01:00pm | Mar 05, 2021 |
अहमदाबाद : भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना सुरू आहे. परंतू हा सामनाही तिसर्या कसोटीच्याच वाटेवर असल्याचे दिसून येत आहे. प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनी गिरवलेला कित्ता गिरवत 80 धावांवर 4 गडी तंबूत परतले आहेत.
पहिल्या दिवसात पाहुण्यांचा आख्खा संघ अवघ्या 200 धावांवर गारद झाल्यानंतर मैदानात आलेल्या टीम इंडियाचीही भोपळाही न फोडता पहिली विकेट पडली आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या छातीत धस्स झालं! शुक्रवारी दुसर्या दिवसाच्या पहिल्या सत्राचा खेळ संपेपर्यंत ती काळजी काही खोटी नव्हती हेच स्पष्ट झालं. संघाच्या फक्त 80 धावा फलकावर लागलेल्या असताना भारताची वरची फळी तंबूत परतली देखील!
गुरुवारी पहिल्या दिवशी साहेबांचा आख्खा संघ तंबूत धाडल्यानंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांवर कौतुकाचा वर्षाव होत होता. अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज या त्रिकुटानं इंग्लंडची फलंदाजी अक्षरश: कापून काढली. त्यामुळे आता टीम इंडिया या सामन्यावर पहिल्या इनिंगमध्येच वर्चस्व गाजवणार असं वाटत असतानाच पहिल्या ओव्हरच्या तिसर्याच बॉलवर अँडरसननं सलामीवीर शुबमन गिलला पायचीत करून भारताला पहिला धक्का दिला. एकही रन न करता शुभमन गिल माघारी परतल्यामुळे पुढे आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मावर दडपण येणं साहजिकच होतं.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताच्या एका गडी बाद 24 धावा झाल्या होत्या. दुसर्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा टीम इंडिया धिम्या गतीने का होईना पण डावाला आकार देईल असं वाटत होतं. पुजारा आणि रोहित शर्मा यांनी सुरुवातीला संथ पण आश्वासक सुरुवात देखील केली. पण कालच्या धावसंख्येमध्ये फक्त 16 धावांची भर घालून पुजारा वैयक्तिक 17 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कर्णधार विराट कोहली भोपळाही न फोडता माघारी परतला.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |