मेलबर्न: भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १३७ धावांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. कोहली ब्रिगेडने या विजयासह चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर भारतीय संघाने तब्बल ३७ वर्षांनंतर कसोटी सामना जिंकला आहे. तर या विजयामुळे भारतीय संघाला आता ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
भारताने दुसऱ्या डावात दिलेल्या ३९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव २६१ धावांमध्ये आटोपला. भारतीय गोलंदाजांनी या कसोटीत अचूक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. भारतीय संघाकडून दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराह आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेऊन भारताला विजय प्राप्त करून दिला.
सामन्याच्या चौथ्याच दिवशी ऑस्ट्रेलियाचे ८ फलंदाज तंबूत परतले होते. पण पॅट कमिन्सने भारताच्या विजयाचे स्वप्न काही पूर्ण होऊ दिले नव्हते. त्याने चौथ्या दिवसाअखेरपर्यंत खिंड लढवून भारताचा विजय लांबवला होता. चौथ्या दिवसाअखेरीस ऑस्ट्रेलिया ८ बाद २५८ धावा अशी धावसंख्या होती. पाचव्या दिवशी भारतीय संघ विजय साजरा करण्याच्या तयारीत असताना दिवसाची सुरूवातच पावसाने झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरा सुरू झाला. त्यामुळे भारतीय संघाचं विजयाचं स्वप्न अधूरं राहतं की काय अशी शक्यता निर्माण झाली होती. पावसाने विश्रांती घेतली आणि चहापानानंतर सामना पुन्हा सुरू झाला. सामना खेळवण्यासाठी पंचांनी हिरवा कंदील दाखवल्याने भारताच्या आशा पल्लवित झाल्या. त्यात जसप्रीत बुमराहने याने संधीचं सोनं करत दुसऱ्याच षटकात भारताला नववी विकेट मिळवून दिली. बुमराहने ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या पॅट कमिन्सला (११४) माघारी धाडलं. त्यानंतरच्या षटकात इशांत शर्माने नॅथन लायनला यष्टीमागे झेलबाद करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |