10:24pm | Mar 29, 2024 |
सातारा : महाराष्ट्र शासनाचा कृषी भूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल देवापूर (ता. माण) येथील कृषी मित्र व प्रगतिशील शेतकरी उद्धव बाबर व त्यांच्या पत्नी सौ. स्मिता बाबर यांचा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री पवार फरांदे यांच्या हस्ते नुकताच गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकाऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे मोठ्या संख्येने वळण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले.
महाराष्ट्र शासनाने नुकतेच कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कार जाहीर केले. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातून उद्धव बाबर यांनाही हा पुरस्कार जाहीर झाला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव बाबर व सौ. स्मिता बाबर यांचा आंब्याचे रोपटे व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, रासायनिक शेतीमुळे भविष्यात होणारी आणखी हानी रोखण्यासाठी, तसेच जमिनीचा पोत सुधारण्यासाठी शासनाने सेंद्रिय शेतीला प्राधान्य दिले आहे. उद्धव बाबर यांनी त्या अनुषंगाने सेंद्रिय शेती व पर्यावरणासाठी चांगले काम केले आहे. विषमुक्त शेती व पर्यावरण रक्षणासाठी ते सातत्याने जनजागृती करत आहेत. शासनाचा त्यांना जाहीर झालेला कृषिभूषण पुरस्कार ही त्यांना मिळालेली पोहच पावती आहे.
सौ भाग्यश्री पवार फरांदे म्हणाल्या, उद्धव बाबर यांच्यासारखे काही शेतकरी खरोखरच भूमातेच्या आरोग्यासाठी चांगले काम करत आहेत, हे अतिशय स्तुत्य आहे. उद्धव बाबर म्हणाले, रासायनिक शेती मानवाच्या मुळावर उठली आहे. सध्या सगळ्यात जास्त आजाराचे प्रमाण किडनी व कॅन्सरचे आहे. त्याचे कारण पाणी आणि रासायनिकयुक्त अन्नाचा आहार हे आहे. हे चित्र वेळीच बदलले गेले नाही तर येणाऱ्या पिढ्या बरबाद होतील, हे भीषण वास्तव आहे. त्यामुळे येत्या काळात सेंद्रिय शेतीसाठी मोठ्या प्रमाणात काम करावे लागणार असून शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीलाच प्राधान्य द्यावे.
दरम्यान, उद्धव बाबर यांना सेंद्रिय शेतीसाठी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार, कृषी विकास अधिकारी (जि. प.) विजय माईनकर, कृषी संचालक संतोषकुमार बरकडे, आत्माचे प्रकल्प संचालक विकास बंडगर, उपविभागीय कृषी अधिकारी फलटण सुहास रणसिंग, तालुका कृषी अधिकारी वैभव लिंगे, कृषी पर्यवेक्षक जयवंत लोखंडे, दहिवडी आत्माचे फुले यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
उद्धवराव बाबर व सौ. स्मिता बाबर यांनी गेली दहा वर्ष सेंद्रिय पद्धतीने शेती केली असून त्यामध्ये प्रामुख्याने ऊस व आंबा या पिकांचे उत्पादन घेतले आहे. त्यांनी सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला आंबा (केशर) परदेशात निर्यातही झाला आहे. सेंद्रिय पद्धतीने जोपासलेल्या उसापासून गुळ व काकवीचे उत्पादन घेतले आहे. त्यांच्या या उत्पादनाला बाजारपेठेत चांगली मागणी आहे. सेंद्रिय पद्धतीने उत्पादन घेत असताना कुजलेले शेणखत, गांडूळ खत, जीवामृत, कडधान्याच्या स्लरी, धान्याच्या स्लरी, गुळाचे पाणी, ताकाचे पाणी, स्वतः केलेले निमार्क, दशपर्णी अर्क, अग्नी अस्त्र, ब्रह्मास्त्र काडीकचरा व उसाचे पाचट कुजवणे, थेंचा व ताग या हिरवळीच्या खताचा वापर करणे, पाचटाच्या अच्छादनाचा वापर करणे, देशी गाईंचे गोमूत्र, कामगंध सापळे, स्टीकी ट्रॅप यांचा वापर करणे असे नाविन्यपूर्ण प्रयोग त्यांनी आपल्या शेतामध्ये केले आहेत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वेगवेगळ्या 70 प्रकारची झाडांची लागवडही त्यांनी केली आहे. नैसर्गिक पद्धतीने परागीकरण करण्यासाठी वेगवेगळ्या 15 प्रकारची फुलझाडे त्यांनी लावली आहेत. तणनाशकाची फवारणी केली जात नसल्यामुळे वेगवेगळ्या 15 प्रकारच्या रानभाज्यांचे जतनही चांगल्या पद्धतीने त्यांनी केले आहे.
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |
उदयनराजे भोसले यांचा मेंढोशी येथील मेळाव्यात विरोधकांना खोचक सल्ला |
घाणबी विभागात मोबाईल टॉवर उभारणार! |
पेठशिवापूर येथे निधी कमी पडू देणार नाही : उदयनराजे भोसले |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
संशयास्पद वस्तू जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |