07:28pm | Jul 07, 2018 |
सातारा : भाई हा शब्द खर्या अर्थाने बदनाम होण्याअगोदर या शब्दाला फार मोठी किंमत होती. डाव्या, कामगार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये नेत्यांच्या अगोदर भाई हे नाव मोठ्या सन्मानाने घेतले जायचे. परंतू 90 च्या दशकामध्ये मुंबईत घडलेल्या गँगवॉरमध्ये भाई हे नाव खर्या अर्थाने बदनाम झाले. ‘भाई बोले तो सामनेवाला खल्लास...’ या बॉलिवूड चित्रपटातील डायलॉगमुळे गल्लोगल्ली स्वयंघोषित भाई तयार झाले. परंतू या भाईंना फेमस होण्यासाठी काही काळ उलटावा लागला. मात्र सध्या सोशल मिडियाच्या जमान्यात केवळ एका क्लिकवर हजारो लोक जोडण्याची क्षमता असलेल्या फेसबुक आणि व्हॉटसऍपमुळे अनेक ‘चिंधीचोर’ एका रात्रीत ‘भाई’ बनू लागले आहेत. मात्र या भाई लोकांच्या नादाला लागून महाविद्यालयीन तरुणांचे नुकसान होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हातभर केस, वीतभर दाढी आणि कपाळावर कुंकवाचा भलामोठा टिळा अशा पोतराजाच्या वेशामध्ये अनेक भाई, सरकार फेसबुकवर धुमाकूळ घालीत आहेत. या रुपाला शिकली सवरलेली तरुणाई भुलली जात आहे. कोण दगडी चाळीतला, कोण चेंबूरचा, तर कोण नागपाड्याचा मनसबदार असल्याच्या अविर्भावात वावरत हे फेसबुक व व्हॉटसऍपद्वारे स्वत:ची पब्लिसिटी करीत आहेत. अंगभर बेंटेक्सचे किलोभर सोने, टायगर, चित्ता, कोब्रा, लायन अशी प्राणी संग्रहालयातील नावांची लेबले लावून फेसबुकवर ग्रुप बनवले जावू लागले आहेत. त्यामुळे गटा-तटांमध्ये खुन्नस वाढू लागली आहे. या खुन्नसमधून विनाकारण मुडदेही पाडले गेले आहेत. कार्यकर्त्यांकडून संबंधित भाईला दैवत्त्वाचा दर्जा दिला जात असल्यामुळे हे स्वयंघोषित भाई या भक्तजनांकडून मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन करीत आहेत. त्यांच्याच जिवावर एखादी मोडकी तोडकी गाडी घेवून त्यावर ‘सरकार’, टायगर, चित्ता, कोब्रा, लायन अशी नावे रेडियममध्ये टाकून स्वत:चे मार्केटिंग केले जात आहे.
जागेचा ताबा घेणे, खंडणीसाठी धमकावणे, अपहरण करणे, जागांच्या व्यवहारात सेटलमेंट करणे आदी माध्यमातून हे फेसबुक भाई पैसे कमवित आहेत. लग्न, साखरपुडा, मुंज, बारसे, वाढदिवस, जागरण-गोंधळ आणि अंत्यविधी अशा शुभाशुभ कार्यक्रमामध्ये या फेसबुक भाईंची उपस्थिती लक्षणीय असते. जागेवरुनच थेट फेसबुकला लाईव्ह करण्याची सुविधा फेसबुकने उपलब्ध करुन दिल्यामुळे या फेसबुक भाईंची क्रिकेट मॅचपेक्षाही जास्त क्रेझ होवू लागलेली आहे. एखाद्या राजकीय पक्षालाही लाजवेल अशी कार्यकर्त्यांची फौज जवळ बाळगून हे फेसबुक भाई आर्थिकदृष्ट्या गब्बर झाले आहेत. मुंबईतील 80-90 च्या दशकातील अंडरवर्ल्ड डॉनवर निघालेल्या चित्रपटातील नायकांची नक्कल करणारे हे फेसबुक भाई इंग्रजीतील सुभाषित ‘देन यु आर जस्ट प्रिटेंडिंग’ याप्रमाणे डोळे बंद करुन आपण खरोखरच अंडरवर्ल्ड डॉन असल्याची त्यांना पदोपदी जाणीव होत असते. फेसबुक भाईंचा वाढदिवस म्हणजे कार्यकर्त्यांसाठी पर्वणीच. ज्याप्रमाणे माऊलींच्या वारीतील वारकर्याला पंढरीच्या विठूरायाच्या भेटीची आस लागलेली असते तद्वतच त्या कार्यकर्त्याला फेसबुक भाईच्या वाढदिवसाची आस लागलेली असते. एक-दोन महिने अगोदरच यांच्या वाढदिवसाची लगबग सुरु असते. प्रत्यक्ष वाढदिन जवळ आल्यानंतर मात्र फेसबुकवर राष्ट्रीय सण असल्याचा ‘हर्ष’ हे कार्यकर्ते फेसबुकद्वारे व्यक्त करतात. जन्म दिलेल्या आई-वडिलांच्या कधी पाया पडला नसेल, परंतू या फेसबुकभाईंच्या समोर मात्र साष्टांग दंडवत घालतो. अशी परिस्थिती सध्या महाविद्यालयीन व रिकामटेकड्या युवकांची झालेली आहे.
सातारा जिल्हाही याला अपवाद नाही. फलटण, सातारा, कराड, वाई याठिकाणीही टायगर, सरकार अशा पाट्या लावून या फेसबुक भाईंचे प्रस्थ पावसाळ्यात येणार्या भूछत्रांप्रमाणे वाढू लागले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या झाल्यानंतर चौकशीच्या अनुषंगाने सातार्यातील अनेक फेसबुक भाईंना उचलले होते. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर अग्निशस्त्रेही जमा करुन घेण्यात आली होती. तपास यंत्रणेने एक-दोन आठवडे चांगलाच सरकारी पाहुणचार घेतल्यानंतर संबंधितांना सोडून देण्यात आले होते. गिरणीतील चक्कीच्या पट्ट्याचा रट्टा बसल्यानंतर भलेभले सरळ होतात, तसे हे फेसबुक भाईही काही दिवस सरळ झाले होते. मात्र कुत्र्याच्या शेपटीप्रमाणेच हे भाई पुन्हा फेसबुक, व्हॉटसऍपच्या माध्यमातून पुन्हा एकदा एक्टिव्ह झाले आहेत. त्यामुळे भविष्यामध्ये एखादे मोठे कांड होण्या अगोदरच सरकार, टायगर, चित्ता, लायन, कोब्रा ग्रुप चालविणार्यांची रवानगी प्राणी संग्रहालयात करण्यात यावी, अशी अपेक्षा महाविद्यालयीन व रिकामटेकड्या फिरणार्या युवकांच्या पालकांनी केली आहे.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |