03:43pm | May 13, 2022 |
दिल्ली : चीन, पाकिस्तानच्या कुरापतींना सणसणीत उत्तर देण्यासाठी आता भारत सज्ज झाला आहे. भारतीय हवाईदलाने गुरुवारी बंगालच्या खाडीकिनारी सुखोई ३० एमकेआय लढाऊ विमानातून ब्रह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.
भारतीय वायुदलाने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रुज क्षेपणास्त्राचे अपग्रेड व्हर्जनची बंगालच्या खाडीत यशस्वी चाचणी केली आहे. या नव्या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ४५० किमीपर्यंत वाढवण्यात आली आहे. विषेश म्हणजे, ब्राह्मोसच्या या क्षेपणास्त्राची भीती पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ यांनाही वाटते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी ही भीती बोलून दाखवली होती.
अचूक लक्ष्य वेधणार
भारताचे सुखोई लढाऊ विमान अवकाशात विनाइंधन १५०० किमीपर्यंत अचूक लक्ष वेधू शकते. पण या नवीन क्षेपणास्त्रामुळं लढाऊ विमान २ हजार किमीपर्यंत मारा करु शकते. त्यामुळं आता भारतीय हवाईदल भूमी आणि समुद्रातही अचूक लक्ष्य वेधू शकते.
आणखी एक व्हेरियंट लाँच होणार
ब्राह्मोस मिसाईलच्या सहाय्याने शत्रूंची महत्त्वाची ठिकाणे, परमाणू बंकर, कमांड अँड कंट्रोल सेंटर, समुद्रातील एअरक्राफ्ट कॅरिअर आणि युद्धजन्य परिस्थितीत अचूक नेम साधण्यास मदत होईल. ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे आणखी एक व्हेरिंयट तयार केले जात असून त्यांची क्षमता ८०० किमीपर्यंत वाढवण्यात येणार आहे.
भारताची ताकद वाढणार
भारताने चीनच्या सीमेवर ब्रह्मोस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. भारताने लडाख आणि अरुणाचल प्रदेशमध्ये चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष ताबा नियंत्रण रेषेजवळ अनेक महत्त्वाच्या रणनितीक ठिकाणी ब्राह्मोस क्षेपणास्त्र तैनात केली आहेत. गेल्या अडीच महिन्यांत भारताने रेडिएशन विरोधी क्षेपणास्त्र रुद्रम -१ यासह अनेक क्षेपणास्त्रांची चाचणी केली आहे. रुद्रम-वन ही क्षेपणास्त्र २०२२ पर्यंत सेवेत दाखल होण्याती शक्यता आहे.
शिवथरला नऊ महिन्याचे अर्भक मृतावस्थेत आढळल्याने खळबळ |
आता शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची चारित्र्य पडताळणी होणार |
साताऱ्यात पोलिसांवरच आंदोलन करण्याची वेळ |
अविनाश भोसलेंना अटक झाली; जिल्ह्यातील हस्तक अधिकार्यांना कधी? |
पुणे-महाबळेश्वर बसमध्ये सापडली बंदुकीची गोळी |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
शाहूनगर येथे लोकवर्गणीतून बसवले जाणार सीसीटीव्ही कॅमेरे |
गोडोली जकात नाका परिसरातील हातगाडे पालिकेने केले जप्त |
रणसिंगवाडी सोसायटीच्या चेअरमनपदी लक्ष्मण जाधव, व्हाईस चेअरमनपदी सुभद्रा पोतेकर बिनविरोध |
राजापूर सोसायटीच्या चेअरमनपदी जयवंतराव डंगारे, व्हाईस चेअरमनपदी दादा लवंगारे बिनविरोध |
गोळीबाराने हादरली अमेरिका ! |
सांगवी येथे जुगार अड्ड्यावर छापा : एकावर गुन्हा |
भाजपने तिसरी जागा लढवली तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार |
छत्रपतींचा सन्मान नव्हे, स्वपक्षाचा संकुचित विचार केला |
जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘दामिनी’ ॲप वापरण्याचे आवाहन |
पालखी मार्गावर १० जूनपर्यंत कामे पूर्ण करा |
केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईत हस्तक्षेप होता कामा नये |
राज्यसभा निवडणुक : संभाजीराजे छत्रपती अर्जही भरणार नाहीत ? |
परबांसोबत शिवसेनेचे यशवंत जाधव अडचणीत |
गुणवंत विद्यार्थ्यांनी गौरीशंकरची शैक्षणिक प्रतिमा उंचविली : श्रीरंग काटेकर |
महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची तब्बल २.४४ लाख पदे रिक्त |