12:36pm | Feb 13, 2021 |
चेन्नई: इंग्लंडविरूध्दच्या दुसर्या कसोटी भारताने नाणेफेक जिंकली. मात्र पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भरातीय संघाची सुरुवात खराब झाली. विराटने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो की काय? असे वाटत असताना अखेर रोहित शर्माला सुरू गवसला आणि भारताचा डाव सावरला. उपहारापर्यंत 26 षटकांत 3 बाद 106 धावांपर्यंत मजल मारता आली.
या सत्रात भारतीय संघानं अनुभवी विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा सारखे फलंदाज गमावले. युवा शुबमन गिल शुन्य धावसंख्येवर तंबूत परतला. मात्र, पहिल्या सत्रात रोहित शर्मानं चौफेर फटकेबाजी करत भारतीय संघाचा डाव सावरला.
दरम्यान सूर गवसलेला रोहित शर्मा 80 धावांवर खेळत आहे. या खेळीदरम्यान रोहित शर्मानं 13 चौकार आणि एक खणखणीत षटकार लगावला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे 5 धावांवर नाबाद अजून जम बसलेल्या रोहित शर्माला साथ देत आहे. शुबमन गिल आणि कर्णधार विराट कोहली यांना आपलं खातेही उघडता आले नाही. दोघेही स्वस्तात तंबूत परतले. पहिली विकट झटपट पडल्यानंतर अनुभवी चेतेश्वर पुजारानं विस्फोटक रोहित शर्माला संयमी साथ दिली. पुजरा आणि रोहित यांनी दुसर्या गड्यासाठी 85 धावांची भागिदारी केली. पण त्यानंतर लागोपाठ दोन विकेट पडल्यामुळे भारतीय संघाची अवस्था बिकट झाली आहे. पुजारानं 21 धावांची छोटेखानी खेळी केली.
दुसर्या कसोटी सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराहऐवजी मोहम्मद सिराजला संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याशिवाय वॉशिंगटन सुंदर आणि शाबाज नदीम यांच्याऐवजी अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांना संघात स्थान देण्यात आलं आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीच्या शर्यतीत असलेल्या भारतासाठी दुसरा कसोटी सामना महत्त्वाचा ठरेल. हा सामना भारताने गमावल्यास अंतिम फेरीचे स्वप्न धुळीस मिळेल. अंतिम फेरी गाठण्यासाठी भारताला इंग्लंडविरुद्धची मालिका 2-1 किंवा 3-1 अशा फरकाने जिंकण्याची आवश्यकता आहे.आणि अजिंक्य रहाणे या दोन अनुभवी खेळाडूंकडून मोठ्या खेळीची आपेक्षा आहे.
ठोसेघर येथे एकाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून |
उंच भरारी योजनेचे ब्रँन्ड ऍम्बेसिडर म्हणून मोनिका राठी तसेच सौरभ भोसले यांची निवड |
केट्स पॉईंट वरुन आत्महत्त्या केलेल्याचा मृतदेह दरीबाहेर काढण्यात यश |
शेंद्रे येथील तिहेरी अपघात प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सुमारे अडीच लाखांच्या बांधकाम साहित्याची चोरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |