सातारा : आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अजूनही महिलांना दुय्यम स्थान आहे. भारतीय राज्यघटनेने स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव न ठेवता दोघांनाही सन्मानाने जगता यावे अशी तरतूद करुन ठेवली आहे. चूल व मूल याच्या पलिकडे जावून भारतीय महिलांनी दैदिप्यमान कामगिरी करीत आहेत. राजकारण, समाजकारण, अर्थकारण या अशा विविध क्षेत्रांमध्ये भारतीय महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करीत आहेत. असे असतानाही नर-मादी हे समीकरण हजारो वर्षापासून आजही कायम असल्याचे पदोपदी जाणवते. भारतीय संस्कृती ही पुरुष प्रधानच आहे. पाश्चात्यांच्या तुलनेत भारतीय स्त्रियांना कमी प्रमाणात स्वातंत्र्य आहे. हे शाश्वत सत्य असून ते कोणीही नाकारु शकत नाही.
स्त्रियांकडे केवळ उपभोगाची वस्तू म्हणून न बघता माणूस म्हणून त्यांचा सन्मान करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. असे असतानाही जगभरात कुठे ना कुठे स्त्री अत्याचाराच्या घटना घडत असतात. दिल्ली येथील निर्भया प्रकरण, खैरलांजी, कोपर्डी अशा घटनांमुळे मन सुन्न होऊन जाते. स्त्रियांच्या संबंधित असे प्रकार भविष्यामध्ये घडू नयेत यासाठी आपली न्यायव्यवस्था कटीबद्ध आहे. तरीसुद्धा कुठे ना कुठे घडलेले असे प्रकार कानावर येत असतात. त्यामुळे मन विषन्न होवून जाते.
जमाना बदलत आहे. पतंजलीचे बाबा रामदेवांच्या म्हणण्यानुसार हे कलियुग आहे. कलियुगात सतयुग, द्वापारयुग यांसारखी परिस्थिती आता राहिलेली नाही. समाजव्यवस्था पूर्णपणे बदलत चालली आहे. रक्ताच्या नात्यांकडेही लोक व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. वडील-मुलगी, भाऊ-बहीण या नात्यांनाही कलुषित करणार्या घटनाही अलिकडच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या समाजव्यवस्थेचे वाटोळे झाले की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे.
काळाबरोबर आपली संस्कृतीही बदलली. या संस्कृतीला पेज 3 ची झालर लागली. स्त्री-पुरुष भिन्नता लोप पावलेली आहे. असे असताना संगनमताने झालेले शारीरिक संबंधही बलात्कार ठरु लागलेले आहेत. अशा हजारो घटना आतापर्यंत उघडकीस आलेल्या आहेत. आपल्या आजुबाजूला घडणार्या अशा घटना मन सुन्न करतात. संगनमताने झालेल्या शारीरिक संबंधांनाही बलात्कार संबोधून पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल केले जात आहेत. या प्रकरणामुळे आपली कुटूंबव्यवस्थाच उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेली आहे. एखाद्या सत्शील आणि जबाबदार व्यक्तीला शारीरिक संबंधाच्या जाळ्यामध्ये अडकवून अनेक महिलांनी आपले आर्थिक हित साधलेले आहे. त्यामुळे त्या संबंधित पुरुषाचे संपूर्ण कुटूंबच उद्ध्वस्त झाल्याच्या घटना देशात, राज्यात आणि सातारा जिल्ह्यात उघडकीस आल्या आहेत. बलात्काराचे गुन्हे दाखल करायचे आणि शेवटी आपले आर्थिक हित साधायचे, हे उद्योग गेल्या काही वर्षांपासून सातार्यात बाळसे धरु लागल्या आहेत.
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रमुख पदाचा पदभार स्विकारल्यानंतर अवैध सावकारीचे समूळ उच्चाटन करण्याचा विडा उचलला. मी-मी म्हणणारे अनेक नग आज जेलचे वासे मोजत आहेत. परंतू राजकीय वरदहस्तामुळे काही सावकार अजूनही मोकाट आहेत. या सावकारांपैकीच एक फलटण येथील व्यंकट दादा दडस याने स्वत:च्या शेतात काम करणार्या एका महिलेला हाताशी धरुन सावकारी प्रकरणी दडस याच्यावर गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादीवरच बलात्काराचा बोगस गुन्हा दाखल केल्याची घटना घडलेली होती. सुमारे तीन महिन्यांपासून हा फिर्यादी आज न्यायालयीन कोठडीत आहे. कोणतीही चूक नसताना त्या फिर्यादीला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीची हवा खावी लागत आहे. तर कराड येथील दुसर्या प्रकरणात भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या एका महिला कार्यकर्तीने कराड येथील एका व्यापार्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला होता. यामध्ये तडजोड करण्यासाठी संबंधित महिला कार्यकर्तीने लाखो रुपयांची खंडणी त्या व्यापार्याकडे मागितलेली होती. पोलिसांनी याबाबत खोलात जावून तपास केला असता हे बलात्कार प्रकरण बोगस असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. परिस्थितीजन्य पुराव्यांच्या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित महिलेवर खंडणीचे गुन्हे दाखल केलेले आहेत. अशा प्रकारचे अनेक प्रकार सातारा जिल्ह्यात रोजच घडत असतात.
बलात्कारचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून ब्लॅकमेलिंग करण्याचा ट्रेंड सध्या वाढू लागला आहे. स्त्री-पुरुषांमध्ये संगनमताने झालेला शारीरिक संबंध बलात्कार कसा होवू शकतो? याबाबत आता कोणीतरी संशोधन करायला हवे. लग्नाचे, नोकरीचे, पैशाचे, दमदाटीने लैंगिक शोषण झाले, याचा साक्षात्कार वर्ष-सहा महिन्यानंतर होतो? त्यामुळे हा नक्की बलात्कारच होता काय? याबाबतची व्याख्या न्याय व्यवस्थेनेच लोकांना समजवायला हवी. लैंगिक शोषणाचे समर्थन कोणीही करणार नाही. त्याबाबत आपली न्यायव्यवस्था सक्षम आहे. एखाद्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणार्या इज्जतदार व्यक्तीवर जेव्हा लैंगिक शोषणाचा आरोप होतो, तेव्हा त्याचे संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त होते. सामाजिक प्रतिष्ठाही धुळीस मिळाली जाते. कायद्यानुसार शेकडो अपराधी सुटले तरी चालतील, परंतू एखाद्या निरपराधाला शिक्षा होता कामा नये. असे असताना विविध संघटना, महिला सामाजिक कार्यकर्त्या स्वहित जपण्यासाठी पावसाळ्यात उगवणार्या भूछत्र्यांप्रमाणे वाढू लागल्या आहेत. त्यातूनच खंडणी, ब्लॅकमेलिंग अशा घटनाही गेल्या काही वर्षात वाढलेल्या पहावयास मिळत आहेत. आपल्या आजुबाजूला घडणार्या घटनांबाबत माणूस प्रचंड संवेदनशील असतो. अशीच एखादी अघटित घटनाच त्या व्यक्तीच्या जीवनात घडल्यास त्याचे संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होते, याबाबतचा विचारही संबंधितांनी करायला हवा.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अनुसूचित जाती जमाती (ऍट्रोसिटी) कायद्याच्या होणार्या दुरुपयोगाबाबत निरीक्षण नोंदवून यामध्ये सुधारणा करण्याचा आदेश दिलेला आहे. त्याच धर्तीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्येही अशाच प्रकारे निरीक्षण नोंदवून हा तपास पोलीस दलातील राजपत्रित अधिकार्यांकडे तपासासाठी देवून या घटनांमधील सत्यता पडताळणीनंतरच या संदर्भात गुन्हे दाखल करण्यात यावेत. त्यामुळे बलात्काराच्या बोगस घटनांना आळा बसणार आहे. पैसे कमविण्यासाठी बलात्काराचे बोगस गुन्हे दाखल करुन नंतर तडजोड करुन खंडणी उकळणार्या अनेक महिला सामाजिक संघटना आज देशभरात कार्यरत आहेत. हा त्यांचा व्यवसाय झालेला आहे. एखाद्या व्यक्तीशी लगट वाढवायची, मोबाईलवरुन संवाद साधायचा, त्याद्वारे बलात्काराची धमकी देवून त्याद्वारे त्याकडून खंडणी मागायची, अशा अनेक घटना यापूर्वी उघडकीस आलेल्या आहेत.
ताई, माई, अक्का अश्या वेगवेगळ्या ब्रिगेड स्थापन केलेल्यांनी पुढे-पाठिमागे भारत दौर्यावर असणार्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरच लैंगिक शोषणाचे आरोप लावून बलात्काराचा गुन्हा दाखल केला तर त्यात नवल वाटून घेवू नये. काल सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्यावर एका महिलेने लैंगिक शोषणाचा आरोप लावलेला आहे. गेले चार महिने हे घोंगडे भिजत होते. पोलिसांना या प्रकरणात तथ्य न वाटल्याने व परिस्थितीजन्य पुरावे न मिळाल्याने पोलिसांनी कालपर्यंत या संदर्भात गुन्हा दाखल केलेला नव्हता. परंतू भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप करुन सातारा शहर पोलिसांना आनंद भंडारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले आहे. कराड येथील व्यापार्याला बलात्काराचा गुन्हा दाखल करुन त्याच्याकडून खंडणी उकळण्याचा प्रताप करणार्या महिलाही तृप्ती देसाई यांच्या भूमाता ब्रिगेडच्या पदाधिकारी होत्या. आनंद भंडारी प्रकरणातही तृप्ती देसाईंनी स्वत: उडी घेतलेली आहे. त्यामुळे कोठेतरी पाणी मुरतंय, या शक्यतेला वाव मिळत आहे. शेवटी ऍट्रोसिटी प्रकरणात गळा काढणार्या संघटनांनी बोगस बलात्कारांच्या प्रकरणातही जनआंदोलन उभारावे. उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल कराव्यात. तरच आणि तरच अशा प्रकरणांना आळा बसणार आहे.
-संग्राम निकाळजे
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |