नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार डी. पी. त्रिपाठी यांचे आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६७ वर्षांचे होते. दिल्लीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
डी. पी. त्रिपाठी यांचा जन्म उत्तर प्रदेशमधील सुलतानपूरमध्ये झाला होता. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे त्यांनी अध्यक्षपद भूषवले होते. काँग्रेस पक्षातून त्यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरू केली होती. मात्र, सोनिया गांधींना विरोध करत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. १९६८ मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. ते एक उत्तम वक्ते होते. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली. आणीबाणीच्या काळातील आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यामुळं त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.
त्रिपाठी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. 'डी. पी. त्रिपाठी यांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप दुःखी झाले. ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस होते. आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि संरक्षक होते. त्यांनी दिलेलं योगदान आणि मार्गदर्शन सदैव स्मरणात राहील. राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्या दिवसापासून त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो,' अशा शब्दांत सुळे यांनी त्यांनी श्रद्धांजली वाहिली.
देवी प्रसाद त्रिपाठी यांचा जन्म ६ जानेवारी १९५४ साली उत्तर प्रदेशातील सुलतानपूरमध्ये झाला होता. त्रिपाठी यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघटेनेचे अध्यक्षपदही भूषवले होते. त्यानंतर अलाहाबाद विद्यापीठात त्यांनी प्राध्यापक म्हणूनही काम केले होते.
१६व्या वर्षीच राजकारणात
डी. पी. त्रिपाठी यांनी १६ व्या वर्षीच राजकारणात पाऊल ठेवले होते. काँग्रेसमधून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती. राजीव गांधी यांचे ते निकटवर्तीय असल्याचे मानले जात होते. मात्र, सोनिया गांधी यांना विरोध दर्शवून त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. १९९९ साली त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते पक्षाचे सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते झाले होते.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |