हृदयरोग किंवा हृदयविकार ही एक अशी व्याधी आहे, ज्यामध्ये हृदयाचे कार्य अनियमित होते, थांबते व अशा व्यक्तीचा मृत्यू होतो. हृदयविकारामध्ये हार्ट अटॅक हा असा एक विकार आहे की ज्यामध्ये पेशंटचा मृत्यू होतो व स्वत:बरोबर संपूर्ण कुटूंब उद्ध्वस्त होते. भारतामध्ये गेल्या 25 वर्षात हार्ट अटॅक मध्ये 34 टक्क्यांनी वाढ झालेली आहे. एका अभ्यासानुसार 1990 मध्ये 15 टक्के मृत्यू हे हृदयविकारामुळे झाले आणि सध्या हे प्रमाण 28 टक्के झाले आहे. आज रोजी हृदयरोग हा मृत्यूचे एक महत्त्वाचे कारण बनले आहे. 2015 च्या अभ्यासानुसार हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 2.1 मिलियन होती. दरवर्षी 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदयरोग दिन म्हणून साजरा केला जातो.
1) हार्ट अटॅक म्हणजे काय?
शरीराचे कार्य सुव्यवस्थितपणे चालण्यासाठी उर्जेची गरज असते. ही उर्जा मिळविण्यासाठी शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत प्राणवायू (ऑक्सिजन) पोहचविणेची गरज असते. जे काम रक्तामार्फत केले जाते. शरीरातील प्रत्येक भागाला अगदी हृदयालाही लागणारा रक्तपुरवठा करणे हे हृदयाचे प्रमुख काम असते व ते अखंडपणे सुरु असते. काही कारणांमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा कमी झाला किंवा संपूर्ण थांबला तर उर्जे अभावी हृदयस्नायूंचे कार्य थांबते व ते मरतात. परिणामी हृदयाचे कार्य थांबते व ते बंद पडते. यालाच हार्ट अटॅक किंवा हार्ट फेलर म्हणतात.
2) हृदयाला होणारा रक्त पुरवठा कमी होण्याची अगर संपूर्ण थांबण्याची कारणे कोणती? हार्ट अटॅक कधी येवू शकतो?
हृदयाकडून शरीरातील विविध भागांना होणारा रक्तपुरवठा हा हृदयापासून निघणार्या रक्तवाहिन्यांपासून होत असतो. त्यांना धमन्या असेही म्हटले जाते. हृदयाला रक्तपुरवठा करणार्या धमन्यांना करोनरी आर्टरी असे म्हणतात. त्या तीन असताना यापैकी एक, दोन किंवा तीनही धमन्यांना आतील स्तरावर काहीवेळा चरबीचे (चिकट पदार्थ - उदा. : कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसाईड) थर साठू लागतात. हळूहळू त्याची जाडी वाढते व त्याठिकाणी रक्तपेशी अडकून पडतात. त्याठिकाणी रक्ताची गाठ (क्लॉट) तयार होते. परिणामी रक्तप्रवाहास विरोध होवून हृदयाच्या त्या भागास होणारा रक्तपुरवठा त्याप्रमाणात कमीकमी होत जातो व त्या भागाचे कार्य उर्जेअभावी बंद पडते. परिणामी हार्ट अटॅक येतो. काहीवेळा तीनही रक्तवाहिन्यांमध्ये अशा प्रकारचे क्लॉट तयार होवून संपूर्ण हृदयाला होणारा रक्तपुरवठा थांबतो व हृदयाचे कार्य पूर्णपणे थांबते. यालाच कार्डेयाक आरेस्ट किंवा कार्डिया फेल्युअर म्हटले जाते. अशा व्यक्तीचा तात्काळ मृत्यू होतो. या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचून राहण्याची सुरुवात सामान्यपणे 20 वर्षानंतर सुरु होते. याची जाडी यानंतर वाढत जाते. धमनीमधील ब्लॉकेजचे प्रमाण 10, 20, 30, 40, 50, 60 टक्के असते तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणताही त्रास जाणवत नाही. परंतू जर का हे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जास्त झाले तर अशा व्यक्तीला धावताना किंवा शारीरिक श्रमाची कामे करताना धाप लागते व हार्ट अटॅकची लक्षणे जाणवू लागतात.
3) हार्ट अटॅक कोणाला येवू शकतो?
ज्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, ज्यांना धुम्रपान, मद्यपान आदी सवयी आहेत, ज्यांच्या रक्तामध्ये कोलेस्टेरॉल किंवा ट्रायग्लिसाईड या चरबीचे प्रमाण जास्त आहे. किंवा ज्यांच्या आई-वडील, बहिण, भाऊ आदींना हार्ट अटॅक येवून गेला असेल, अशा व्यक्तिंना हार्ट अटॅक येण्याची शक्यता असते.
4) हार्ट अटॅक ची लक्षणे कोणती? हार्ट अटॅक आला आहे, हे कसे ओळखावे?
हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे म्हणजे छातीत कळा येणे व छातीचे हे दुखणे 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे, अंगाला घाम येणे, अगदी थंड हवेत जरी बसले तरी काही प्रमाणात घाम येत राहणे, खूप अस्वस्थ वाटणे. अशी व्यक्ती बसून राहिली, उभी राहिली किंवा आडवी झाली तरीही अस्वस्थ वाटायला लागणे ही हार्ट अटॅकची प्रमुख लक्षणे मानली जातात.
परंतू काहीवेळा वरील लक्षणे न दिसता केवळ छातीवर भार पडला आहे, दबाव आहे असे जाणवते. डाव्या हातात कळा येतात. त्या मानेपर्यंत अगदी जबड्यापर्यंत वाढत जातात. खांदा किंवा पोट दुखू लागते. छातीत जळजळ वाढते. व्यक्तीमध्ये अशी लक्षणे दिसत असतील तर अशा व्यक्तीलाही हार्ट अटॅक आलेला असतो.
अर्थात याठिकाणी हेही लक्षात ठेवले पाहिजे की, वरील लक्षणांपैकी एखादे लक्षण दिसत असेल परंतू ते हार्ट अटॅक मुळे असणार नाही. अशी लक्षणे इतर कारणांमुळेही दिसू शकतात. उदा. खरोखरच ऍसिडीटीही असू शकते. काहीवेळा शारीरिक इजा झाल्यामुळेही शारीरिक वेदना होवू शकतात. परंतू यापैकी एक किंवा अनेक लक्षणे दिसत असतील व जोडीने अंगाला खूप प्रमाणात घाम येत असेल किंवा अस्वस्थ वाटत असेल तर तो नक्कीच हार्ट अटॅक असू शकतो.
5) हार्ट अटॅक येवू नये म्हणून काही प्रथमोपचार आहेत का? किंवा त्यावर काय उपचार आहेत?
हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तीवर घरी असे प्रथमोपचार शक्यतो करता येत नाहीत. हार्ट अटॅक ची लक्षणे समजून घेणे ही सर्वांना माहित असेणे हे याठिकाणी महत्त्वाचे आहे. अशा एखाद्या व्यक्तीमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसत असतील तर त्या व्यक्तीच्या रक्तवाहिनीमधील क्लॉट कसा विरघळला जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरते. त्यासाठी छळींीेसश्रूशीळवश किंवा ऍस्पीरिन पाण्यात विरघळून दिल्यास तो क्लॉट विरघळण्यास मदत होते. परिणामील रक्तपुरवठा पुन्हा सुरळीत होण्यास मदत होते. त्यानंतर अशा व्यक्तीसाठी ताबडतोब तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व त्यांच्याकडून पुढील उपचार करुन घेणे महत्त्वाचे ठरते.
आता आपण हार्ट अटॅक च्या उपचारांसंबंधी बोलू -
साधारणपणे 20 वर्षापूर्वी हार्ट अटॅक आलेल्या वक्तींमध्ये मृत्यूचे प्रमाण 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते. परंतू हल्ली वैद्यकीय क्षेत्रात खूपच प्रगती झाली आहे. नवीन अद्यावत तंत्रज्ञान विकसित झाले आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आलेल्या व्यक्तींमधील मृत्यूचे प्रमाण अगदी 3 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. अर्थात अशा बाधित व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागल्यापासून पहिल्या तीन तासांत किंवा जास्तीत जास्त 6 तासांपर्यंत हे उपचार उपलब्ध झाल्यास रुग्ण बरा होवू शकतो. परंतू त्यानंतरच्या उपचाराने रुग्ण बरा होण्याची शाश्वती नसते.
म्हणून हार्ट अटॅक ची लक्षणे दिसू लागताच महत्त्वाचे काय तर, त्या व्यक्तीला वेळ न घालवता ताबडतोब पुढील उपचारांसाठी असे उपचार उपलब्ध असलेल्या सुसज्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करणे. अशा हॉस्पिटलमध्ये त्या बाधित व्यक्तीला प्रथमत: रक्ताची गुठळी विरघळवण्याची औषधे (क्लॉट बस्टर) दिली जातात. त्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होतो व जिवाचा धोका कमी होतो. त्यानंतर अशा रुग्णाची अँजिओग्राफी करुन रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकचे प्रमाण किती टक्के आहे, हे पाहिले जाते व गरजेप्रमाणे अँजिओप्लास्टी केली जाते. ज्यामुळे रुग्ण पूर्णपणे बरा होतो.
याठिकाणी हे महत्त्वाचे आहे की, हार्ट अटॅकची लक्षणे दिसू लागताच त्या व्यक्तीला पहिल्या तीन तासांमध्ये क्लॉट बस्टर हे औषध दिले गेले पाहिजे. म्हणजे रुग्णाच्या जिविताचा धोका कमी होतो. अर्थात याठिकाणी हेही पहावे लागेल की क्लॉट बस्टरचे इंजेक्शन दिल्याने बरे वाटू लागल्यास पुढील उपचार घेणेचे बंद करायचे. अशा रुग्णाला पुढील 24 तासांच्या आत अँजिओग्राफी व गरज असेल तर अँजिओप्लास्टी करुन घेतलीच पाहिजे. तरच रुग्ण पूर्णपणे बरा होईल. त्यामुळे हार्ट अटॅक आलेली व्यक्ती जर वेळेत उपचार घेईल तर ती पूर्णपणे बरी होईल व हे प्रमाण जवळजवळ 97 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे हार्ट अटॅक आलेली व्यक्तीमधील मृत्यूचे प्रमाण हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी म्हणजे केवळ 3 टक्क्के पर्यंतच आहे. अशा व्यक्तींच्या मृत्यूचे प्रमाण हे हॉस्पिटल बाहेर जास्त आहे. हार्ट अटॅक आलेले केवळ असे लोक मृत्यू पावतात ज्यांच्यासाठी उपचार घेण्याची इच्छा असूनही जवळ अशी सुसज्ज रुग्णालये उपलब्ध नाहीत. किंवा जे या लक्षणांकडे दुर्लक्ष करुन हॉस्पिटलमध्ये जाण्याचे टाळतात. किंवा ज्यांची उपचार करुन घेण्याची आर्थिक कुवत नाही. अर्थात सध्या हे उपचार पूर्वीपेक्षा खूपच कमी दरात उपलब्ध आहेत. तसेच आर्थिक दुर्बल लोकांना शासनाकडून आर्थिक मदत उपलब्ध करुन देणार्या योजना शासनाने आणल्या आहेत.
6) स्त्री-पुरुष अगर व्यक्तीचे वय व हार्ट अटॅक याचा काही परस्पर संबंध आहे का?
साधारणपणे पूर्वी हार्ट अटॅक हा 60 वर्षे व त्यावरील वयाच्या व्यक्तींमध्ये होत असे. परंतू सध्या 45 वर्षे वयावरील पुरुषांमध्ये व 55 वर्षे वयावरील स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याचा संभव जास्त असतो. परंतू हे वयही हळूहळू कमी होत आहे व अगदी 20-30 वर्षे वयातील व्यक्तींनाही हार्ट अटॅक येतो आहे. अर्थात याला कारणेही तशीच आहेत. बदललेली जीवन शैली, शारीरिक ताण-तणाव, निकृष्ठ तसेच जंक फूडचे अतीसेवन याचा एकत्रित परिणाम म्हणून हार्ट अटॅक अगदी कमी वयातील व्यक्तींनाही येवू शकतो. त्याचबरोबर यामध्ये स्त्री-पुरुष समानताही दिसून येते. पुरुष व स्त्रियांमध्ये हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण हे समसमान आहे, असे दिसते.
7) मधुमेह व हार्ट अटॅक याचा काही संबंध आहे का?
खूपच संबंध आहे. मधुमेह व हार्ट अटॅक हे अगदी जिवलग मित्राप्रमाणे हातात हात घालूनच येत असतात. याठिकाणी हे फार महत्त्वाचे आहे की मधुमेही व्यक्तींमध्ये हार्ट अटॅकची सर्व लक्षणे दिसतीलच असे नाही. विशेषत: अशा व्यक्तींमध्ये वेदना जाणवत नाहीत. म्हणून मधुमेही व्यक्तींना सायलेंट हार्ट अटॅक येवू शकतो. अर्थात अशा व्यक्तींमध्येही जराशा श्रमाने धाप लागणे, घाम येणे, अस्वस्थ वाटणे आदी लक्षणे जाणवतात.
8) आपण प्रेक्षकांना हार्ट अटॅक संबंधी थोडक्यात काय सांगाल?
मी याठिकाणी सर्व लोकांना या निमित्ताने एवढेच सांगेण की, आपल्या आहारामध्ये कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड या चरबीचे प्रमाण कमीत कमी ठेवा. नियमितपणे व्यायाम करा, ताणतणावमुक्त जीवनशैली अंगिकारा, व्यसनाधिनता टाळा व हार्ट अटॅक पासून दूर रहा. त्यानंतरही हार्ट अटॅकची लक्षणे दिसतील तर वेळ न घालवता इतर कोणताही उपचार न करता ताबडतोब तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचार घेवून पूर्णपणे बरे व्हा. आपण सुखी रहा व आपल्या सर्व कुटूंबियांना व नातेवाईकांना सुखी ठेवा.
डॉ. विजयसिंह राजाराम पाटील
एम.डी. डीएनबी (कार्डिओलॉजी)
हृदयरोग स्पेशालिस्ट, हृदय विभाग कृष्णा हॉस्पिटल कराड.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |