12:47am | Jul 30, 2018 |
महाबळेश्वर : तब्बल 26 तासांच्या अथक परिश्रमानंतर काल अंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेतील 30 जणांचे मृतदेह सहाशे फुट खोल दरीतुन बाहेर काढण्यात विविध संघटनांचे टे्कर्स आणि एन.डी.आर.एफ च्या जवानांना यश आले. काल झालेल्या या भीषण बस अपघातातील 15 मृतदेह रात्री उशीरा पर्यंत बाहेर काढण्यात आले होते. उरलेले सर्व मृतदेह आज दुपारी साडे बारावाजेपर्यंत खोल दरीतुन बाहेर काढण्यात यश आले. शवविच्छेदनानंतर सर्व मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले, दरम्यान काल पासुन मोहीमेत भाग घेतलेले कोकणातील लोकप्रतिनिधी अधिकारी व सेवाभावी संघटनांचे स्वयंसेवक मोहीमेचा शेवट झाल्या नंतरच त्यांनी घटनास्थळ सोडले.
कोकण कृषी विद्यापीठाचे 30 कर्मचारी घेवून महाबळेश्वर येथे सहलीला निघालेली बस काल सकाळी साडे दहा वाजता अंबेनळी घाटातील दाभिळ गावाच्या हद्दीत सहाशे फुट खोल दरीत कोसळली होती. या भीषण अपघातात कोकण कृषी विद्यापीठाचे सहा. अधिक्षक प्रकाश सावंत देसाई यांचा अपवाद वगळता बस मधील दोन चालकासह 30 जण या अपघातात जागीच ठार झाले होते. या अपघातातून बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांनी अपघाताची माहीती दिल्याने सर्वांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. महाबळेश्वर येथील दोन टे्कर्स संघटनांचे सुमोर 40 जवान सर्वात प्रथम अपघात स्थळी पोहचले, व त्यांनी तातडीने बचाव कार्याला सुरूवात केली. या जवांनाच्या मदतीला स्थानिक गावकरी पोलिस कर्मचारी महाबळेश्वर पालिकेचे कर्मचारी धावले. सकाळी आकरा वाजता सुरू झालेले बचावकार्यामुळे रात्री उशीरा पर्यंत 15 मृतदेह सहाशे फुट खोल दरीतुन बाहेर काढण्यात यश आले होते.
सायंकाळी सात वाजता पुणे येथुन आलेले एन.डी.आर.एफ च्या जवांनाची एक तुकडी बचावकार्यात सहभागी झाली रात्रभर हे बचाव कार्य सुरू होते. बसच्या टपाखाली काही मृतदेह अडकले होते ते बाहेर काढण्यासाठी बसचा टप कापुन काढणे आवश्यक होते गॅस कटरच्या मदतीने तो टप बाजुला करण्याचे काम रात्री हाती घेण्यात आले. तर सकाळी सहा वाजता पुन्हा खोल दरीतुन मृतदेह प्रत्यक्ष बाहेर काढण्यास प्रारंभ झाला. कालच दोन्ही बाजुकडील वाहतुक बंद करण्यात आल्याने बघ्यांची गर्दी सकाळी कमी होती. केवळ बचाव कार्यात सहभागी झालेले जवान तेथे असल्याने मृतदेह वेगाने वर काढणे सोपे झाले. आज दुपारी साडे बारा पर्यंत उरलेले सर्व मृतदेह बाहेर काढण्यात आले. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच घटना स्थळी धावुन आलेले कोणकाणातील रायगड जिल्हयाचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण आ. संजय कदम आ.भरत गोगावले खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी शेवटचा मृतदेह बाहेर काढल्यानंतर सुटकेचा निश्वास टाकला. व ही शोध मोहीम संपुष्टात आल्याचे जाहीर करून या लोक प्रतिनिधींनी कोकणात परतले.
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |
गुलाल टाकल्यावरुन सहा जणांकडून मारहाण |
साताऱ्यातून तिघेजण बेपत्ता |
अजिंक्यतारा येथून दुचाकीची चोरी |
मारामारीप्रकरणी सहा युवकांवर गुन्हा |
दलित-मुस्लिमच ठरवणार सातारचा खासदार ! |
रामवरदायिनी देवीच्या यात्रेस पार येथे प्रारंभ |
पाटण विधानसभा मतदार संघातील मतदार टाकणार मतदानावर बहिष्कार |