मुंबई : मुंबईच्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये मंगळवारी ऐतिहासिक खेळी पाहायला मिळाली.. मुंबई विरुद्ध बडोदा लढतीत हा विक्रम झाला आणि गोलंदाजांनी फलंदाजीत भीमपराक्रम करून दाखवला. मुंबईकडून खेळणाऱ्या तनुष कोटियन व तुषार देशपांडे यांनी १०व्या व ११ व्या क्रमांकावर फलंदाजी करताना वैयक्तिक शतक झळकावलं आणि २३२ धावांची विक्रमी भागीदारी केली. पण, केवळ १ धावेने रणजी करंडक स्पर्धेतील सर्वकालीन विक्रम मोडण्यापासून ते चुकले. मुंबईने दुसऱ्या डावात ५६९ धावांचा डोंगर उभा करून बडोदासमोर ६०५ धावांचे आव्हान उभे केले.
मुंबई इंडियन्सच्या पहिल्या डावातील ३८४ धावांच्या प्रत्युत्तरात बरोडा पहिल्या डावात आघाडी घेण्याच्या दिशेने कूच करत होता, परंतु शाम्स मुन्सी ( ४-१२१) व तनुष कोटियन ( २-४९) यांनी त्यांना ३४८ धावांवर गुंडाळले. मुंबईचा सलामीवीर हार्दिक तामोरेने ११४ धावांची खेळी करताना मुंबईला सावरले होते, परंतु मधळी फळी अपयशी ठरली. मुशीर खान ( ३३), पृथ्वी शॉ ( ८७), शाम्स मुलानी ( ५४) यांनी चांगले योगदान दिले, परंतु मुंबईचा डाव गडगडला. कर्णधार अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा अपयशी ठरला. पण, कोटियन व तुषार देशपांडे उभे राहिले.
तनुष व तुषार यांनी ९ बाद ३३७ धावांवरून संघाला ५६९ धावांपर्यंत पोहोचवले. तुषारने १२९ चेंडूंत १० चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १२३ धावा केल्या आणि रणजी करंडक स्पर्धेत ११व्या क्रमांकावरील ही सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. २००१ मध्ये तामिळनाडूच्या वी शिवारामाकृष्णन यांनी दिल्लीविरुद्ध ११५ धावा केल्या होत्या आणि तुषारने हा विक्रम मोडला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०व्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी करणारी तनुष व तुषार ही तिसरी भारतीय जोडी ठरली. तनुषनेही १२९ चेंडूंत १० चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १२० धावा केल्या.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १० व ११ व्या क्रमांकावरील फलंदाजांनी एकाच डावात शतक झळकावण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी १९४६ साली इंडियन्स विरुद्ध सरे या लढतीत चंदू सर्वते ( १२४*) व शुते बॅनर्जी ( १२१) यांनी हा विक्रम केला होता. ७८ वर्षानंतर असा पराक्रम घडला.
सातारा जिल्ह्यात तब्बल पन्नास हजार नवमतदार |
स्व. यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न देण्याची मागणी पंतप्रधान मोदींकडे करणार |
कराड तालुक्याच्या विकासासाठी एकत्र प्रयत्न करूया: खा. उदयनराजे भोसले |
खोऱ्याने मते घेणाऱ्या नेत्यांनी केले पाटण खोऱ्याकडे दुर्लक्ष |
सातारा जिल्ह्यातील दोन पोलिस अधिकाऱ्यांसह ११ जणांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
सांगलीच्या सिंचनासाठी मागणी झाली कमी |
पोटात चाकू भोसकून एकाला जिवे मारण्याचा प्रयत्न |
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |