यांच्याच कालावधी बाकी राहिलेला असताना प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडून मोठा खुलासा करण्यात आला. माजी अर्थमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित करणार नाही असे म्हटले आहे. गांधी नव्हे तर इतर कोणाच्याही नावाची घोषणा केली जाणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यायाने भाजपचा सामना करण्यासाठी काँग्रेसकडून विविध पर्यांयाची चाचपणी सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने प्रादेशिक पक्षांची महाआघाडीच्या माध्यमातून मोट बांधण्याचे उच्चस्तरीय प्रयत्न सुरू आहेत. या महाआघाडीचे राष्ट्रीय पातळीवर नेतृत्व काँग्रेसकडेच राहिल यासाठी सुद्धा विचार केला जात आहे, पण काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेतृत्वासह राहुल गांधी यांच्या नावावरही प्रादेशिक पक्षांकडून साशंकता व्यक्त केली जात आहे.
चिदंबरम यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, आम्ही (काँग्रेस) कधीही राहुल यांना पंतप्रधान करायचे आहे असे म्हणालो नाही, काँग्रेसच्या नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या पंतप्रधानविषयी चर्चा सुरू झाल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीने त्याची दखल घेतली होती व अशा प्रकारची चर्चा न करण्याचे आवाहन केले होते. आम्हाला भाजपला पराभूत करायचे आहे, आम्हाला अस सरकार स्थापन करायचे आहे जे सुधारणावादी असेल, व्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान करेल, कर दहशतीला थारा देणार नाही, महिला आणि मुलाबाळांची सुरक्षा असेल, शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा करेल.
चिदंबरम यांनी या मुलाखतीमध्ये महाआघाडीचा पुन्हा एकदा पुनरुच्चार केला. पंतप्रधान पदाचा निर्णय निवडणूक पार पडल्यानंतर सर्वांना एकत्र घेऊन विचारविनीमय करून उमेदवार निवडला जाईल असे त्यांनी नमूद केले. चिदंबरम यांनी गेल्या दोन दशकांमध्ये राष्ट्रीय पक्षांच्या मतांमध्ये घसरण होऊन प्रादेशिक पक्ष मजबूत झाल्याचे मान्य केले. काँग्रेसकडून महाआघाडीचे प्रयत्न सुरू असतानाच भाजपकडून तो डाव हाणून पाडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |