10:46pm | Apr 19, 2023 |
सातारा : एखादे गाव सलग 50 वर्षे बिनविरोध राहणे हे अचंबित करणारे आहे. स्व. वसंतराव पाटणे यांच्यासारखी सत्संग जपणारी व सहिष्णु असणारी माणसे या गावात होवून गेल्यानेच त्या मजबूत पायावर ही ग्राम सुधारणेची चळवळ उभी राहिली. काहीच नसलेल्या गावाचे रूपांतर आज डिजिटल गावात झाले आहे. ग्राम सुधारणेतून वसंत फुलवणारी ही बिनविरोध परंपरा कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार सिक्कीमचे माजी राज्यपाल व सातार्याचे खा. श्रीनिवास पाटील यांनी काढले.
वाण्याचीवाडी, ता. खंडाळा येथे माजी सरपंच स्व.वसंतराव पाटणे यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. पाटील बोलत होते. पुण्यतिथी सोहळ्यासाठी 13-14 गावांच्या ग्रामपंचायतींसह सर्वसामान्य जनतेच्या प्रचंड मोठ्या उपस्थितीने पंचक्रोशी न्हावून निघाली.
व्यासपीठावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन बकाजीराव पाटील, मिलिंददादा पाटील, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील, दै.‘पुढारी’चे विभागीय व्यवस्थापक जीवनधर चव्हाण, हरीष पाटणे, जिल्हा बँकेचे संचालक दत्तानाना ढमाळ, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आयटी सेलचे प्रदेशअध्यक्ष सारंगबाबा पाटील, मनोज पवार, राजेंद्र तांबे, शामराव गाढवे, अश्विनी पवार, बंडू ढमाळ, रमेश धायगुडे-पाटील, अजय भोसले, पोनि महेश इंगळे, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रकाश बोंबले यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
खा. श्रीनिवास पाटील म्हणाले, स्व. वसंतराव पाटणे यांनी वाण्याचीवाडी आणि पंचक्रोशीतील अनेक युवकांना मुंबईत नेवून नोकरीला लावले. गावी आल्यावर अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. आपल्या मुलाला लोकसेवेच्या कामात जुंपले. त्यामुळेच त्यांच्या पश्चातही दुष्काळी भागात वसंत फुलला आहे. 50 वर्षे बिनविरोध असणारे हे गाव पाहून अचंबित झालो. हरीष पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली गावाची असलेली अभेद्य एकजुट कौतुकास्पद आहे. ज्या वाडीत काहीच नव्हते तिथे हरीष पाटणे यांनी ग्रामस्थांना सोबत घेवून नंदनवन उभे केले. सातारा जिल्ह्यातील अनेक वाड्यावस्त्यांनी या गावाचा आदर्श घ्यावा. या गावात हरीष पाटणे यांच्या प्रेमाखातर मी दिलेल्या केंद्रीय जलजीवन योजनेला ग्रामस्थांनी माझे वडीलबंधू स्व. लक्ष्मणराव पाटील यांचे नाव दिले याचा मनस्वी आनंद आहे, असेही श्रीनिवास पाटील म्हणाले.
यावेळी बकाजीराव पाटील, नितीन भरगुडे-पाटील यांचीही भाषणे झाली. शर्वरी पाटणे हिने आपल्या आजोबांच्या आठवणी सांगितल्या. स्वागत आनंदराव मोरे यांनी केले.
प्रास्तविकात डिजीटलग्राम योजनेचे संकल्पक हरीष पाटणे यांनी पूर्वीचा गाव आणि बदललेला गाव याची माहिती दिली. वडिलांनी घालून दिलेल्या संस्कारावर ग्रामसुधारणेची पताका अखंड खांद्यावर नेत राहिन, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. तुषार कांबळे यांनी सूत्रसंचलन केले. सरपंच शंकर पाटणे यांनी आभार मानले.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते वाण्याचीवाडी प्राथमिक शाळेला संगणक प्रदान करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत वाण्याचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, मुंबईकर, चवणेश्वर तरूण मंडळ, वारकरी संप्रदाय यांनी केले. कार्यक्रमास 13 गावचे सरपंच, ग्रामपंचायती, सोसायट्यांचे चेअरमन, विविध गावचे पदाधिकारी, अधिकारी उपस्थित होते.
मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारी |
सातार्यात वृद्धाला दगडाने मारहाण |
सेव्हन स्टार सिनेमा परिसरात दोघांवर सत्तुरने वार |
कराडमध्ये उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोफ धडाडणार |
पुनर्वसन कायदा माझ्या मागणीमुळे अस्तित्वात आला |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
महायुतीचा संकल्पनामा छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण |
किसन वीर साखर कारखान्यासाठी आमदार मकरंद पाटलांच्या पाठीशी : उदयनराजे भोसले |
देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही |
जकातवाडीत सुमारे दीड लाखांची घरफोडी |
सुमारे साडेतीन लाखांच्या मुद्देमालाची चोरी |
अवैधरित्या दारू वाहतूक प्रकरणी एकावर गुन्हा |
अस्तित्व लपवल्या प्रकरणी एकावर कारवाई |
महाराष्ट्रात पवार गट शून्य होणार |
सुरेल आवाजातील श्रीराम गीतांनी सातारकर मंत्रमुग्ध |
गुंडगिरी पोसणाऱ्यांना निवडणुकीत धडा शिकवा |
अमित शहा नसते तर सहकारी कारखाने बुडले असते |
कथीत थोर नेत्याकडून जनतेच्या हाती वाडगं |
खर्च निरीक्षक यांच्या उपस्थितीत झाली उमेदवारांची निवडणूक खर्चाची प्रथम तपासणी |
सातारा जिल्ह्यात सेंद्रीय शेतीला गती द्या : जिल्हाधिकारी डुडी |
आचारसंहितेचा भंग होत असल्यास 1950 क्रमांकावर संपर्क साधावा |