07:39pm | Oct 25, 2022 |
पुसेगाव : कोविड नंतर प्रत्येकाला आपली खरी गरज काय आहे ते जाणवले. माणूस वैयक्तिक पैसे कमवू शकतो पण शिक्षण आणि आरोग्य कधीच वैयक्तिकरित्या कमवू शकत नाही. राज्यकर्त्यांनी शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात योग्य धोरण राबविले तरच भविष्यामध्ये कोरोनासारख्या एखाद्या भयंकर संकटाचा आपण सामना करू शकतो. त्यामुळे सरकारने दोन्ही क्षेत्रात मोठी गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी व्यक्त केले.
खटाव येथे माजी सरपंच व ज्येष्ठ पत्रकार कै. एम. आर. शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीपआण्णा विधाते, सामाजिक कार्यकर्ते अरुण अदलिंगे, विजयराव बोर्गे, जीवनराव इंगळे, विलास भोसले, मनोज देशमुख, मोहन घाडगे, एकनाथ चव्हाण, अंबाबाई क्रिडा मंडळ आणि देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थीत होते.
डॉ. थोरात पुढे म्हणाले, कोरोना महामारीच्या काळात अनेक युरोपीय देशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन शाळा सुरळीत सुरू ठेवल्या होत्या. मात्र भारतात भीतीपोटी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. परिणामी भारतातील मुले सामाजिक ज्ञानात दोन वर्ष मागे राहिली असून हा बॅकलॉग भरून काढणे खूप अवघड आहे.
कोरोनानंतर भारतात औषधांचा अतिवापर सुरू झाल्यामुळे माणसांच्या शरीरात रोज जास्त प्रमाणात विविध प्रकारची औषधे जात आहेत. जगात कुठलच औषध किंवा आहार परिपूर्ण नसतो. शरीराला संतुलित आहाराची गरज असते. माणसाला 90% आजार मानसिकता आणि आहारातून होतात. त्यामुळे काय खावे किंवा काय खाऊ नये हे वैज्ञानिक भाषेत नागरिकांपर्यंत पोहचविणे गरजेचे आहे.
भारतात मराठी माणूस मागे असल्याचे बोलले जाते. खरंतर मराठी माणूस कुठेच मागे नाही. महाराष्ट्र आपल्या देशाचा युरोप, अमेरिका आहे. महाराष्ट्राएवढे प्रगत, प्रगतिशील वैचारिक बैठक असणार दुसरं राज्य देशात कोणतंच नाही. महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्राला वैचारिक बैठक असणारे धोरणकर्ते मिळाल्यामुळे शैक्षणिक, सहकार आणि आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र प्रगत आहे. मात्र कोरोनानंतर संपुर्ण जग बदललं असून शिक्षणं आणि आरोग्य क्षेत्राच्या माध्यमातून समाजाचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे झाले आहे.
जिल्हा बँकेचे संचालक प्रदिप विधाते यांनी मनोगत व्यक्त करताना एम. आर. सरांचे विचार आजच्या आणि पुढील पिढीलाही मार्गदर्शक असल्याचे सांगितले. कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार अविनाश कदम, सुत्रसंचलन लेखक, निर्माते तेजपाल वाघ, तर आभार प्रकाश जाधव यांनी मानले.
देशात मोठे षडयंत्र घडवले जाण्याची भीती |
हंबीरराव मोहिते यांच्या स्मृतिस्थळाला उदयनराजेंचे अभिवादन |
‘जैतुन’ |
पाच राष्ट्रीय मुद्यांवर मोदींनी उत्तर द्यावे: पृथ्वीराज चव्हाण |
कराडनगरीची ग्रामदैवता कृष्णाबाई यात्रा उत्साहात |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
जिल्ह्यात उष्णतेच्या लाटने नागरिक हैराण! |
साताऱ्याच्या संग्रहालयात १४० पुरातन शस्त्रे |
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |