12:42pm | Jul 02, 2021 |
नवी दिल्ली: इंग्लंड आणि श्रीलंकेत झालेल्या सामन्याचा निकाल भारतीय संघाच्या पत्त्यावर पडला आहे. इंग्लंडने श्रीलंकेचा पराभव केल्यामुळे श्रीलंकेच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आणि यातून भारतीय संघाची सुटका झाली आहे.
इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसर्या लढतीत विजय मिळवून यजमान इंग्लंडने मालिका जिंकली आहे. पहिल्या सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर इंग्लंड संघाने दुसर्या लढतीत 8 विकेटने लंकेचा पराभव करत मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या पराभवासह श्रीलंकेच्या क्रिकेट संघाच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली.
आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत सर्वाधिक सामन्यात पराभव होण्याचा विक्रम श्रीलंकेच्या संघाच्या नावावर जमा झाला आहे. या बाबत श्रीलंकेने भारताला मागे टाकले. इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात वनडे मालिका सुरू होण्याआधी याबाबत भारत अव्वल स्थानी होता. पहिल्या दोन लढतीत पराभव झाल्यानंतर आता श्रीलंकेने भारताला मागे टाकत हे स्थान मिळवले.
श्रीलंकेचा इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या सामन्यातील पराभव हा वनडे क्रिकेटमधील 428वा पराभव होता. आता श्रीलंकेचा संघ वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक पराभव स्विकारणारा संघ ठरला आहे.
श्रीलंकेनंतर भारतीय संघाचा क्रमांक लागतो. भारताने आतापर्यंत 427 लढती गमावल्या आहेत. तिसर्या क्रमांकावरील संघ देखील आशिया खंडातील आहे. पाकिस्तान तिसर्या क्रमांकावर असून त्यांनी 414 लढती गमावल्या आहेत. चौथ्या स्थानावर वेस्ट इंडिज असून त्यांनी 384 लढती गमावल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळण्याचा विक्रम भारताच्या नावावर आहे. भारताने 993 वनडे मॅच खेळल्या आहेत. दुसर्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा संघ असून त्यांनी 955 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्यांनी फक्त 333 लढती गमावल्या आहेत. या यादीत पाकिस्तान 933 सामन्यांसह तिसर्या क्रमांकावर, तर श्रीलंकाचा संघ 860 सामन्यांसह चौथ्या स्थानावर आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |