03:43am | Dec 19, 2019 |
सातारा : रझाकारांना लाजवतील अशा पद्धतीची लूट गेली दोन दशके सातार्याच्या वेशीवरच केली जात आहे. परंतू ज्या मातीतून सातारच्या छत्रपतींनी अटकेपार झेंडे रोवले, तेच सातारकर आता गुजराती असलेल्या अनिल अंबानीच्या टोलच्या दाढेखाली दबलेले आहेत. सातारकरांचा जोष आणि आवेश आता फक्त इतिहासापुरताच उरलेला आहे. ते आज याची देही याची डोळा बघायला मिळाले. फेसबुकवर आणि ट्विटरवर पट्टीच्या धारदार शब्दात आपला त्रागा व्यक्त करणारे आज मात्र आंदोलनात कुठेच दिसले नाहीत. शेखी मिरवणार्या याच सोशलपट्टूंनी शेपट्या घालत ‘तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो’ असे म्हणत लायकी दाखवून दिली.
गेल्या काही वर्षांपासून पुणे ते सातारा या राष्ट्रीय महामार्गाची दैना झालेली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती या महामार्गाची झालेली आहे. टोल बंद व्हावा असा रेटा काही वर्षांपासून सुरु झाला. सोशल मीडियाच्या जमान्यात या लढ्याची जागा फेसबुक, व्हॉटसऍप आणि ट्विटरने घेतली. त्यामुळे हजारो सातारकर या मोहिमेमध्ये सहभागी झाले. सोशल मीडिया आंदोलकांची व्हर्च्युअल कमिटी तयार करण्यात आली. सातारच्या लोकप्रतिनिधींसह या कमिटीने जिल्हाधिकार्यांच्या साक्षीने रिलायन्सच्या अधिकार्यांची बैठक घेतल्या. अल्टीमेटमवर अल्टीमेटम देण्यात आले. परंतू हे सगळे अल्टीमेटम रिलायन्सने फाट्यावर मारुन आंदोलकांसह सातारच्या लोकप्रतिनिधींनाही खंबाटकी घाट दाखवला. अखेर सातारचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचा संयमाचा बांध फुटला. अखेर आज सकाळी आ. शिवेंद्रराजेंनी आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह आनेवाडी टोलनाक्यावर धडक दिली. कदाचित आनेवाडी टोलनाका असा प्रसंग पहिल्यांदाच पाहत होता. आनेवाडी टोलनाक्यावर अनेकांचे इंटरेस्ट होते आणि आहेत, हे सूर्यप्रकाशाइतके नितळ आहे. सुमारे दीड वर्षापूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरुन सातार्यात रणकंदन घडलेले होते. ती कोजागिरीची रात्र सातारकर अजूनही विसरलेले नाहीत. त्या सुरुची राडा प्रकरणी सातार्यातील अनेकांवर गुन्हे दाखल झाले. त्याचे खटले अजूनही सुरु आहेत. आंदोलने आणि तोडफोडी नको रे म्हणत आज आनेवाडी टोलनाक्यावर धडक देणार्यांवर गुन्हे दाखल होण्याची दहशत होती. त्यामुळे पुणे-सातारा रस्त्यावरील प्रवासाचे लाभार्थी असूनही अनेकांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवणेच शहाणपणाचे समजले. परंतू आ. शिवेंद्रराजेंनी दिलेला शब्द कृतीतून पाळला. रिलायन्सला आतापर्यंत असा धडा कोणीही शिकवलेला नव्हता. गुजराती शेठजींच्या मुंडीवर पाय ठेवून शिवेंद्रराजेंनी टोल प्रशासन हादरवून सोडले. परंतू हा टेम्पो अजून किती दिवस राहणार, हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.
पूर्वी हा महामार्ग दुहेरी असताना सातार्यातील नागरिक 110 कि.मी. चे अंतर दोन तासांत पार करायचा. परंतू आता हाच महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून सातारा ते पुणे हे अंतर पार करण्यासाठी कित्येक तास खर्ची घालावे लागतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यातच रिलायन्स व महामार्ग प्राधिकरणाच्या साटेलोट्यामुळे हा महामार्ग डेथ रोड झाला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर आतापर्यंत शेकडोजण अपघातात मृत्यू पावले आहेत, तर हजारोंना कायमचे अपंगत्व आले आहे. या रस्त्याचे कामच सदोष पद्धतीने करण्यात आले आहे, असे तज्ञांनी संशोधन करुन सिद्ध केले आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाशी हजारो पत्रव्यवहार झाले. परंतू जिल्हा प्रशासन बंडलांच्या पुडक्यापुढे लाचार झाले. अनेकांनी पैसे खाल्ले. अगदी सामाजिक आणि राजकीय पुढार्यांनीसुद्धा आंदोलनाचा फार्स करुन अनेकांनी या महामार्गात लाखो रुपये हाणले. सातारचे लोक लाचार आहेत, प्रशासकीय अधिकार्यांची साथ असेल तर आपण सातारकरांना नमवू शकतो, हे रिलायन्सने ओळखल्यामुळेच आतापर्यंत रिलायन्सची दादागिरी चालू होती. रिलायन्सचा कोण तो टी.एन. सिंग सातार्यात येतो आणि धमकीची भाषा बोलून जातो आणि त्याचसमोर सातारा जिल्हा प्रशासन नांगी टाकते. त्यामुळे दाल में कुछ काला नहीं, बल्की पुरी दाल ही काली हैं!
सातार्यातील ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. द्रविड यांनी धाडस दाखवत रिलायन्स कंपनीविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते. ते ही जनहित याचिका दाखल करतीलच याबद्दल कोणाचे दुमत नाही, मात्र लाखो सातारकर आपला पवित्र मतदानाचा हक्क बजावून लोकप्रतिनिधींना निवडून देते. लाखो सातारकरांचे प्रतिनिधी म्हणून हेच पुढारी विधानसभेत व लोकसभेत सातारकरांचा आवाज म्हणून जात असतात. परंतू आजपर्यंत एकाही माईच्या लालने विधानसभेत अथवा लोकसभेत अन् विधानपरिषदेतही रिलायन्स इन्फ्राच्या विरोधात ब्र शब्द उच्चारलेला नाही, हे ऑन द रेकॉर्ड आहे. सुमारे दशकापूर्वी कोल्हापूरात कावळा नाक्यापासून राजीव गांधी पुतळ्यापर्यंत तसेच बावड्यापासून तावडे हॉटेलपर्यंत आयआरबी कंपनीने रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम केले होते. कोल्हापुरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांवर आयआरबीने चकचकीत मुलामा करुन कोल्हापुरकरांचे जीवनमान जरुर उंचावले परंतू जे व्हायचे तेच झाले. आयआरबीने डाव साधला. कोल्हापुरच्या तीनही बाजूंना टोलचा सापळा लावून कोल्हापुरकरांची नाकेबंदी केली. 'आमचीच मोरी... असे म्हणत कोल्हापुरकरांनी आयआरबीच्या विरोधात एल्गार पुकारला आयआरबीनेही ताकद लावून हा एल्गार चिरडण्याचा प्रयत्न केला. परंतू या अशा आयआरबीला - फिआरबीला बधतील ते कोल्हापूरकर कसले? कोल्हापुरकरांच्या एकीच्या वज्रमुठीपुढे अखेर आयआरबीला आपला गाशा गुंडाळावा लागला. आंदोलने कशी करायची व ती तडीस कशी न्यायची, हे सातारकरांनी कोल्हापूरकरांकडून शिकायला हवे. सातार्यात आज आनेवाडी टोलनाक्यावर झालेले आंदोलन ही सुरुवात आहे. आ. शिवेंद्रराजेंनी रिलायन्सला धडा शिकविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकत सुरुवात तर केलेली आहे. आता यामध्ये किती सातारकर त्यांच्या पाठिशी उभे राहतात, हे पहावे लागणार आहे. सातारकरांना आपल्या हक्काची लढाई स्वत:च लढावी लागणार आहे. सातारा जिल्हा प्रशासन हे पूर्णत: भ्रष्ट झाले आहे. अनेक अधिकारी हे फक्त पैसा कमविण्याच्या मागे आहेत. त्यांना लोकांच्या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. ज्या करदात्यांच्या जिवावर यांचे पगार होतात, केवळ तेवढीतरी बांधिलकी सातारा जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी ठेवावी, परंतू तेवढीही दानत त्यांच्याकडे नाही. यावरुन हे अधिकारी किती नालायक आहेत, हे आपण समजू शकतो. गेल्या तीन वर्षापासून मानाच्या पदावर बसलेल्या महसुली डायनने सातारकरांचे जगणे बेहाल करुन टाकले आहे. जाताना ही बाई 100 कोटींपेक्षा जास्त माया घेवून जाईल. परंतू तिच्या या खाबुगिरीमुळे हे रिलायन्सचे भूत शेफारले. सातारा-पुणे या महामार्गाच्या असुविधेबाबत असंख्य तक्रारी येवूनही या बाईने त्याला केराची टोपली दाखवली. कारण तिला माहित आहे, सातार्यातील सामाजिक कार्यकर्ते एकतर मॅनेज होतात, नाहीतर शेपटी घालतात. अनेक कार्यकर्त्यांवर विविध राड्यातील आणि आंदोलनातील केसेस दाखल असल्यामुळे तेरी भी चूप, मेरी भी चुप म्हणत हे कार्यकर्ते ज्याच्या त्याच्या पुढार्यांच्या लेंग्यात दडले आहेत. हेही जिल्हा प्रशासनाला माहिती असल्यामुळे खाऊ पण मुळासकट खाऊ अशी पॉलिसी जिल्हा प्रशासनाने अवलंबल्यामुळे रिलायन्सकडूनही महसुली डायनने खच्चून खाल्लेले आहे. शेवटी अधिकारी येतील, जातील. परंतू त्याची किंमत सातारकर किती दिवस चुकवणार? आज आ. शिवेंद्रराजेंनी आंदोलनाचा पहिला अध्याय सुरु केलेला आहे. या आंदोलनात त्यांच्या पाठिशी असणार्या कार्यकर्त्यांनी दिलेरी दाखवत एल्गार चेतवण्याचे काम केलेले आहे. हे आज जरी मुठभर असतील, तरी भविष्यात या आंदोलनाची व्याप्ती वाढेलच. परंतू फेसबुक, ट्विटर आणि व्हॉटसऍपवर खळ्ळ्खट्याकची भाषा करणार्यांनी मात्र शेपटी घालून तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी भूमिका घेतल्यामुळे नेटकर्यांचे पेल्यातले वादळ पेल्यातच शमले, हे आजच्या दिवशी प्रकर्षाने जाणवले. मात्र एक लक्षात ठेवा, ज्याठिकाणी बसून तुम्ही फुले वेचत आहात त्याच ठिकाणी तुमच्यावर गोवर्या वेचण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा!
- संग्राम निकाळजे
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |