सातारा : अस्मानी व सुलतानी संकटाचा शेतकरी वर्ग सामना करीत असतानाच खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील खंडाने घेतलेल्या शेतजमिनीतील एका शेतकऱ्याचे दोन एकर सोयाबीन पीक अज्ञात व्यक्तीने जाळले. मात्र, पंचनामा करण्यासाठी कोणीही प्रतिसाद न दिल्याने सातारा जिल्हा शिवसेनेने महसूल विभागाचा जाहीर निषेध केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, खटाव तालुक्यातील खातगुण-विसापूर हद्दीतील मागासवर्गीय शेतकरी अधिक यादव यांचे शेत खंडाने घेऊन पत्रकार व शेतकरी पंकज कदम हे गेली चार वर्षे शेती करीत आहेत. जुलै महिन्यात त्यांनी सोयाबीन पेरले होते. पेरणी, नांगरट, भांगलन, काढणी अशी मशागत करण्यासाठी सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार खर्च केला होता. शेतीमधील दोन एकरातील सोयाबीन पीक काढून मळणीसाठी ठेवले होते. शनिवारच्या रात्री अज्ञात व्यक्तीने संपूर्ण सोयाबीन पेटवून दिला. यामध्ये एक लाख ते सव्वा लाख रुपयाचे नुकसान झाले. ही घटना समजताच शिवसेना सातारा जिल्हाप्रमुख प्रताप जाधव, विभाग प्रमुख मुघटराव कदम यांनी महारकी नावाच्या शिवारातील शेतामध्ये जाऊन पाहणी केली. किमान दोन एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून ठेवलेले पीक अज्ञात व्यक्तीकडून जाळण्यात आले आहे. यावेळी त्या विभागातील मंडलाधिकारी, तलाठी यांना तातडीने फोन केले असता दोघांचेही फोन बंद लागले होते, अशी माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जाधव यांनी दिली.
शेतकरी अतिवृष्टी विविध समस्यातून चालला असताना समाजात लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेला संबोधले जाते. अशा ग्रामीण पत्रकारांवर दबाव आणण्यासाठी समाजातील काही विकृत लोकांकडून असे प्रकार होत आहेत. याला आळा घालावा, अशी मागणी सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख प्रताप जाधव यांनी केली आहे.
संबंधित महसूल विभागाने तात्काळ पत्रकार व शेतकरी पंकज कदम यांच्या मेहनतीने तयार केलेल्या सोयाबीन शेतीमधील या जळीताचा पंचनामा करून शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे. पत्रकार व शेतकरी कदम यांना सोयाबीन पिकाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शिवसेना सातारा जिल्हा अध्यक्ष प्रताप जाधव प्रयत्न करीत आहेत. ज्याठिकाणी सोयाबीन पीक ठेवले होते, त्याच ठिकाणी जळीत प्रकरणाने पिकाची राख झाल्याचे पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी साचले होते. महसूल विभागाचे काही जण दिवाळी साजरी करण्यात गुंतले असले तरी त्यांनी साधा फोन उचलण्याचे सौजन्य दाखविले नाही. त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |