05:40pm | Aug 12, 2018 |
सातारा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. अंधश्रद्धेविरोधात तीन दशकाहून अधिक काळ लढणार्या, कोणत्याही प्रकारचे उपद्रवमूल्य नसणार्या व्यक्तीचा खून झाल्यामुळे पुणे, सातार्यासह संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. त्यावेळी तपास यंत्रणांनी सनातनसह हिंदुत्ववादी संघटनांकडे तपासाची सूई वळवली होती. विवेकवादी विचारवंतांच्या जिवास धोका असल्याची शक्यता गुप्तचर विभागाने वर्तविल्यामुळे तत्कालीन पोलीस अधीक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी दाभोलकर कुटूंबियांसह ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे, धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांना पोलीस सुरक्षा दिली होती.
विचारवंत, लेखक, सामाजिक चळवळीमध्ये काम करणार्यांना कोणापासून धोका असेल, असे महाराष्ट्रातील जनतेला कधीही वाटले नव्हते. परंतू 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर भल्या सकाळी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आली होती. त्यामुळे महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले होते. डॉ. दाभोलकरांसारख्या विवेकवादी, सत्शील माणसाला कोणी मारेल, असा विचार कोणी स्वप्नातही केला नसावा. डॉ. दाभोलकरांच्या हत्ते अगोदर बर्याच दिवसांपासून त्यांचे सातार्यातील घर, पुण्यातील ‘साधना’चे कार्यालय यांची वारंवार रेकी केल्याचे तपास यंत्रणांना तपासादरम्यान आढळून आले. डॉ. दाभोलकरांचा ‘गेम’ करण्याची प्रक्रिया अनेक वर्षांपासून सुरु होती. विवेकवादाला फक्त बंदुकीच्या गोळीनेच उत्तर द्यायचे, हा कार्यक्रम सनातन्यांनी यापूर्वीच आयोजलेला होता. ज्येष्ठ लेखक, विचारवंत कॉ. गोविंदराव पानसरे, कन्नड साहित्यिक व विचारवंत एम. एम. कलबुर्गी, बंगलोर येथील विद्रोही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांच्या हत्त्यांनंतर देशातील सामाजिक वातावरण ढवळून निघाले. व्यवस्थेविरोधात बोलणार्यांचा नरडीचा घोट घेतला जावू लागला आहे.
डॉ. दाभोलकरांच्या हत्त्येला येत्या 20 ऑगस्ट रोजी सहा वर्षे पूर्ण होत आहेत. तरीही तपास यंत्रणांना दाभोलकरांच्या खुनाचा सूत्रधार अद्याप सापडलेला नाही, ही देशातील तपास यंत्रणांच्यादृष्टिने मोठी शोकांतिका आहे. यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांनी गेल्या पाच वर्षापासून ‘जवाब दो’, ‘हू किल्ड दाभोलकर?’ हे ऑनलाईन कॅम्पेन चालवले आहे. डॉ. दाभोलकरांचा खून झाला, महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून संताप व्यक्त झाला. मात्र कार्यकर्त्यांनी, चाहत्यांनी कायदा हाती घेतला नाही. विधायक मार्गाने व्याख्याने, परिषदा आयोजित करुन लोकांचे प्रबोधन करीत राहिले. एवढे सगळे होवूनसुद्धा विवेकवादाची लढाई अंधश्रद्धा निर्मूलनच्या कार्यकर्त्यांनी सोडली नाही.
नालासोपारा येथील एटीएसच्या कारवाईमध्ये सनातनचा साधक असलेला वैभव राऊत याला ताब्यात घेतल्यानंतर सनातनचे पुन्हा एकदा सातारा कनेक्शन त्याच्या चौकशीत पुढे आले. सातारा येथील करंजे पेठेत राहणार्या सुधन्वा गोंधळेकरकडे काल दि. 11 रोजी शस्त्रास्त्रांचे, विस्फोटकांचे मोठे घबाड सापडले आहे. या कारवायांमुळे एटीएससुद्धा सुन्न झाली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुधन्वाने शस्त्रसाठा जमा केला आहे. एटीएसच्या म्हणण्यानुसार राज्यात ठिकठिकाणी याद्वारे घातपात घडविण्यात येणार होता. परंतू सातार्यात ज्येष्ठ विचारवंत, विद्रोही साहित्यिक डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे ज्येष्ठ बंधू डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, धरणग्रस्तांचे नेते व विचारवंत डॉ. भारत पाटणकर, उपराकार लक्ष्मण माने, पार्थ पोळके अशी मंडळी वास्तव्यास आहेत. यापैकी डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, डॉ. भारत पाटणकर व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कुटूंबियांना पोलिसांनी सुरक्षा रक्षक दिलेले आहेत. त्यामुळे वरील लोकांच्या जिवितास असणारा धोका सध्यातरी टळलेला आहे. उपराकार लक्ष्मण माने, पार्थ पोळके, वर्षा देशपांडे यांना मात्र कसल्याही प्रकारचे संरक्षण नाही. सातार्यातील भुरटे राजकीय पदाधिकारी दोन-दोन पोलीस सुरक्षा रक्षकांच्या गराड्यात वावरत असतात. त्यांच्या जिवाला धोका आहे, की नाही? हा मोठा संशोधनाचा विषय आहे. मात्र सामाजिक व विवेकवादाची लढाईत आपल्या जिवाची बाजी लावणार्या कार्यकर्त्यांना यापुढे पोलीस संरक्षण मिळायला हवे. जेणेकरुन सनातन्यांच्या वाढत्या कारवायांमुळे त्यांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.
एसपीजीच्या धर्तीवर सातारा पोलिसांना 'अपग्रेड' व्हावे लागणार...
नालासोपारा, सातारा, पुणे आणि नातेपुते, जि. सोलापूर येथील सापडलेल्या विस्फोटक व शस्त्रांस्त्रांमुळे सनातनी मंडळी दिवसेंदिवस 'हायटेक' होत चालली आहे. लष्कर-ए-तोयबा, जमात-उल-दावा, सिमी, जैश-ए-महंमद या दहशतवादी संघटनांप्रमाणेच सनातनही अपग्रेड होवू लागली आहे. त्यामुळे सातारा पोलिसांनाही एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) च्या धर्तीवर जवानांना प्रशिक्षित करावे लागणार आहे. अथवा पुणे येथील महाराष्ट्र पोलिसांच्या विशेष सुरक्षा पथकाकडे सातार्यातील विचारवंत, लेखक व सामजिक कार्यकर्त्यांची सुरक्षा सोपवावी. तरच भविष्यात सनातनचे होणारे हल्ले परतवून लावले जाणार आहेत.
- संग्राम निकाळजे
आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात 'उमेद' ने करून दाखवले |
पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा |
शाहूपुरीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
खंडणी मागितल्या प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
सातारा जिल्ह्यामध्ये 63.07 टक्के मतदान |
उदयनराजे भोसले यांचे सात वाजून सात मिनिटांनी मतदान |
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |