खंडाळा : मतदारसंघाच्या विकासासाठी कार्यक्षम खासदार असायला हवेत; परंतु सातारकर जनतेच्या यापूर्वी ते नशिबात नव्हते. सातारचे यापूर्वीचे खासदार संसदेत अधिक काळ दिसायचे नाहीत आणि कधी बोलले नाहीत. त्यामुळे त्यांचा वेळ मला मिळत होता; पण आता माजी अडचण झाली आहे. आता सातारला सक्षम आणि अभ्यासू खासदार असल्याने ते तळमळीने प्रश्न मांडतात. त्याचा फायदा मतदारसंघाला होईल, असे सांगत खा. सुप्रिया सुळे यांनी श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यावर नाव न घेता टीका केली.
दरम्यान, राज्यात तीन पक्षांचे एकत्रित सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे क्षमता असताना मकरंद पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देता आले नाही; पण त्यांचे काम चांगले आहे. त्यांना मंत्रिपदाची गरजही नाही. ते मिळायचे असेल तर त्यांच्या मेरिटवर ते मिळवतील; पण त्यांच्या कामाचा आवाका आणि क्षमता पाहता पक्षात त्यांचा मोठा मान आहे. त्यामुळे पुढील काळात त्यांना निश्चितपणे सन्मानाचे स्थान मिळेल, असे आश्वासन त्यांनी खंडाळ्यातील जनतेला दिले.
खंडाळा येथील पत्रकार दिन सोहळा व राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार वितरण समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी आ. मकरंद पाटील, जि. प. अध्यक्ष उदय कबुले, पोलिस अधिक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, जि. प. सदस्य मनोज पवार, सौ. दीपाली साळुंखे, उपसभापती वंदना धायगुडे, दत्तानाना ढमाळ, पुरुषोत्तम जाधव, तहसीलदार दशरथ काळे, डॉ. नितीन सावंत, अजय भोसले यांसह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
खा. सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेले सरकार हे सर्वसामान्य माणसांचे आहे. नविन उर्जेने आणि विश्वासाने राज्याच्या हितासाठी हे सगळं जमवलंय. त्यामुळे सामान्य माणसांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या संस्कारावर सरकार काम करेल. विशेषतः महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवण्यासाठी प्रयत्न होतील. सध्या विरोधात असलेल्या पक्षातील अनेकजण सरकार फार काळ टिकणार नाही अशी टिका करतात. मात्र विरोधकांनी त्याची काळजी करू नये. तीन पक्षांचे एका विचार धारेवर बनलेले हे सरकार पुढील अनेक वर्षे जनतेची सेवा करेल.
सातारा जिल्हा आणि शरद पवारांचे चांगलं नातं आहे. एका विश्वासाने लोकं जोडली गेली आहेत. आजपर्यंत सर्वाधिक बळ सातारा जिल्ह्याने राष्ट्रवादी पक्षाला दिले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा साहेब सातारला येतात तेव्हा ते नवी ऊर्जा घेऊन जातात. विधानसभा प्रचारातील सातारची सभा देशभरात गाजली. साताराची भूमी त्यांच्यासाठी टॉनिक बनली आहे, असे खा. सुळे म्हणाल्या.
मा. पंतप्रधान, भारत सरकार यांचे कराड येथे होणाऱ्या सभेकरीता पार्किंग, वाहतुक बदल |
धनगर समाजाचा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले यांना जाहिर पाठिंबा |
चव्हाण साहेबांना भारतरत्न का दिला नाही? |
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |