नवी दिल्ली : देशात पुन्हा मोदी लाट आली असून, भाजपने एकट्याने 299 मतदारसंघात आघाडी घेतली आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 349 मतदारसंघात आघाडीवर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला एकट्याला पुन्हा बहुमत मिळणार आहे.
देशातील पूर्व किनारपट्टीवरील राज्यात थोडा फार विरोध वगळता भाजपने देशात पुन्हा सर्वत्र विरोधकांवर मोठी आघाडी मिळविली. विशेषतः उत्तर भारतात भाजपने विरोधकांचा धुव्वा उडविला. बुथपातळीपर्यंतचे कार्यकर्त्यांचे जाळे आणि आक्रमक प्रचार यांच्या जोरावर भाजपने देशात एकहाती सत्तेकडे वाटचाल केली.
कॉंग्रेसने तीन राज्यात सत्ता मिळविली. मात्र, त्याचा फायदा त्यांना लोकसभा निवडणुकीत झाला नाही. कॉंग्रेस देशभरात केवळ 52 मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी केरळमधील वायनाड मतदारसंघात साडेपाच लाख मतांची आघाडी घेतली असली, तरी ते अमेठी मतदारसंघात पिछाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या प्रचाराला पक्षाला फारसा उपयोग झाला नाही.
उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात गेल्या निवडणुकीत भाजपने मोठे यश मिळविले होते. यंदाही महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीने त्यांची गेल्या वेळची कामगिरी पुन्हा यंदाही बजावली. उत्तर प्रदेशात सप-बसप-रालोद महागठबंधन मोठा प्रतिकार करेल, अशी चर्चा होती. मात्र, बसप 11 जागांवर, सप सहा जागांवर, तसेच रालोद एका जागेवर आघाडीवर आहे. कॉंग्रेसच्या सोनिया गांधी आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशात भाजपने साठ जागांवर आघाडी घेतली आहे.
बिहारमध्येही 40 पैकी 38 जागांवर आघाडी घेत भाजप व मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या जदयूने कॉंग्रेस-राजद यांच्या महागठबंधनवर निर्विवाद मात केली. राजदच्या दोन जागा वगळता, अन्य पक्षांना बिहारमध्ये खाते उघडता आले नाही.
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसने 42 पैकी 22 जागांवर आघाडी घेतली. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून, गेल्या वेळी भाजपचे दोन खासदार होते, यंदा भाजपने 19 जागांवर आघाडी घेतली आहे. ओरिसामध्ये बिजू जनता दलाने 21 पैकी 15 मतदारसंघात आघाडी घेतली आहे.
आंध्र प्रदेशात वायएसआर कॉंग्रेसने 25 पैकी 23 जागांवर आघाडी घेतली आहे. तेलगू देशम पक्षाला केवळ दोन जागावर समाधान मानावे लागत आहे.
तमिळनाडूमध्ये मात्र द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडीने भाजपची घोडदौड रोखली. द्रमुकने 23 मतदारसंघात आघाडी घेतली. गेल्या निवडणुकीत सत्ताधारी अण्णा द्रमुकने 37 जागा जिंकल्या होत्या. यंदा द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने 36 जागांवर आघाडी घेतली असून, अण्णा द्रमुकला केवळ दोन जागा मिळत आहेत. भाजपला येथे खाते उघडता आले नाही.
मोठ्या मतांनी शाहू छत्रपती यांचा विजय होईल |
पाण्याच्या टाकीची भिंत अंगावर पडून महिला जागीच ठार |
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी अज्ञात पिकअप चालकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकावर गुन्हा |
मतदारांनो, निर्भयपणे मतदान करुन आपला हक्क बजावा |
कोरेगाव तालुक्यातील नऊ गावांचा मतदानावर बहिष्काराचा इशारा |
जिल्ह्यात 2315 मतदान केंद्रावर उद्या लोकशाहीचा उत्सव |
पोलिसांनी केला चोवीस तासांत घरफोडीचा गुन्हा उघड |
जिल्हा परिषदेच्या २००० अधिकारी कर्मचारी पथकांकडून १ लाख कुटुंबांना भेटून मतदान जनजागृती |
मतदानापूर्वी 72 तासात बँकानी 10 लाखाच्यावरील व्यवहार रोखीने करु नयेत : कुमार उदय, खर्च निवडणूक निरीक्षक |
अवैधरित्या दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
सोनगाव येथे 1 लाखाची घरफोडी |
डोक्यात दगड घालून झालेल्या खुनाची केवळ दोन तासात उकल |
जिल्ह्यात तिसर्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या |
श्री. छ. उदयनराजेंसारखा सच्चा पुरोगामी वारसदार निवडून येणे काळाची गरज |
उदयनराजे तुतारीची पिपाणी करतील |
उदयनराजेंना निवडून द्या..कामाचं आमच्यावर सोडा |
विषारी औषध पिल्याने महिलेचा मृत्यू |