माणसाच्या जगण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा याचसोबत जल-वायूची गरज असते. या साधनांमुळे मनुष्य जगू शकतो. परंतू या मानवी देहाला संसाररुपी प्राणप्रतिष्ठापना करण्यासाठी संस्काराची गरज असते. हे संस्कार देण्याचे काम महाराष्ट्रातील अनेक संत, महात्मे, युगपुरुषांनी केले आहे. परंतू संत नामदेव यांच्या लेखणीमुळे महाराष्ट्र आणि पंजाब प्रांताला जोडणारा सेतू निर्माण झाला आहे. मराठी भाषेतील पहिले चरित्रकार व कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत घेवून जाणारे ते आद्य प्रचारक मानले जातात.
इ.स. 1270-1350 या कालखंडातील संत नामदेव म्हणजे नामदेव दामाशेट्टी रेळेकर. यांचा पारंपारिक व्यवसाय हा कपडे शिवण्याचा होता. नरसी बामणी जिल्हा हिंगोली याठिकाणी इ.स. 1270 मधील कार्तिकी शुद्ध एकादशीस रोहिणी नक्षत्रास त्यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण हे श्री विठ्ठल रखमाईच्या ओसरीखाली म्हणजेच पंढरपूर याठिकाणी गेले. लहानपणापासूनच अध्यात्मिक आवड असल्यामुळे त्यांनी वारकरी सांप्रदायाचा प्रचंड अभ्यास केला. तसेच मराठी भाषेला एका उच्च पातळीवर पोहोचविण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून इतिहास रचला. त्याचबरोबर पंजाबी व वज्र भाषेमध्ये काव्यरचना करुन गुरु ग्रंथसाहिब या शिखांच्या पवित्र ग्रंथाच्या 62 काव्यरचना रचून संत नामदेवांनी आपली कीर्ती हरियाणा, पंजाब, दिल्लीपर्यंत पोहोचवली. महाराष्ट्रातून देशपातळीवर आपल्या धार्मिक व काव्यात्मक गुणवत्त ेने देशभर पोहोचलेले ते संत म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. संतांच्या सांगाती रमणारे वारकर्यांची भगवी पताका कायम स्मरणात ठेवणारे संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, चोखा मेळा, संत मुक्ताबाई, सोपानदेव, निवृत्तीनाथ, विसोबा खोचर व पंढरीनाथ अशा अनेक संतांच्या सानिध्यात श्री विठुमाउलीचे अभंग निर्माण करणार्या संतांमध्ये संत नामदेव यांनी अनेक रचना केल्या. त्यानंतर संत तुकाराम महाराज यांनीही संत नामदेवांच्या पावलावर पाऊल टाकून तुक्याची अभंगवाणी तयार केली. इ.स. 1241 मध्ये संत ज्ञानेश्वरांच्या भेटीनंतर संत नामदेवांचे आयुष्य वारकरी सांप्रदायासाठी वाहिले गेले. विठुचा गजर करीत करीत 2500 अभंग गाथा व सुमारे 125 पदे अभंग रचना त्यांनी रचल्या. अनेक संतांबरोबर त्यांनी भारत भ्रमण करुन तीर्थस्थळांना भेटी दिल्या. भागवत धर्माचे आद्य प्रचारक म्हणून अनेक संत महात्म्यांना गौरविले आहे. पण पंजाब प्रांतात आजही नामदेवबाबा हे गुरुस्थानी मानले गेले आहेत. घुमान, पंजाब याठिकाणी पंजाबी बांधवांनी या महाराष्ट्राच्या सुपुत्राचे मंदिर बांधून त्यांना मानाचा मुजरा केला आहे. बहीरदास, लदविष्णुस्वामी, केशव कालाधारी अशी असंख्य शिष्यमंडळांनी संत नामदेवांच्या कार्याची दखल घेवून त्याचा विस्तार केला आहे. जगभरात ज्या-ज्या ठिकाणी शीख बांधव पोहोचले, त्यांच्या समवेत संत नामदेवांची अभंगवाणीसुद्धा पोहोचली आहे. कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान या देशातही संत नामदेवांचे भक्त व शिष्यगण त्यांचे स्मरण करतात. आपला देह हा भागवत धर्मासाठी आहे, अशी खुणगाठ बांधून त्यांनी आयुष्यभर म्हणजेच 80 वर्षे समाजप्रबोधनाच्या पताका खांद्यावर घेतल्या होत्या. त्या श्री विठ्ठलाच्या चरणी पंढरपूर या ठिकाणी ठेवून त्यांनी आपला प्राण त्याग केला. संत नामदेवांच्या कार्याची दखल छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरुषांनी घेवून आपल्या सामाजिक चळवळीला व स्वराज्याच्या निर्मितीला वाहून घेतले होते. एका शिंपी समाजातील संत नामदेवांनी खूप मोठी उंची गाठली आहे. त्यांच्या कार्याची दखल घ्यायची असेल तर समाजात पसरणार्या अंधश्रद्धेच्या प्रदुषणापासून दूर राहण्यासाठी अभंगवाणीचा प्राणवायू आज मानवजातीसाठी गरजेचा ठरलेला आहे. अशा या ईश्वररुपी संत नामदेव महाराज यांना विनम्र अभिवादन करताना संत नामदेव... हेच खर्या अर्थाने ठरले मानवाच्या रुपातील देवांचे देव... असे म्हणावेसे वाटते.
- अजित जगताप (सायगांवकर)
9822241299
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |